शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

आठ हजार करदात्या शेतकऱ्यांचा पेन्शन परतीच्या नोटिशीला ठेंगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

आयकर विभागाने तपासली असता यामध्ये आयकर भरणारे श्रीमंत व्यक्ती आणि मोठ्या पगारावरील व्यक्तींचा समावेश असल्याची बाब उघड झाली. अशा अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जिल्ह्यामध्ये दहा हजार १७० अपात्र शेतकरी आहे. ज्यांच्याकडून जमा झालेली रक्कम परत करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहे. यातील एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. अद्याप ८८९६ शेतकऱ्यांनी ही रक्कम परत केली नाही.

ठळक मुद्देएक कोटीची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान धन योजनेत श्रीमंत आणि आयकर भरणारे दहा हजार १७० शेतकरी समाविष्ट झाले आहे. अशा शेतकऱ्यांना पैसे परत करण्याची नोटीस बजावली आहे. यातील आठ हजार शेतकऱ्यांनी नोटिशीला ठेंगा दाखविला आहे.जिल्ह्यामध्ये तीन लाख ३५ हजार ७७ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला. मिळणारा लाभ पाहून काही श्रीमंत व्यक्तींनी योजना मिळविण्यासाठी यादीमध्ये नाव टाकले आहे. ही यादी आयकर विभागाने तपासली असता यामध्ये आयकर भरणारे श्रीमंत व्यक्ती आणि मोठ्या पगारावरील व्यक्तींचा समावेश असल्याची बाब उघड झाली. अशा अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जिल्ह्यामध्ये दहा हजार १७० अपात्र शेतकरी आहे. ज्यांच्याकडून जमा झालेली रक्कम परत करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहे. यातील एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. अद्याप ८८९६ शेतकऱ्यांनी ही रक्कम परत केली नाही.

आतापर्यंत एक कोटीची वसुली- पंतप्रधान सन्मान धन योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धनदांडग्यांनी आपले नाव योजनेत दाखल केले.  - आयकर विभागाने अशा धनदांडग्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने पाठविलेल्या यादीतील दहा हजार १७० शेतकरी अपात्र आहेत.- अशा धनदांडग्यांकडून मिळालेली रक्कम परत घेण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहे. यातील १२७४ शेतकऱ्यांनी आतापर्यंत एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपये परत केले आहे.

लाभ न मिळालेल्यांचा आकडा गुलदस्त्यात

जिल्ह्यामधील तीन लाख ३५ हजार ७७ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी विविध अडचणींमुळे योजनेत सहभागी झाले नाही अशा शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला जावा म्हणून शासकीय यंत्रणेकडे वारंवार येरझाऱ्या मारल्या. यानंतरही त्यांची नावे समाविष्ट झाली नाही. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचा आकडा सध्या तरी गुलदस्त्यात आहे. अनेकांना आपली नावे दाखल कशी करायची, याचीच माहिती नाही. यातून अडचणी वाढल्या आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेत लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना तहसील प्रशासनामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी मिळालेली रक्कम परत केली आहे, तर अनेकांकडून ही रक्कम यायची आहे. याबाबत पुढे काय कारवाई करायची, याच्या सूचना प्राप्त व्हायच्या आहे. वसुलीची प्रक्रिया स्थानिक पातळीवरून होत आहे.- ललितकुमार वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी