शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

आठ हजार करदात्या शेतकऱ्यांचा पेन्शन परतीच्या नोटिशीला ठेंगा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 05:00 IST

आयकर विभागाने तपासली असता यामध्ये आयकर भरणारे श्रीमंत व्यक्ती आणि मोठ्या पगारावरील व्यक्तींचा समावेश असल्याची बाब उघड झाली. अशा अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जिल्ह्यामध्ये दहा हजार १७० अपात्र शेतकरी आहे. ज्यांच्याकडून जमा झालेली रक्कम परत करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहे. यातील एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. अद्याप ८८९६ शेतकऱ्यांनी ही रक्कम परत केली नाही.

ठळक मुद्देएक कोटीची वसुली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान धन योजनेत श्रीमंत आणि आयकर भरणारे दहा हजार १७० शेतकरी समाविष्ट झाले आहे. अशा शेतकऱ्यांना पैसे परत करण्याची नोटीस बजावली आहे. यातील आठ हजार शेतकऱ्यांनी नोटिशीला ठेंगा दाखविला आहे.जिल्ह्यामध्ये तीन लाख ३५ हजार ७७ लाभार्थ्यांना याचा लाभ मिळाला. मिळणारा लाभ पाहून काही श्रीमंत व्यक्तींनी योजना मिळविण्यासाठी यादीमध्ये नाव टाकले आहे. ही यादी आयकर विभागाने तपासली असता यामध्ये आयकर भरणारे श्रीमंत व्यक्ती आणि मोठ्या पगारावरील व्यक्तींचा समावेश असल्याची बाब उघड झाली. अशा अपात्र शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने नोटीस बजावली आहे. जिल्ह्यामध्ये दहा हजार १७० अपात्र शेतकरी आहे. ज्यांच्याकडून जमा झालेली रक्कम परत करण्याच्या सूचना तहसील प्रशासनाने दिल्या आहे. यातील एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपयांची रक्कम गोळा झाली आहे. अद्याप ८८९६ शेतकऱ्यांनी ही रक्कम परत केली नाही.

आतापर्यंत एक कोटीची वसुली- पंतप्रधान सन्मान धन योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्यात येतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी धनदांडग्यांनी आपले नाव योजनेत दाखल केले.  - आयकर विभागाने अशा धनदांडग्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. केंद्र आणि राज्य शासनाने पाठविलेल्या यादीतील दहा हजार १७० शेतकरी अपात्र आहेत.- अशा धनदांडग्यांकडून मिळालेली रक्कम परत घेण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहे. यातील १२७४ शेतकऱ्यांनी आतापर्यंत एक कोटी ८७ लाख सहा हजार रुपये परत केले आहे.

लाभ न मिळालेल्यांचा आकडा गुलदस्त्यात

जिल्ह्यामधील तीन लाख ३५ हजार ७७ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. जिल्ह्यातील काही शेतकरी विविध अडचणींमुळे योजनेत सहभागी झाले नाही अशा शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला जावा म्हणून शासकीय यंत्रणेकडे वारंवार येरझाऱ्या मारल्या. यानंतरही त्यांची नावे समाविष्ट झाली नाही. जिल्ह्यात अशा शेतकऱ्यांचा आकडा सध्या तरी गुलदस्त्यात आहे. अनेकांना आपली नावे दाखल कशी करायची, याचीच माहिती नाही. यातून अडचणी वाढल्या आहेत.

ज्या शेतकऱ्यांनी पात्र नसतानाही योजनेत लाभ घेतला अशा शेतकऱ्यांना तहसील प्रशासनामार्फत नोटीस बजावण्यात आली आहे. काही शेतकऱ्यांनी मिळालेली रक्कम परत केली आहे, तर अनेकांकडून ही रक्कम यायची आहे. याबाबत पुढे काय कारवाई करायची, याच्या सूचना प्राप्त व्हायच्या आहे. वसुलीची प्रक्रिया स्थानिक पातळीवरून होत आहे.- ललितकुमार वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी