शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात गृहयुद्ध! बलूचिस्तानात बंडखोरांसोबत झालेल्या झटापटीत पाक सैन्याचे २३ जवान ठार
2
राजा रघुवंशी प्रकरणात समोर आले आणखी एक नाव, सोनम-राजशी आहे थेट कनेक्शन! कोण आहे 'हा' व्यक्ती? 
3
४४६ मंदिरे, ११०० घरे, २३०० दुकाने पाडणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी कोण ? माजी आमदार अनिल गोटेंचा सवाल
4
ना नितीश कुमार, ना PM नरेंद्र मोदी...बिहारच्या युवकांची पहिली पसंती कोण?; सर्व्हेने सगळेच हैराण
5
Gold Silver Price: सोन्या-चांदीच्या घसरण, चांदीही उच्चांकी स्तरापासून स्वस्त झाली; खरेदीपूर्वी पाहा नवे दर
6
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी, एकूण ४५०० रिक्त जागा भरणार, 'इतका' पगार मिळणार!
7
काल निवृत्ती, आज लगेच दुसऱ्या संघाचा कर्णधार... 'या' स्टार खेळाडूला मिळाली मोठी जबाबदारी
8
गोव्यात चकवा लागला, गाडी पुढेच जाईना! शेवटी मंत्र म्हणून नारळ दिल्यावर...; अनिता दातेने सांगितला भयानक अनुभव
9
स्वस्तात ऑनलाईन वस्तू विकणाऱ्या 'मीशो'चं नाव बदललं! का घेतला मोठा निर्णय?
10
ना निधी, ना उपकरणं... स्वप्न केलं साकार; भारतीय महिला आइस हॉकी संघाने रचला इतिहास
11
रस्त्यावर महिला दिसताच धावत जाऊन घ्यायचा चुंबन, 'सायको किसर'ला पोलिसांनी घातल्या बेड्या!
12
एकेकाळी शून्य झालेली अनिल अंबानींची नेटवर्थ, आता जबरदस्त कमबॅक; 'या' दोन कंपन्यांनी केलं मालामाल
13
ऑपरेशन सिंदूरदरम्यान कुणाचं झालं सर्वाधिक नुकसान? अमेरिकन रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड
14
ट्रम्प-मस्क वादात नवा ट्विस्ट; आता टेस्ला प्रमुखांना होतोय 'या' गोष्टीचा पश्चाताप, म्हणाले...
15
Sonam Raghuwanshi: हत्या होण्यापूर्वी राजा रघुवंशी सोनमसोबत इथे थांबला होता, पहा व्हिडीओ
16
राजाच्या रक्तानं माखलेलं जॅकेट फेकलं अन् आकाशला...; 'बेवफा' सोनमनं काय काय केलं?
17
Raja Raghuvanshi Murder: कोण आहे अल्बर्ट पीडी? ज्याच्या एका जबाबामुळे सोनम रघुवंशीचा खरा चेहरा जगासमोर आला
18
स्वत:च्या फायद्यासाठी महिलांना वेश्या व्यवसायात ढकललं, आरोपींना अटक; १० जणांची सुटका!
19
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री झाली आई, दोन दिवसांपूर्वीच घरी आला छोटा पाहुणा; मुलगा की मुलगी?
20
'काम करु नका, मुले जन्माला घाला'! लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाने काढले फर्मान

टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघाचे आठ बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:14 IST

वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले.

ठळक मुद्देपांढरकवडा वन्यजीव विभाग : मुकुटबन परिसरातही दोन बछडे वास्तव्याला, १२ मोठ्या वाघांची वर्दळ वेगळीच

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. वाघांची ही वाढती संख्या भविष्यात मानव आणि वन्यजीव यांच्या संघर्षाची नांदी ठरू शकते. त्यासाठी आत्तापासूनच उपाययोजनांची गरज असून सोलर फेनसिंग हा त्यावरील प्रभावी उपाय ठरण्याची शक्यता आहे.जंगलात आढळणारा पट्टेदार वाघ, हा तेथील वनसंपदा परिपूर्ण असल्याचे द्योतक मानले जाते. सुदैवाने संपूर्ण जग वाघाच्या प्रजातीला वाचविण्यासाठी धडपडत असताना जिल्ह्यातील पांढरकवडा उपवनविभागात १२ पट्टेदार वाघ आहेत. तसेच दहा नवीन पिलसुद्धा जन्माला आली आहे. वाघाला अनुकूल असे वातावरण आहे. यातूनच वाघांची संख्या वाढत असल्याचे मागील काही वर्षात दिसून येत आहे.शेती करणे झाले कठीणवाघांची संख्या वाढत असताना त्यांचे संचार क्षेत्रही वाढले आहे. टिपेश्वर अभयारण्याबाहेरही वाघांचे वास्तव्य असल्याच्या अनेक खुणा दिसत आहे. मुकुटबन परिसर त्याचप्रमाणे राळेगाव तालुक्यातील सराटी, बंदर येथेही मागील काही दिवसांपासून मानव आणि वाघ, असा संघर्ष पेटला आहे.सोलर कंपाऊंडचा प्रस्तावएकीकडे ‘इकोटुरिझम’चा ओढा वाढत असून कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर वाघ असल्याचा बातम्यांचा प्रसार व प्रचार होत आहे. यातून वाघांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे. अन्न साखळीत शेवटच्या टोकावर असलेला वाघ आणि तृणभक्षक डुकर, रोही, हरीण यांचीही संख्या वाढत असल्याने जंगल भागात शेती करणे कठीण झाले आहे. निसर्गाशी पूरक असलेले वन्यजीव व शेतकरी या दोघांच्याही संघर्षाला टाळण्यासाठी उपाययोजनेची खरी गरज निर्माण झाली आहे.वाघ-मनुष्य संघर्ष पेटला, शेतकऱ्यांत दहशतया सुवार्तेसोबतच मनुष्य व वाघ असा संघर्षही पेटला आहे. राळेगाव तालुक्यातील वन विकास महामंडळाच्या जंगल परिसरात वाघाने तब्बल ११ जणांचा बळी घेतला आहे. एकीकडे वाघ वाचवीत असताना मानवाचे संरक्षण, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. जंगल भागाला लागून उदर भरणासाठी शेती करणारा गरीब शेतकरी वाढती वाघाची संख्या संकट समजतो आहे. यातून जनक्षोभही उसळत आहे. अनेकांचा रोजगार हिरावला जात आहे.वाघाच्या संवर्धनासाठी एनटीसीएकडून दीर्घकालीन व तातडीच्या उपाययोजना कोणत्या राहतील, अशी विचारणा झाली होती. सोलर फेनसिंग हा उत्तम पर्याय असल्याची मागणी केली आहे.- डॉ.विराणीवन्यजीव रक्षक, पांढरकवडा

टॅग्स :Tigerवाघ