शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

टिपेश्वर अभयारण्यात पट्टेदार वाघाचे आठ बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2018 22:14 IST

वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले.

ठळक मुद्देपांढरकवडा वन्यजीव विभाग : मुकुटबन परिसरातही दोन बछडे वास्तव्याला, १२ मोठ्या वाघांची वर्दळ वेगळीच

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वनसंपदेने नटलेल्या यवतमाळ जिल्ह्यात वाघांचे अस्तित्व सिद्ध झाल्यानंतर आता त्यांची संख्याही वाढू लागली आहे. टिपेश्वर अभयारण्यात आठ, तर मुकुटबन परिसरात वाघाच्या दोन बछड्यांचे दर्शन झाले. वाघांची ही वाढती संख्या भविष्यात मानव आणि वन्यजीव यांच्या संघर्षाची नांदी ठरू शकते. त्यासाठी आत्तापासूनच उपाययोजनांची गरज असून सोलर फेनसिंग हा त्यावरील प्रभावी उपाय ठरण्याची शक्यता आहे.जंगलात आढळणारा पट्टेदार वाघ, हा तेथील वनसंपदा परिपूर्ण असल्याचे द्योतक मानले जाते. सुदैवाने संपूर्ण जग वाघाच्या प्रजातीला वाचविण्यासाठी धडपडत असताना जिल्ह्यातील पांढरकवडा उपवनविभागात १२ पट्टेदार वाघ आहेत. तसेच दहा नवीन पिलसुद्धा जन्माला आली आहे. वाघाला अनुकूल असे वातावरण आहे. यातूनच वाघांची संख्या वाढत असल्याचे मागील काही वर्षात दिसून येत आहे.शेती करणे झाले कठीणवाघांची संख्या वाढत असताना त्यांचे संचार क्षेत्रही वाढले आहे. टिपेश्वर अभयारण्याबाहेरही वाघांचे वास्तव्य असल्याच्या अनेक खुणा दिसत आहे. मुकुटबन परिसर त्याचप्रमाणे राळेगाव तालुक्यातील सराटी, बंदर येथेही मागील काही दिवसांपासून मानव आणि वाघ, असा संघर्ष पेटला आहे.सोलर कंपाऊंडचा प्रस्तावएकीकडे ‘इकोटुरिझम’चा ओढा वाढत असून कॅमेऱ्याच्या माध्यमातून सोशल मीडियावर वाघ असल्याचा बातम्यांचा प्रसार व प्रचार होत आहे. यातून वाघांच्या संरक्षणाचा प्रश्न उद्भवला आहे. अन्न साखळीत शेवटच्या टोकावर असलेला वाघ आणि तृणभक्षक डुकर, रोही, हरीण यांचीही संख्या वाढत असल्याने जंगल भागात शेती करणे कठीण झाले आहे. निसर्गाशी पूरक असलेले वन्यजीव व शेतकरी या दोघांच्याही संघर्षाला टाळण्यासाठी उपाययोजनेची खरी गरज निर्माण झाली आहे.वाघ-मनुष्य संघर्ष पेटला, शेतकऱ्यांत दहशतया सुवार्तेसोबतच मनुष्य व वाघ असा संघर्षही पेटला आहे. राळेगाव तालुक्यातील वन विकास महामंडळाच्या जंगल परिसरात वाघाने तब्बल ११ जणांचा बळी घेतला आहे. एकीकडे वाघ वाचवीत असताना मानवाचे संरक्षण, हाही मुद्दा महत्त्वाचा आहे. जंगल भागाला लागून उदर भरणासाठी शेती करणारा गरीब शेतकरी वाढती वाघाची संख्या संकट समजतो आहे. यातून जनक्षोभही उसळत आहे. अनेकांचा रोजगार हिरावला जात आहे.वाघाच्या संवर्धनासाठी एनटीसीएकडून दीर्घकालीन व तातडीच्या उपाययोजना कोणत्या राहतील, अशी विचारणा झाली होती. सोलर फेनसिंग हा उत्तम पर्याय असल्याची मागणी केली आहे.- डॉ.विराणीवन्यजीव रक्षक, पांढरकवडा

टॅग्स :Tigerवाघ