शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या राष्ट्रीयकरणाचा प्रयत्न

By admin | Updated: March 6, 2015 02:09 IST

निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याचे राष्ट्रीयकरण..

यवतमाळ : निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याचे राष्ट्रीयकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील विश्रामगृहावर गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी वैयक्तित सिंचन सुविधा उभारणीला वेग दिला जात आहे. यासाठीच सर्व नद्या, नाले यांचा सर्वे यंत्रणेकडून करण्यात आला आहे. खनिज विकास निधीतून काम करण्यासाठी तसा आराखडा मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे. बहुतांश भाग सिंचनाखाली आणण्यासाठी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे, याकरिता केंद्रात पाठपुरावा सुरू असल्याचेही हंसराज अहीर यांनी सांगितले. जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्याला वीज जोडणी देण्यात येणार आहे. आज जिल्ह्याची मागणी पूर्ण करेल इतकी वीज घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. आयव्हीआरसीएल या कंपनीने काम न केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. यासाठी नवीन ठेकेदारांना काम दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. याशिवाय प्रत्येक धरणाच्या कालव्यांचे बांधकाम करण्यावर भर देणार असल्याचहीे सांगितले. यवतमाळ मुकुटबन येथे पूर्णा एक्सप्रेसला थांबा दिला जाणार आहे. वणी, मुकुटबन, बोरी या मार्गाच्या निर्मितीसाठी ४५ कोटींचे बजेट प्रस्तावित केले आहे. यवतमाळात टेक्सटाईल्स झोन निर्माण करण्यासाठी मुंबईतील नऊ गिरण्या स्थलांतरित केल्या जात आहे. यातील बहुतांश गिरण्या यवतमाळ कशा येतील यासाठी प्रयत्न सुरू आहे. सिंचनासाठी ग्राम आणि कृषी सिंचन योजना केंद्र शासनाने कार्यान्वित केली आहे. त्या दृष्टीकोणातून काम सुरू झाल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)