शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
2
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
3
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
4
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
5
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
6
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
7
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
8
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
9
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
10
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
11
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
12
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
13
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
14
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
15
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
16
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
17
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
18
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
19
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
20
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...

निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या राष्ट्रीयकरणाचा प्रयत्न

By admin | Updated: March 6, 2015 02:09 IST

निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याचे राष्ट्रीयकरण..

यवतमाळ : निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी त्याचे राष्ट्रीयकरण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी येथील विश्रामगृहावर गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले. जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी वैयक्तित सिंचन सुविधा उभारणीला वेग दिला जात आहे. यासाठीच सर्व नद्या, नाले यांचा सर्वे यंत्रणेकडून करण्यात आला आहे. खनिज विकास निधीतून काम करण्यासाठी तसा आराखडा मुख्यमंत्र्यांनी मागितला आहे. बहुतांश भाग सिंचनाखाली आणण्यासाठी निम्न पैनगंगा प्रकल्पाचे राष्ट्रीयकरण करण्यात यावे, याकरिता केंद्रात पाठपुरावा सुरू असल्याचेही हंसराज अहीर यांनी सांगितले. जिल्ह्यात मागेल त्या शेतकऱ्याला वीज जोडणी देण्यात येणार आहे. आज जिल्ह्याची मागणी पूर्ण करेल इतकी वीज घेण्यासाठी लागणारे इन्फ्रास्ट्रक्चर उपलब्ध नाही. आयव्हीआरसीएल या कंपनीने काम न केल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली. यासाठी नवीन ठेकेदारांना काम दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. निम्न पैनगंगा प्रकल्प पूर्ण झाल्यास सिंचन क्षमतेत तीन पट वाढ होणार आहे. याशिवाय प्रत्येक धरणाच्या कालव्यांचे बांधकाम करण्यावर भर देणार असल्याचहीे सांगितले. यवतमाळ मुकुटबन येथे पूर्णा एक्सप्रेसला थांबा दिला जाणार आहे. वणी, मुकुटबन, बोरी या मार्गाच्या निर्मितीसाठी ४५ कोटींचे बजेट प्रस्तावित केले आहे. यवतमाळात टेक्सटाईल्स झोन निर्माण करण्यासाठी मुंबईतील नऊ गिरण्या स्थलांतरित केल्या जात आहे. यातील बहुतांश गिरण्या यवतमाळ कशा येतील यासाठी प्रयत्न सुरू आहे. सिंचनासाठी ग्राम आणि कृषी सिंचन योजना केंद्र शासनाने कार्यान्वित केली आहे. त्या दृष्टीकोणातून काम सुरू झाल्याचे केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. (कार्यालय प्रतिनिधी)