शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

स्वच्छ महाराष्ट्र अभियान प्रभावीपणे राबवा

By admin | Updated: March 7, 2016 02:20 IST

शासन संपूर्ण स्वच्छतेसाठी विविध प्रकारचे उपक्रम, योजना राबवीत आहे. नगर परिषद क्षेत्र संपूर्ण हागणदारी मुक्त करण्यासोबतच स्वच्छ,...

सचिंद्र प्रताप सिंह : नगराध्यक्ष, मुख्याधिकाऱ्यांच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चायवतमाळ : शासन संपूर्ण स्वच्छतेसाठी विविध प्रकारचे उपक्रम, योजना राबवीत आहे. नगर परिषद क्षेत्र संपूर्ण हागणदारी मुक्त करण्यासोबतच स्वच्छ, सुंदर करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविले जात आहे. हे अभियान प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले.महसूल भवन येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत नगर परिषदांमधील शौचालय बांधकामाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा प्रशासन अधिकारी नरेंद्र फुलझेले, यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय यांच्यासह नगर परिषद, नगर पंचायतींचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी उपस्थित होते. नगर परिषद क्षेत्र संपूर्णपणे हागणदारीमुक्त झाले पाहिजे. यासोबतच स्वच्छ आणि सुंदर शहरे निर्माण करण्याचे शासनाचे प्रयत्न आहे. त्यासाठीच नगरपालिका क्षेत्रांकरिता स्वच्छ महाराष्ट्र अभियान हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम शासन राबवित आहे. या कार्यक्रमांतर्गत वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. नगरपालिका क्षेत्रात याबाबतीत चांगले काम करण्यासाठी नगराध्यक्ष तथा मुख्याधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालणे आवश्यक असून नगर सेवकांनीही आपल्या वॉर्डात जास्तीस जास्त वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी प्रयत्न करावे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी नगर परिषदनिहाय शौचालय बांधकामांचा आढावा घेतला. कार्यक्रमांतर्गत नगर परिषदांनी केलेला खर्च, लाभार्थींना करण्यात आलेले अनुदान वाटप तसेच त्या-त्या नगर परिषद क्षेत्रातील शौचालय बांधकामाबाबत अभियंत्यांची कामगिरी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. शौचालय बांधकामाची माहिती आॅनलाईन फोटोसह भरावी लागणार असल्याने त्याचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला.उन्हाळ्याच्या दिवसात प्रारंभ झाला आहे. नगर परिषद क्षेत्रात पाणीटंचाई जाणवू नये यासाठी नगरपालिकांनी आतापासूनच टंचाई उपाययोजना कराव्या असे जिल्हाधिकारी म्हणाले. ज्या धरणांमधून पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा केला जातो तेथे राखीव पाणीसाठ्याचे प्रमाण वाढवून घ्यावे, अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केल्या. नगराध्यक्षांनी यावेळी मांडलेल्या समस्याही जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेऊन त्यावर चर्चा केली. (प्रतिनिधी)