शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अभयारण्यातील रस्त्यांना ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 9:35 PM

आयुष्यभर वनसंपदा आणि वन्यप्राण्यांवर जीवापाड प्रेम करूनही पैनगंगा अभयारण्यातही आदिवासी बांधवांच्या नशिबी खरतड रस्तेच आहेत. अभयारण्याच्या जाचक अटींमुळे बंदीभागातील रस्त्यांची डागडुजीही केली जात नाही.

ठळक मुद्देउखडलेल्या रस्त्यांवरून पायपीट : जाचक अटींमुळे डागडुजी होत नाही

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : आयुष्यभर वनसंपदा आणि वन्यप्राण्यांवर जीवापाड प्रेम करूनही पैनगंगा अभयारण्यातही आदिवासी बांधवांच्या नशिबी खरतड रस्तेच आहेत. अभयारण्याच्या जाचक अटींमुळे बंदीभागातील रस्त्यांची डागडुजीही केली जात नाही. वर्षानुवर्षे उखडलेल्या रस्त्यांवरून पायपीट सुरू आहे.विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विस्तीर्ण जंगलाला अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. या परिसरातून वाहणाऱ्या नदीमुळे अभयारण्याला पैनगंगा असे नाव देण्यात आले. शेकडो वर्षांपासून या जंगलांमध्ये आदिवासींचे वास्तव्य आहे. सुमारे ४० ते ५० गावे या अभयारण्याच्या बंदी भागात येतात. आयुष्यभर या भागातील आदिवासींनी वनसंपदा आणि वन्यजीवांवर प्रेम केले. मात्र आता त्यांच्याच जीवावर या अभयारण्याचे जाचक कायदे उठले आहे. अभयारण्याच्या जाचक कायद्यामुळे या भागातील रस्त्यांची डागडुजी केली जात नाही. वन्यप्राणी डांबरी रस्त्यावरून घसरुन जखमी होतील, त्यामुळे या भागातील कोणताही रस्ता डांबरी झाला नाही. वर्षानुवर्षे खडीकरण केलेले रस्ते या भागात आहे. परंतु खडीकरणाचेही डागडुजी करायला कुणाला वेळ नाही. बहुतांश गावांना जोडणाºया रस्त्यांवरील गिट्टी उखडली आहे. रस्त्यावरून चालण्याऐवजी बाजूच्या पाऊल वाटेवरून वाहन न्यावे लागते. उन्हाळ्यात या रस्त्यावरून वाहन जाऊ शकते. परंतु पावसाळ्यात झालेल्या चिखलाने कोणतेही वाहन जात नाही. परिणामी बंदी भागातील अनेक गावांचा संपर्क तुटतो. कुणी आजारी पडल्यास त्याला खाटेवर टाकून ढाणकीपर्यंत आणावे लागते.रस्ते म्हणजे विकासाचे महाद्वार परंतु या भागातील रस्त्यांची झालेली अवस्था येथील नागरिकांना विकासापासून कोसोदूर नेत आहे. रस्त्यासाठी या भागातील नागरिकांनी वेळोवेळी आंदोलने केली. प्रशासनाला निवेदने दिली. बारमाही रस्ते करण्याची मागणी केली. परंतु जाचक अटींचे कारण पुढे करून या भागातील रस्त्यांची साधी डागडुजीही केली जात नाही. परिणामी हा भाग आजही विकासापासून कोसोदूर आहे.