शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटीला ग्रहण

By admin | Updated: April 6, 2015 00:06 IST

जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी आलेल्या निधीवर राजकीय पुढारी असलेल्या कंत्राटदारांची नजर असून

जलयुक्त शिवार अभियान : कृषी, वन आणि लघु सिंचनावर नजरयवतमाळ : जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियानासाठी आलेल्या निधीवर राजकीय पुढारी असलेल्या कंत्राटदारांची नजर असून सुमारे ५० कोटींच्या कामांना त्यामुळे टक्केवारीचे ग्रहण लागले आहे. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंवर्धनाच्या विविध योजनांची एकत्रित मोट बांधली. त्याला जलयुक्त शिवार अभियान असे नाव देऊन पावसाळ््यापूर्वी कामे पूर्ण करण्याचा अल्टीमेटम दिला. मात्र याच कामांना आता पुढारी असलेल्या कंत्राटदारांनी सुरूंग लावल्याचे दिसत आहे. किमान सत्ता बदल झाल्यानंतर ही प्रवृत्ती थांबेल अशी अपेक्षा व्यक्त होत होती. मात्र उलट स्थिती निर्माण झाली आहे. आज राजकीय कंत्राटदारांची संख्या दुपटीने वाढली आहे. पाणलोटच्या कामात यापूर्वीसुद्धा विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात सामंजस्य ठेऊन कामे केली जात होती. खासगीतील वाटाघाटीतून प्रत्येकाला कमिशनचा वाटा मिळत होता. दुर्दैवाने हेच चित्र आजही जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. ग्रामीण विकासाच्या योजना भ्रष्टाचाराने बरबटल्या आहेत. गावाच्या विकासाचा पैसा पूर्णपणे खर्च व्हावा यासाठी पंचायत राज व्यवस्था अस्तित्वात आली. याचा फायदा अजूनही होताना दिसत नाही. कृषी विभाग आणि वन विभागातून तब्बल २१ कोटींची कामे केली जात आहे. ही सर्व कामे जलयुक्त शिवार अभियानांतर्गत मोडत आहे. कुठलीही निविदा प्रक्रिया थेट काम वाटप केले जात आहे. येथूनच टक्केवारीला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यातील मंत्री, आमदार बदलले तरी कमिशनच्या व्यवहाराला मात्र खिळ बसली नाही. उलट कमिशनचा वाटा दुपटीने वाढला आहे. मार्चपूर्वी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन कामे वाटप करण्यात आली. याही पेक्षा गंभीर स्थिती लघुसिंचन स्थानिकस्तर या विभागाच्या येथे सिमेंट नाला बांध १७२ कामे ई-निविदा प्रक्रियेव्दारे वाटप करण्यात आली. तब्बल २८ कोटींच्या कामातून हाती काहीच लागले नाही. याची खंत काही राजकीय पुढाऱ्यांना आहे. त्यांनी आपल्या पदाचा वापर करत तेथील अधिकाऱ्यांना खास शैलीत सुनावले. सरळसरळ १५ टक्के हवेत, तुम्ही काहीही करा, अशा शब्दात आपला रोष व्यक्त केला. (कार्यालय प्रतिनिधी)सत्ताधारी बदलले तरी कामाची पद्धत मात्र सारखीच ई-निविदा असल्यामुळे आता कमिशनची वसुली थेट कंत्राटदाराकडूनच करावी, असे उत्तर संबंधित अधिकाऱ्याकडून देण्यात आले. मात्र राजकारणात उघड व्यवहार करण्याची सवय नसलेल्या त्या पदाधिकाऱ्याने वसुलीची जबाबदारी अधिकाऱ्यानेच पार पाडावी असे सांगितले. नाव कोणत्याही परिस्थितीत बाहेर येऊ नये अशी तंबीसुद्धा दिली आहे. प्रशासन बदलले तरी कामाची पद्धत मात्र सारखीच आहे. किंबहुना विकासाच्या योजना वेळेत पूर्ण होण्याकडे लक्ष देण्याएवजी पदाधिकारी आपल्या तुंबड्या भरण्यातच व्यस्त आहेत. अनेक जण तर इतक्या वर्षाचा बॅकलॉग भरण्याची संधी मिळाल्याचे बोलत आहेत. कामे होण्यापूर्वीच आगाऊ रक्कम मिळावी यासाठीही धडपडत आहे.