शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘सबळीकरण’च्या शेती खरेदीत आर्थिक खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2015 02:24 IST

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभीमान योजने अंतर्गत शेतजमीन खरेदीत आर्थिक खोडा निर्माण झाला असून शेतजमिन खरेदीसाठी ११ कोटींची मागणी...

लोकमतविशेष

भूमिहिनांचे स्वप्न भंगले : हवे ११ कोटी, मिळाले केवळ ४५ लाखरूपेश उत्तरवार यवतमाळ कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभीमान योजने अंतर्गत शेतजमीन खरेदीत आर्थिक खोडा निर्माण झाला असून शेतजमिन खरेदीसाठी ११ कोटींची मागणी असताना जिल्ह्याला केवळ ४५ लाख रुपयेच मिळाले आहे. परिणामी २९५ हेक्टर शेतजमिनीची खरेदी रखडली असून भूमालक होण्याचे अनेकांचे स्वप्न भंगले आहे. भूमिहिनांना शेतजमीन देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहता यावे यासाठी २००४ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण स्वाभीमान योजना सुरू करण्यात आली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील भूमिहिनांसाठी २९५ हेक्टर जमीन हवी आहे. जमीन खरेदीसाठी ११ कोटींची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात समाज कल्याण विभागाकडे यासाठीचा निधीच वळता झाला नाही. सदर योजनेत जमीनीच्या एकूण किमतीपैकी ५० टक्के रक्कम अनुदान स्वरुपात दिली जाते. ५० टक्के रक्कम लाभार्थ्याला भरायची असते. लाभार्थ्याने शेती खरेदी केल्यानंतर पुढील दोन वर्षात कर्जाची परतफेड करायची असते. यात कर्ज परतफेडीसाठी १० वर्षाचे समान हप्ते पाडले जातात. योजना अंमलबजावणीच्या पहिल्या वर्षी १२६९ हेक्टर जमीन खरेदी करण्यात आली होती. यासाठी जिल्ह्याला ३०० कोटी रुपये मिळाले होते. २०१४ मध्ये ३४ एकर जमीन मिळाली. मात्र निधी नसल्याने खरेदी रखडली. २०१५-२०१६ मध्ये जिल्ह्यात ११२ लाभार्थी निवडले गेले. त्यांच्यासाठी २९५.४२ आर हेक्टर शेतजमीन खरेदीसाठी ११ कोटी लागणार आहे. मात्र केवळ ४८ लाख रुपये जिल्ह्याकडे उपलब्ध आहे. अपुऱ्या निधीमुळे शेतजमीन खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे भूमिहिनांचे शेत मालक होण्याचे स्वप्न भंगले आहे. आता या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी आयुक्तस्तरावर पाठपुरावा सुरू केला आहे. मात्र मुळातच आर्थिक तरतूद नसल्याने शेतजमीनीसाठी पैसा मिळणार की, नाही हा प्रश्न अधांतरी आहे.