शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
4
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
5
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
6
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
7
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
8
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
9
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
10
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
11
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
12
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
13
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
14
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
15
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
16
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
17
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
18
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
19
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
20
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी

अवकाळी पावसाचा रबीला तडाखा, पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

जिल्ह्यात गुरुवारी महागाव, आर्णी, घाटंजी, उमरखेड, दारव्हा, यवतमाळ आदी तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. उर्वरित तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, रबी ज्वारी, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानझाले. वर्षभरातील दुसºया मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यातून शेतकरी अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : महागाव तालुक्यात गारपीट, उमरखेड, आर्णी, घाटंजीत वादळी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आधीच संकटात सापडलेल्या जिल्ह््यातील शेतकऱ्यांना गारपीट व वादळी पावसाने तडाखा दिला. या पावसामुळे रबीतील गहू, हरभरा, ज्वारीसह खरिपातील तूर पीकही हातचे जाण्याची भीती वर्तविली जात आहे. हजारो हेक्टरवरील रबी पिके बाधित होण्याची शक्यता असल्याने शेतकरी कोलमडले आहे.जिल्ह्यात गुरुवारी महागाव, आर्णी, घाटंजी, उमरखेड, दारव्हा, यवतमाळ आदी तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. उर्वरित तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, रबी ज्वारी, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानझाले. वर्षभरातील दुसऱ्या मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यातून शेतकरी अडचणीत आले आहेत.अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ८० टक्के पीक क्षेत्र नुकसानीच्या छायेत आले आहे. याचा सर्वात मोठा फटका कापसाला बसला आहे. काढणीला आलेला कापूस ओला झाला. आता त्याला कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे. सततच्या पावसाने हा कापूस काळवंडण्याचाही धोका आहे. यामुळे धाग्याची प्रत घसरून कापसाचे दर खाली घसरण्याचा धोका आहे. यामुुळे खुल्या बाजारात कापसाचे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. पणन महासंघ ८ ते १२ टक्के ओलावा असलेला कापूस स्वीकारणार आहे. वातावरणातील आर्द्रतेने या केंद्रावर ओला झालेला कापूस अपात्र ठरणार आहे. असा कापूस खुल्या बाजारातच मातीमोल भावाने विकावा लागणार आहे. सततच्या ढगाळी वातावरणाने तुरीवर अळीचा हल्ला झाल्याने बार करपत आहे. यामुळे तुुरीचे उत्पादनही घटणार आहे. अशीच अवस्था हरभऱ्याची आहे. हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला चढला आहे. हरभऱ्याची फुलगळ होत आहे. हळदीचे क्षेत्र मोठे आहे. बुरशी रोगाचे आक्रमण झाले आहे. हळद करपण्यास सुरूवात झाली आहे.उन्हाळी हंगाम लांबण्याचा धोकाअवेळी आलेल्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. तूर काढणीला यामुळे विलंब होणार आहे. कपाशीचे क्षेत्रही उशिरा रिकामे होण्याचा धोका आहे. यामुळे उन्हाळी भुईमूग लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.महागाव तालुक्याला गारपिटीचा फटकामहागाव तालुक्यातील हिवरासंगम, सवना, गुंज, करंजखेड, थार, कवठा, वेणी, डोंगरगाव, वाकोडी, वाडी, मोरथ या गावांमध्ये गारांसह पाऊस झाला. सकाळच्या सुमारास झालेल्या या पावसाने गहू, रबी ज्वारी, कापूस, तूर, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवेळी आलेल्या या पावसाने शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. खडका येथे शेकडो क्ंिवटल कापूस भिजला. कापूस खरेदी करण्यासाठी झालेल्या विलंबामुळे कापूस संकलन केंद्रावर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मारेगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सरासरी ५.७० मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने केली. सर्वाधिक १५ मिमी पाऊस मारेगाव तालुक्यात कोसळला आहे. यवतमाळ ९.८७, बाभूळगाव ४.२०, कळंब ५.५४, दारव्हा ६.४६, दिग्रस ७.८८, आर्णी ०.६३, नेर २.७१, पुसद २.४७, उमरखेड १.४६, महागाव ४.३८, वणी ८.१२, झरी ८.५५, केळापूर ५.८३, घाटंजी ०.०७, राळेगाव २.८२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात सापडला आहे. त्यांंना पिकांच्या नुकसानीची चिंता सतावत आहे.प्रथमच हळदीला फटकाजिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढत आहे. याच सुमारास निसर्ग प्रकोपाने हळदीला मोठा फटका बसला आहे. बुरशी रोगाच्या आक्रमणाने हळद मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त होण्याची भीती वर्तविली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस