शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळी पावसाचा रबीला तडाखा, पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 06:00 IST

जिल्ह्यात गुरुवारी महागाव, आर्णी, घाटंजी, उमरखेड, दारव्हा, यवतमाळ आदी तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. उर्वरित तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, रबी ज्वारी, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानझाले. वर्षभरातील दुसºया मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यातून शेतकरी अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी संकटात : महागाव तालुक्यात गारपीट, उमरखेड, आर्णी, घाटंजीत वादळी पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : आधीच संकटात सापडलेल्या जिल्ह््यातील शेतकऱ्यांना गारपीट व वादळी पावसाने तडाखा दिला. या पावसामुळे रबीतील गहू, हरभरा, ज्वारीसह खरिपातील तूर पीकही हातचे जाण्याची भीती वर्तविली जात आहे. हजारो हेक्टरवरील रबी पिके बाधित होण्याची शक्यता असल्याने शेतकरी कोलमडले आहे.जिल्ह्यात गुरुवारी महागाव, आर्णी, घाटंजी, उमरखेड, दारव्हा, यवतमाळ आदी तालुक्यांना पावसाने तडाखा दिला. उर्वरित तालुक्यातही पावसाने हजेरी लावली. यामुळे कापूस, रबी ज्वारी, तूर, हरभरा, गहू, भाजीपाला आणि फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानझाले. वर्षभरातील दुसऱ्या मोठ्या संकटाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. यातून शेतकरी अडचणीत आले आहेत.अवकाळी पावसाने जिल्ह्यातील ८० टक्के पीक क्षेत्र नुकसानीच्या छायेत आले आहे. याचा सर्वात मोठा फटका कापसाला बसला आहे. काढणीला आलेला कापूस ओला झाला. आता त्याला कोंब फुटण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावला जाण्याची शक्यता आहे. सततच्या पावसाने हा कापूस काळवंडण्याचाही धोका आहे. यामुळे धाग्याची प्रत घसरून कापसाचे दर खाली घसरण्याचा धोका आहे. यामुुळे खुल्या बाजारात कापसाचे दर आणखी खाली येण्याची शक्यता आहे. पणन महासंघ ८ ते १२ टक्के ओलावा असलेला कापूस स्वीकारणार आहे. वातावरणातील आर्द्रतेने या केंद्रावर ओला झालेला कापूस अपात्र ठरणार आहे. असा कापूस खुल्या बाजारातच मातीमोल भावाने विकावा लागणार आहे. सततच्या ढगाळी वातावरणाने तुरीवर अळीचा हल्ला झाल्याने बार करपत आहे. यामुळे तुुरीचे उत्पादनही घटणार आहे. अशीच अवस्था हरभऱ्याची आहे. हरभऱ्यावर घाटेअळीचा हल्ला चढला आहे. हरभऱ्याची फुलगळ होत आहे. हळदीचे क्षेत्र मोठे आहे. बुरशी रोगाचे आक्रमण झाले आहे. हळद करपण्यास सुरूवात झाली आहे.उन्हाळी हंगाम लांबण्याचा धोकाअवेळी आलेल्या पावसाने पिकांचे नुकसान होत आहे. तूर काढणीला यामुळे विलंब होणार आहे. कपाशीचे क्षेत्रही उशिरा रिकामे होण्याचा धोका आहे. यामुळे उन्हाळी भुईमूग लागवड लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.महागाव तालुक्याला गारपिटीचा फटकामहागाव तालुक्यातील हिवरासंगम, सवना, गुंज, करंजखेड, थार, कवठा, वेणी, डोंगरगाव, वाकोडी, वाडी, मोरथ या गावांमध्ये गारांसह पाऊस झाला. सकाळच्या सुमारास झालेल्या या पावसाने गहू, रबी ज्वारी, कापूस, तूर, हरभरा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या तालुक्यात पुन्हा अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. अवेळी आलेल्या या पावसाने शेतामधील पिकांचे अतोनात नुकसान झाले. खडका येथे शेकडो क्ंिवटल कापूस भिजला. कापूस खरेदी करण्यासाठी झालेल्या विलंबामुळे कापूस संकलन केंद्रावर शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.मारेगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊसजिल्ह्यात गत दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. सरासरी ५.७० मिमी पावसाची नोंद हवामान विभागाने केली. सर्वाधिक १५ मिमी पाऊस मारेगाव तालुक्यात कोसळला आहे. यवतमाळ ९.८७, बाभूळगाव ४.२०, कळंब ५.५४, दारव्हा ६.४६, दिग्रस ७.८८, आर्णी ०.६३, नेर २.७१, पुसद २.४७, उमरखेड १.४६, महागाव ४.३८, वणी ८.१२, झरी ८.५५, केळापूर ५.८३, घाटंजी ०.०७, राळेगाव २.८२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत पावसाची स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. यामुळे शेतकऱ्यांचा जीव भांड्यात सापडला आहे. त्यांंना पिकांच्या नुकसानीची चिंता सतावत आहे.प्रथमच हळदीला फटकाजिल्ह्यात हळदीचे क्षेत्र वाढत आहे. याच सुमारास निसर्ग प्रकोपाने हळदीला मोठा फटका बसला आहे. बुरशी रोगाच्या आक्रमणाने हळद मोठ्या प्रमाणात क्षतीग्रस्त होण्याची भीती वर्तविली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस