शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

दुष्काळाची साडेसाती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 22:59 IST

पालक मंत्र्यांचा धावता आढावा; मंत्रीद्वयांकडून अपेक्षा

राजेंद्र शर्मा धुळे जिल्ह्याला जणू दुष्काळाची साडेसाती लागली आहे. कारण गेल्या सलग तीन वर्षापासून जिल्हा दुष्काळाला सामोरा जात आहे. जिल्ह्यात सरासरी ५३० मि.मी. पाऊस होतो. यावर्षी सरासरीपेक्षाही कमी केवळ ४०४ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील ६७६ गावांपैकी १३६ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी दर्शविण्यात आली आहे. ही पैसेवारी जाहीर झाल्यानंतर सर्वच तालुक्यातून त्याला विरोध झाला. आता ३१ आॅक्टोबर रोजी जिल्ह्याची अंतिम पीक पैसेवारी जाहीर होणार आहे. त्यात यात निश्चित बदल होईल, अशी अपेक्षा आहे.  मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत जिल्ह्यातील धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा तालुक्यांचा समावेश  आहे.साक्री तालुक्याचा मात्र समावेश नाही. पण साक्री तालुक्याची परिस्थितीही खूपच बिकट आहे. तालुक्यातील माळमाथा आणि काटवानसह सर्वच परिसरात भीषण दुष्काळाची छाया आहे. त्यामुळे साक्री तालुक्याचाही समावेश करावा, अशी मागणी तालुक्यातून जोर धरत आहे. काँग्रेस, शिवसेनेतर्फे निवेदनेही देण्यात आली आहेत. जिल्हा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची अपेक्षा आहे.भर पावसाळ्यात सुद्धा जिल्ह्यात आठ गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरु होता. धुळे, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यातील ग्रामीण भागातील विहिरींनी आतापासूनच तळ गाठले आहे. आतापासूनच काही गावांमध्ये आठ ते दहा दिवसांआड पाणीपुरवठा होत आहे. संपूर्ण पावसाळयात टँकर सुरुच होते आणि आता हिवाळ्यातही सुरुच राहणार आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात  येथील परिस्थिती काय असेल, याची कल्पना करणे कठीण आहे. उन्हाळ्यात दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांत साठलेल्या पाण्याच्या वाटपाचे नियोजन काटेकारेपणे करणे आवश्यक आहे. याशिवाय दुष्काळाच्या झळा सोसणा-या बळीराजाला शासनाने मदतीचा हात दिला पाहिजे. कारण गेल्या वेळेस जाहीर केलेली दुष्काळी मदत अद्याप काही शेतक-यांच्या बँक खात्यात जमा झालेली नाही. त्यात आता खरीप हंगामास फटका बसल्याने शेतकरी हतबल झालेला आहे. पालक मंत्र्यांचा धावता आढावा - जिल्ह्यात दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेल्या आठवडयात पालकमंत्री दादा भुसे यांनी एक दिवसाचा धावता दौरा केला. या दौ-यात त्यांनी धुळे, शिंदखेडा आणि शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागातील गावांना आणि काही शेतक-यांची भेट घेऊन जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा घेतला. पाहणीनंतर सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत पालक मंत्र्यांनी पाणी वाटपाचे सूक्ष्म नियोजन करण्याचे तसेच जिल्हा प्रशासनाला त्याचा कृति आराखडा तयार करण्याचे आदेश दिले.मंत्रीद्वयांकडून अपेक्षा - पालक मंत्र्यानंतर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे यांनीही धुळे तालुक्याची पाहणी केली. त्यांनी केंद्र शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत आणण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे जिल्ह्यातील राज्यातील रोहयो मंत्री जयकुमार रावल यांनीही राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या दोघा मंत्र्यांनी दुष्काळाच्या प्रश्नावर सर्व पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन यासाठी एकत्रितरित्या प्रयत्न केले पाहीजे. सर्वांनी तसे प्रामाणिकपणे एकत्रितरित्या प्रयत्न केले तर त्याचा फायदा जिल्ह्यातील शेतक-यांना मिळेल. जिल्ह्यातील सर्व पक्षातील नेतेमंडळींनीही मंत्र्यांसोबत दुष्काळाच्या प्रश्नावर एकत्र आले पाहिजे. दुष्काळाचे केवळ राजकारण आणि श्रेयाचा वाद निर्माण होता कामा नये. अन्यथा जिल्ह्यातील नेतेमंडळीच्या या घाणेरडया राजकारणाचा फटका नेहमीप्रमाणे जिल्ह्यातील शेतकरी व जनतेला सोसावा लागेल. यंदातरी दुष्काळासारख्या गंभीर प्रश्नावर जिल्ह्यातील नेतेमंडळी एकत्र येतील, अशी माफक अपेक्षा धुळेकरांची आहे.

टॅग्स :Dhuleधुळे