शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांवर लावले जाताहेत डुप्लीकेट रिफ्लेक्टर; नियुक्त एजंसीची पोलिसात धाव

By सुरेंद्र राऊत | Updated: September 22, 2022 17:43 IST

दलाल व वाहन निरीक्षकांच्या संगनमताने प्रकार

यवतमाळ : रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी अनेक सुरक्षा साधनांचा विचार केला जातो. यात प्रामुख्याने वाहनांवर रिफ्लेक्टर बसविणे सक्तीचे आहे. त्यासाठी नामांकित एजंसीज परिवहन विभागाने नेमल्या आहेत. रिफ्लेक्टरचा दर्जा राखला जावा म्हणून क्युआर कोड देण्यात आले आहे. तशी नोंद महावाहन या एमएस प्रणालीवर आरटीओ अधिकाऱ्यांना करणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून थेट डुप्लीकेट रिफ्लेक्टर लावून वरची रक्कम खिशात घातली जात आहे. रिफ्लेक्टरची गुणवत्ता नसल्यास अपघात वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा गंभीर प्रकार संपूर्ण राज्यातच सुरू आहे.

रस्त्यावर वाहन चालविताना त्याच्या मागील-पुढील व दोन्ही बाजूंनी रिफ्लेक्टर टेप लावलेला असणे आवश्यक आहे. जेणे करून रात्रीच्या वेळेस वाहन समोर असल्याचे स्पष्ट दिसून येईल हा या मागचा उद्देश आहे. बरेचदा बिघाड झालेले वाहन रस्त्यावर उभे असते, त्यावर रिफ्लेक्टर नसल्यास दुसरे वाहन आदळून अपघात होतो. अपर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील यांनी १३ मे २०२२ रोजी परिपत्रकाच्या माध्यमातून राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सीमा तपासणी नाके यांना ब्रॅन्ड इगल्स बिझनेस सोल्यूशन यांचेच रिफ्लेक्टर कीट वापरण्याचे निर्देश दिले. इतकेच नव्हे तर याची नोंद क्युआर कोड स्कॅन करून महावाहनवर भरणे आवश्यक आहे.

सुरुवातीचे काही दिवस या कीटचा वापर आरटीओच्या ट्रॅकवर वाहन तपासणी दरम्यान झाला. नंतर मात्र दलालांनी डुप्लीकेट रिफ्लेक्टर कीट वापरणे सुरू केले आहे. शासनाने प्राधिकृत केलेली रिफ्लेक्टर कीट २५०० रुपयांची होते. यातून शासनालाही महसूल मिळतो. मात्र डुप्लीकेट रिफ्लेक्टर कीट ७०० रुपयात उपलब्ध असून उर्वरित पैसे दलाल व संबंधित मोटर वाहन निरीक्षकाच्या खिशात जातात. या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडाला असून दुय्यम दर्जाचे रिफ्लेक्टर अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे.

या संदर्भात शासन निर्देशित ब्रॅन्ड इगल्स बिझनेस सोल्यूशन या पुरवठादार एजंसीजने पोलिसात तक्रार केली आहे. ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. डुप्लीकेट प्रमाणपत्र व डोमेनेमचा वापर रिफ्लेक्टर कीटबाबत होत असल्याचे सांगितले. डुप्लीकेट रिफ्लेक्टर लावलेली वाहने पासिंग होत असल्याचाही आरोप कंपनीचे प्राे.प्रा. हितेश देसाई यांनी तक्रारीतून केला आहे.कोट

केंद्र सरकारने आयएसआय मार्क असणारे रिफ्लेक्टर टेप वापरण्याचे निर्देश दिले आहे. विशिष्ट कंपनीचे डुप्लीकेट प्रोडक्ट बाजारात आले असेल तर त्यावर कारवाई ही कंपनीची जबाबदारी आहे. आरटीओ अधिकारी त्यातील तज्ज नाही. वाहन पासिंग करताना रिफ्लेक्टर कीटचे बिल तपासले जाते. अपघात टाळण्यासाठी वाहनावर रिफ्लेक्टर आवश्यक आहे.

- दीपक गोपाळे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, यवतमाळ

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीroad safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूक