शहरं
Join us  
Trending Stories
1
"नॉन-व्हेज खाणारे वाईट आहेत, असं मी म्हणत नाही, पण..."; पंतप्रधान मोदी संसदेत नेमकं काय बोलले?
2
“मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?”; SIR वरून काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेंचा सवाल
3
याला म्हणतात 'इंटरनॅशनल बेइज्जती'! रशियन तरुणींना कोणत्या देशाचे तरुण सर्वाधिक आवडतात? पाकिस्तानी ब्लॉगरचा VIDEO पाहून हसू आवरणार नाही!
4
VIDEO : रोहित-गंभीर यांच्यात वाद? ड्रेसिंग रुममधील व्हायरल व्हिडिओमुळे रंगली चर्चा
5
SIR वरुन पश्चिम बंगालमध्ये तणाव वाढला; कोलकात्यात शेकडो BLO चे तीव्र आंदोलन...
6
“CM असताना अडीच तासांपेक्षा जास्त कधी झोपलो नाही, विरोधकांची झोप उडवली”: एकनाथ शिंदे
7
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात 'वंदे मातरम्'वर 10 तास चर्चा; PM मोदी सहभागी होणार...
8
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
9
तीन स्मार्ट मैत्रिणी अन् महिन्याला लाखोंची कमाई ! ब्रम्होसची माहिती देत पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या निशांतला केवळ तीन वर्षांची शिक्षा
10
लैंगिक शोषणाच्या तक्रारींची भिती दाखवणाऱ्या प्राध्यापकाला इतकी सौम्य शिक्षा कशी? चार प्राध्यापकांची केली होती फसवणूक
11
IND vs SA: रोहित शर्मासोबत एअरपोर्टवर नेमकं काय घडलं? विराट कोहलीही टक लावून बघतच बसला...
12
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
13
“आयोगाने पारदर्शी, प्रामाणिकपणे...”; निवडणुका स्थगित होताच असीम सरोदेंनी केली मोठी मागणी
14
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
15
Video: Kiss घेण्याचा मोह...; प्रेमी जोडप्याचे मालगाडी खाली बसून 'नको ते' चाळे अन् अचानक... 
16
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
17
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
18
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
19
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
20
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे भेसळयुक्त बियाणे देणाऱ्या कंपनीला दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 00:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : अधिक उत्पादन देणाऱ्या तुरीच्या बियाण्यांसोबत इतर बियाणे माथी मारून शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार ठरलेल्या कंपनीला जिल्हा ...

ठळक मुद्दे‘हरितक्रांती’ला दंड : दिग्रसच्या शेतकºयांना ग्राहक न्यायालयाचा दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : अधिक उत्पादन देणाऱ्या तुरीच्या बियाण्यांसोबत इतर बियाणे माथी मारून शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार ठरलेल्या कंपनीला जिल्हा ग्राहक न्यायालयाने दंड ठोकला आहे. दिग्रस तालुक्याच्या डेहणी येथील सहा शेतकऱ्यांना हरितक्रांती सीड्स कंपनीने (बुलडाणा) नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश देण्यात आला आहे.डेहणी येथील मधुकर किसन ढाकुलकर, गोपीचंद परसराम आडे, उत्तम काळू जाधव, मिलन गोकुल राठोड, अनिल झापा राठोड, अब्दुल रज्जाक म. इब्राहीम दोसानी या शेतकऱ्यांनी सदर कंपनीविरूद्ध तक्रार दाखल केली होती. त्यांनी हरितक्रांती सिड्स कंपनीचे आयसीपीएल-८७ या वाणाचे तूर बियाणे खरेदी करून शेतात लावले. अधिक उत्पादन देणारे हे वाण असल्याचे सांगितले गेले. प्रत्यक्षात या वाणाचे उत्पादन अतिशय कमी झाले. याचा शोध घेतला असता सदर वाणाच्या बियाण्यांमध्ये इतर प्रकारची बियाणे भेसळ केल्याची बाब निदर्शनास आली. केवळ १० ते १२ टक्के उत्पादनच आयसीपीएल-८७ या वाणाचे आले.कंपनीने भेसळयुक्त बियाणे दिल्याने नुकसान भरपाईसाठी या शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्हा ग्राहक न्यायालयात धाव घेतली. दोनही बाजूच्या युक्तिवादाअंती कंपनीने शेतकऱ्यांना भेसळयुक्त बियाणे पुरविल्याचे सिद्ध झाले. शेतकऱ्यांच्या नुकसानीस कंपनी जबाबदार असल्याने या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, असा आदेश मंचचे अध्यक्ष रवींद्र नगरे, सदस्य सुहास आळशी यांनी दिला आहे. मानसिक व शारीरिक त्रास आणि तक्रार खर्चाची रक्कमही द्यावी, असे या आदेशात म्हटले आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.विक्रेता व प्रमाणिकरण यंत्रणा मुक्तउत्पादन कमी झालेल्या शेतकऱ्यांनी महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणिकरण यंत्रणा अकोला आणि विक्रेत्याविरूद्धही ग्राहक न्यायालयात तक्रार नोंदविली होती. या दोनही संस्थांना सदर प्रकरणातून मुक्त करण्यात आले आहे. बियाण्यातील दोषाकरिता विक्रेत्याला जबाबदार धरता येणार नाही, तर बीज प्रमाणिकरण यंत्रणेचा या प्रकरणाशी कुठलाही संबंध दिसून येत नाही, असे मंचाने निकालपत्रात म्हटले आहे.