शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

दिग्रस पोलीस वसाहत दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:06 IST

येथील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. ब्रिटीशकालीन निवासस्थाने आता मोडकळीस आली आहे. त्यामुळे अनेक रक्षणकतर्यांवरच भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही पोलीस निवासस्थानांची अवस्था बिकट आहे.

ठळक मुद्देरक्षणकर्तेच संकटात : भाड्याच्या घरात वास्तव्य, ब्रिटिशकालीन निवासस्थाने मोडकळीस

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. ब्रिटीशकालीन निवासस्थाने आता मोडकळीस आली आहे. त्यामुळे अनेक रक्षणकतर्यांवरच भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही पोलीस निवासस्थानांची अवस्था बिकट आहे. सध्याची निवासस्थाने ब्रिटीशकालीन आहे. कार्यालयीन वास्तू सोडल्यास स्वातंत्र्यानंतर पोलीस वसातहीची निर्मिती करण्यात आली नाही. सध्या या पोलीस वसाहतीत ३९ निवासस्थाने आहे. ठाणेदारांसाठी स्वतंत्र बंगला आहे. मात्र ३९ पैकीकेवळ १० पोलीस कुटुंबीय वसाहतीत वास्तव्यालाआहे. त्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन तेथे वास्तव्य करावे लागत आहे. उर्वरित ७० पोलीस कुटुंब शहरात भाड्याच्या घरात राहात आहे. वसाहतीची एवढी भयावह अवस्था झाली, की कोणताही कर्मचारी तेथे राहावयास तयार नाही. मूलभूत सुविधा नसल्यामुळे हे कर्मचारी शहरात भाड्याने घर घेऊन राहात आहे.पोलीस वसाहतीच्या छतावरील कवेलू फुटले आहे. त्यांचे तुकडे-तुकडे झाले आहे. लाकडी फाटे जीर्ण झाले. त्यामुळे पावसाळ्यात अक्षरश: घरात धारा लागतात. या वसाहतीत राहणारे कर्मचारी आपल्या घरावर प्लास्टिक टाकून गळणाऱ्या पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. दारे, खिडक्यांची अवस्थाही जीर्ण झाली आहे. काही घरांच्या दारे, खिडक्या पूर्णत: तुटल्या आहे. शौचालय चोकअप झाले आहे. अनेक शौचालयांना तर दारेसुद्धा नाही. परिसरात काडीकचरा वाला आहे. गवताने वेढले आहे. त्यामुळे घरात कधीही सरपटणारे प्राणी येण्याची भीती सतत कायम असते.घरांच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहे. भिंती कधी कोसळतील याचा नेम उरला नाही. घरातील फरशा तर केव्हाच्याच उखडल्या. तीच अवस्था शौचालयांची आहे. नळांची पाईप लाईन ठिकठिकाणी लिकेज असल्यामुळे नळाला पाणीदेखील व्यवस्थित येत नाही. शौचालयांची दुरवस्था झाल्याने अनेक कर्मचाºयांना उघड्यावर जावे लागते. या वसाहतीला संरक्षक भींत नाही. सांडपाण्याचे व्यवस्थापन नाही. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वास्तव्य करणाºयांचे आरोग्यही धोक्यात सापडले आहे.कुटुंबीय सतत दडपणाखालीपोलीस वसातहीला गाजर गवताने विळखा घातला आहे. त्यामुळे सरपटणाºया प्राण्याची सतत भीती असते. त्यात घरातील कर्ता पुरुष ड्युटीवर असतो. घरी केवळ महिला आणि मुले असतात. त्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. जनतेचे रक्षण करण्यात सदैव व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाºयांना घराकडेच लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय सतत दडपणाखाली वावरते. कधी काय होईल, याचा कुणालाच भरवसा नसतो. ही समस्या कधी लोकप्रतिनिधींनी गंभीरपणपे घेतली नाही. त्यांनी नवीन पोलीस वसातहीसाठी कधी प्रयत्न केले नाही. त्यामुळे पोलीस वर्तुळातून खंत व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस