शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
2
पाकिस्तानने युद्धविरामाची विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
3
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
4
काही गोष्टी मनात ठेवायच्या...'त्या' वादग्रस्त विधानावर अजित पवारांनी कोकाटेंचे कान टोचले
5
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका
6
भारताच्या स्वातंत्र्यानंतर ६५९ दिवसांनी भोपाळमध्ये फडकला तिरंगा; १ जूनचा इतिहास जाणून घ्या
7
तो कोणाच्या संपर्कात होता, काय चॅटिंग केले ? नीलेश चव्हाणकडे सापडले नेपाळचे सीमकार्ड 
8
"२०२६ मध्ये ममता बॅनर्जी सरकार कायमचं उखडून टाकू..."; अमित शाह यांनी दिलं चॅलेंज
9
विद्यार्थी आंदोलन चिरडण्यासाठी स्वत:च देत होत्या चिथावणी, बांगलादेशच्या कोर्टात शेख हसिनांवर गंभीर आरोप
10
आठवा वेतन आयोग लागू होण्यास होऊ शकतो उशीर, जानेवारी 2026 पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांचं काय होणार? आली नवी अपडेट
11
...तर पाकिस्तानसोबतच चीनचीही हवा निघणार! रशियानं भारताला दिली Su-57E ची जबरदस्त ऑफर, काय आहे याची 'खासियत'?
12
Coronavirus: हळूहळू पाय पसरतोय कोरोना! देशात सक्रीय रुग्णसंख्या ३७५८; राज्याची आकडेवारी वाचा
13
CNG-PNG वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! नैसर्गिक वायूच्या दरात मोठी कपात, 'इतके' रुपये वाचणार!
14
सिद्धार्थच्या आईचा नवा व्यवसाय, सीमा चांदेकर यांनी पुण्यात सुरू केलं स्वत:चं दुकान
15
अजितदादा-महेशदादा यांच्यातील खडाखडीमुळे महापालिका निवडणुकीत रंगणार दोस्तीत कुस्ती
16
धक्कादायक! कापायची होती पट्टी, फोनवर बोलण्याच्या नादात नर्सने कापले बाळाचे बोट
17
मुंबई आणि पंजाबमधील लढत पावसामुळे रद्द झाल्यास फायनलमध्ये कोण जाणार? असं आहे समीकरण
18
आता वेळ नाही, भारतात आल्यावर योग्य उत्तर देईन; शशी थरुर यांचा काँग्रेसला घरचा आहेर

दिग्रस पोलीस वसाहत दयनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 22:06 IST

येथील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. ब्रिटीशकालीन निवासस्थाने आता मोडकळीस आली आहे. त्यामुळे अनेक रक्षणकतर्यांवरच भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही पोलीस निवासस्थानांची अवस्था बिकट आहे.

ठळक मुद्देरक्षणकर्तेच संकटात : भाड्याच्या घरात वास्तव्य, ब्रिटिशकालीन निवासस्थाने मोडकळीस

प्रकाश सातघरे ।लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : येथील पोलीस वसाहतीची दयनीय अवस्था झाली आहे. ब्रिटीशकालीन निवासस्थाने आता मोडकळीस आली आहे. त्यामुळे अनेक रक्षणकतर्यांवरच भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे.स्वातंत्र्याच्या ६५ वर्षानंतरही पोलीस निवासस्थानांची अवस्था बिकट आहे. सध्याची निवासस्थाने ब्रिटीशकालीन आहे. कार्यालयीन वास्तू सोडल्यास स्वातंत्र्यानंतर पोलीस वसातहीची निर्मिती करण्यात आली नाही. सध्या या पोलीस वसाहतीत ३९ निवासस्थाने आहे. ठाणेदारांसाठी स्वतंत्र बंगला आहे. मात्र ३९ पैकीकेवळ १० पोलीस कुटुंबीय वसाहतीत वास्तव्यालाआहे. त्यांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन तेथे वास्तव्य करावे लागत आहे. उर्वरित ७० पोलीस कुटुंब शहरात भाड्याच्या घरात राहात आहे. वसाहतीची एवढी भयावह अवस्था झाली, की कोणताही कर्मचारी तेथे राहावयास तयार नाही. मूलभूत सुविधा नसल्यामुळे हे कर्मचारी शहरात भाड्याने घर घेऊन राहात आहे.पोलीस वसाहतीच्या छतावरील कवेलू फुटले आहे. त्यांचे तुकडे-तुकडे झाले आहे. लाकडी फाटे जीर्ण झाले. त्यामुळे पावसाळ्यात अक्षरश: घरात धारा लागतात. या वसाहतीत राहणारे कर्मचारी आपल्या घरावर प्लास्टिक टाकून गळणाऱ्या पाण्यापासून बचाव करण्याचा प्रयत्न करतात. दारे, खिडक्यांची अवस्थाही जीर्ण झाली आहे. काही घरांच्या दारे, खिडक्या पूर्णत: तुटल्या आहे. शौचालय चोकअप झाले आहे. अनेक शौचालयांना तर दारेसुद्धा नाही. परिसरात काडीकचरा वाला आहे. गवताने वेढले आहे. त्यामुळे घरात कधीही सरपटणारे प्राणी येण्याची भीती सतत कायम असते.घरांच्या भिंतीला मोठमोठे तडे गेले आहे. भिंती कधी कोसळतील याचा नेम उरला नाही. घरातील फरशा तर केव्हाच्याच उखडल्या. तीच अवस्था शौचालयांची आहे. नळांची पाईप लाईन ठिकठिकाणी लिकेज असल्यामुळे नळाला पाणीदेखील व्यवस्थित येत नाही. शौचालयांची दुरवस्था झाल्याने अनेक कर्मचाºयांना उघड्यावर जावे लागते. या वसाहतीला संरक्षक भींत नाही. सांडपाण्याचे व्यवस्थापन नाही. परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे वास्तव्य करणाºयांचे आरोग्यही धोक्यात सापडले आहे.कुटुंबीय सतत दडपणाखालीपोलीस वसातहीला गाजर गवताने विळखा घातला आहे. त्यामुळे सरपटणाºया प्राण्याची सतत भीती असते. त्यात घरातील कर्ता पुरुष ड्युटीवर असतो. घरी केवळ महिला आणि मुले असतात. त्यांना जीव मुठीत घेऊन राहावे लागते. जनतेचे रक्षण करण्यात सदैव व्यस्त असलेल्या पोलीस कर्मचाºयांना घराकडेच लक्ष देण्यास वेळ मिळत नाही. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय सतत दडपणाखाली वावरते. कधी काय होईल, याचा कुणालाच भरवसा नसतो. ही समस्या कधी लोकप्रतिनिधींनी गंभीरपणपे घेतली नाही. त्यांनी नवीन पोलीस वसातहीसाठी कधी प्रयत्न केले नाही. त्यामुळे पोलीस वर्तुळातून खंत व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Policeपोलिस