शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

आजंतीत पाणीटंचाईचा रंगतोय राजकीय शिमगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:40 IST

पाणीटंचाईमुळे कुप्रसिद्ध झालेल्या आजंती(खाकी) येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र नळ जोडणी घेण्यास ग्रामस्थ उदासीन असल्याने टंचाई भासत आहे.

ठळक मुद्देनळ योजनेत मुबलक पाणी : नळ जोडणीसाठी उदासीनता

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पाणीटंचाईमुळे कुप्रसिद्ध झालेल्या आजंती(खाकी) येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र नळ जोडणी घेण्यास ग्रामस्थ उदासीन असल्याने टंचाई भासत आहे. गावातील विहिरींमध्ये नळ योजनेचे पाणी सोडून पुरवठा केला जात आहे. यावरून आजंतीतील पाणीटंचाई हा केवळ राजकीय शिमगा असल्याचे पुढे आले आहे.आजंती(खाकी) या गावात दोन किलोमीटर अंतरावर नळ योजनेची विहीर खोदली आहे. विहिरीला लागून मोठा बंधारा आहे. या बंधाऱ्यातही मुबलक पाणी आहे. नळ योजनेच्या विहिरीचे पाणी थेट गावातील विहिरीत सोडले जाते. संभाव्य पाणीटंचाई पाहता येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलस्वराज्य अंतर्गत दोन वर्षांपूर्वीच गावासाठी नळ योजनेची विहीर, पाईपलाईन व टाकीचे काम पूर्ण झाले. मात्र ग्रामस्थांनी नळ जोडणीच घेतली नाही. त्यामुळे या नळ योजनेत काही बिघाड आले आहे. पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी घरोघरी नळ जोडणी घेणे आवश्यक आहे. मात्र अनामत रक्कम भरावी लागत असल्याने कुणी नळ जोडणी घेतली नाही. आता ग्रामपंचायतीने अनामत रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी असतानाही येथे राजकीय शिमगा झाल्याने टंचाईचा उहापोह होत आहे.टँकरमुक्तीचा दावा खोटाआजंतीतील पाणीटंचाई राजकीय उद्देशाने मांडण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीने हे गाव टँकरमुक्त असल्याचा दावा केला. नऊ हातपंपांपैकी सहा सुरू असल्याचे अहवालात म्हटले. प्रत्यक्षात मात्र गावात आठ हातपंप बंद असून एक हातपंपातून जेमतेम पाणी येते. ४० खासगी विहिरींपैकी चार विहिरींनाच पाणी आहे. सार्वजनिक विहिरीतही एकाही विहिरीला पाणी नाही. टँकरद्वारे किंवा नळ योजनेचे पाणी या विहिरीत सोडले जाते. त्यामुळे सध्याचे पाणीटंचाईचे संकट निवळले आहे.संभाव्य पाणीटंचाईकडे बघून आजंतीमध्ये टँकर लावण्यात आले आहे. येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. गाव टँकरमुक्त असल्याचा अहवाल कुणालाच दिला नाही.- राजेंद्र राणे, सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभागनळ योजनेच्या विहिरीतून गावातील विहिरींमध्ये पाणी सोडले आहे. त्यातून ग्रामस्थ पाण्याची उचल करतात. नळ जोडणी घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गैरसोय टाळण्यासाठी टँकर लावले.- युवराज मेहत्रे, गटविकास अधिकारी, नेरगावात मुबलक पाणी आहे. नळ योजनेच्या विहिरीतही पाणीसाठा आहे. गावातील काही विघ्नसंतोषी पाण्याचे राजकारण करून बदनामी करत आहे. याऐवजी ग्रामस्थांनी नळ कनेक्शन घेण्याची गरज आहे.- भाग्यश्री गणेश राठोड,सरपंच, आजंती(खाकी) 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई