शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
3
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
4
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
5
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
6
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
7
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
8
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
9
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
10
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
11
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
12
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
13
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
14
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
15
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
16
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
17
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
18
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
19
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
20
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...

आजंतीत पाणीटंचाईचा रंगतोय राजकीय शिमगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:40 IST

पाणीटंचाईमुळे कुप्रसिद्ध झालेल्या आजंती(खाकी) येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र नळ जोडणी घेण्यास ग्रामस्थ उदासीन असल्याने टंचाई भासत आहे.

ठळक मुद्देनळ योजनेत मुबलक पाणी : नळ जोडणीसाठी उदासीनता

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पाणीटंचाईमुळे कुप्रसिद्ध झालेल्या आजंती(खाकी) येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र नळ जोडणी घेण्यास ग्रामस्थ उदासीन असल्याने टंचाई भासत आहे. गावातील विहिरींमध्ये नळ योजनेचे पाणी सोडून पुरवठा केला जात आहे. यावरून आजंतीतील पाणीटंचाई हा केवळ राजकीय शिमगा असल्याचे पुढे आले आहे.आजंती(खाकी) या गावात दोन किलोमीटर अंतरावर नळ योजनेची विहीर खोदली आहे. विहिरीला लागून मोठा बंधारा आहे. या बंधाऱ्यातही मुबलक पाणी आहे. नळ योजनेच्या विहिरीचे पाणी थेट गावातील विहिरीत सोडले जाते. संभाव्य पाणीटंचाई पाहता येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलस्वराज्य अंतर्गत दोन वर्षांपूर्वीच गावासाठी नळ योजनेची विहीर, पाईपलाईन व टाकीचे काम पूर्ण झाले. मात्र ग्रामस्थांनी नळ जोडणीच घेतली नाही. त्यामुळे या नळ योजनेत काही बिघाड आले आहे. पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी घरोघरी नळ जोडणी घेणे आवश्यक आहे. मात्र अनामत रक्कम भरावी लागत असल्याने कुणी नळ जोडणी घेतली नाही. आता ग्रामपंचायतीने अनामत रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी असतानाही येथे राजकीय शिमगा झाल्याने टंचाईचा उहापोह होत आहे.टँकरमुक्तीचा दावा खोटाआजंतीतील पाणीटंचाई राजकीय उद्देशाने मांडण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीने हे गाव टँकरमुक्त असल्याचा दावा केला. नऊ हातपंपांपैकी सहा सुरू असल्याचे अहवालात म्हटले. प्रत्यक्षात मात्र गावात आठ हातपंप बंद असून एक हातपंपातून जेमतेम पाणी येते. ४० खासगी विहिरींपैकी चार विहिरींनाच पाणी आहे. सार्वजनिक विहिरीतही एकाही विहिरीला पाणी नाही. टँकरद्वारे किंवा नळ योजनेचे पाणी या विहिरीत सोडले जाते. त्यामुळे सध्याचे पाणीटंचाईचे संकट निवळले आहे.संभाव्य पाणीटंचाईकडे बघून आजंतीमध्ये टँकर लावण्यात आले आहे. येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. गाव टँकरमुक्त असल्याचा अहवाल कुणालाच दिला नाही.- राजेंद्र राणे, सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभागनळ योजनेच्या विहिरीतून गावातील विहिरींमध्ये पाणी सोडले आहे. त्यातून ग्रामस्थ पाण्याची उचल करतात. नळ जोडणी घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गैरसोय टाळण्यासाठी टँकर लावले.- युवराज मेहत्रे, गटविकास अधिकारी, नेरगावात मुबलक पाणी आहे. नळ योजनेच्या विहिरीतही पाणीसाठा आहे. गावातील काही विघ्नसंतोषी पाण्याचे राजकारण करून बदनामी करत आहे. याऐवजी ग्रामस्थांनी नळ कनेक्शन घेण्याची गरज आहे.- भाग्यश्री गणेश राठोड,सरपंच, आजंती(खाकी) 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई