शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
3
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
4
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
5
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
6
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
7
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
8
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
9
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
10
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
11
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
12
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
13
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
14
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
15
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
16
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
17
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
18
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
19
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
20
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
Daily Top 2Weekly Top 5

आजंतीत पाणीटंचाईचा रंगतोय राजकीय शिमगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:40 IST

पाणीटंचाईमुळे कुप्रसिद्ध झालेल्या आजंती(खाकी) येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र नळ जोडणी घेण्यास ग्रामस्थ उदासीन असल्याने टंचाई भासत आहे.

ठळक मुद्देनळ योजनेत मुबलक पाणी : नळ जोडणीसाठी उदासीनता

किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पाणीटंचाईमुळे कुप्रसिद्ध झालेल्या आजंती(खाकी) येथील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला. प्रस्तुत प्रतिनिधीने प्रत्यक्ष गावात पाहणी केली असता येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. मात्र नळ जोडणी घेण्यास ग्रामस्थ उदासीन असल्याने टंचाई भासत आहे. गावातील विहिरींमध्ये नळ योजनेचे पाणी सोडून पुरवठा केला जात आहे. यावरून आजंतीतील पाणीटंचाई हा केवळ राजकीय शिमगा असल्याचे पुढे आले आहे.आजंती(खाकी) या गावात दोन किलोमीटर अंतरावर नळ योजनेची विहीर खोदली आहे. विहिरीला लागून मोठा बंधारा आहे. या बंधाऱ्यातही मुबलक पाणी आहे. नळ योजनेच्या विहिरीचे पाणी थेट गावातील विहिरीत सोडले जाते. संभाव्य पाणीटंचाई पाहता येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जलस्वराज्य अंतर्गत दोन वर्षांपूर्वीच गावासाठी नळ योजनेची विहीर, पाईपलाईन व टाकीचे काम पूर्ण झाले. मात्र ग्रामस्थांनी नळ जोडणीच घेतली नाही. त्यामुळे या नळ योजनेत काही बिघाड आले आहे. पाणीपुरवठा नियमित होण्यासाठी घरोघरी नळ जोडणी घेणे आवश्यक आहे. मात्र अनामत रक्कम भरावी लागत असल्याने कुणी नळ जोडणी घेतली नाही. आता ग्रामपंचायतीने अनामत रक्कम माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. पाणी असतानाही येथे राजकीय शिमगा झाल्याने टंचाईचा उहापोह होत आहे.टँकरमुक्तीचा दावा खोटाआजंतीतील पाणीटंचाई राजकीय उद्देशाने मांडण्यात आली. त्यानंतर पंचायत समितीने हे गाव टँकरमुक्त असल्याचा दावा केला. नऊ हातपंपांपैकी सहा सुरू असल्याचे अहवालात म्हटले. प्रत्यक्षात मात्र गावात आठ हातपंप बंद असून एक हातपंपातून जेमतेम पाणी येते. ४० खासगी विहिरींपैकी चार विहिरींनाच पाणी आहे. सार्वजनिक विहिरीतही एकाही विहिरीला पाणी नाही. टँकरद्वारे किंवा नळ योजनेचे पाणी या विहिरीत सोडले जाते. त्यामुळे सध्याचे पाणीटंचाईचे संकट निवळले आहे.संभाव्य पाणीटंचाईकडे बघून आजंतीमध्ये टँकर लावण्यात आले आहे. येथील नळ योजनेच्या विहिरीला मुबलक पाणी आहे. गाव टँकरमुक्त असल्याचा अहवाल कुणालाच दिला नाही.- राजेंद्र राणे, सहायक अभियंता, पाणीपुरवठा विभागनळ योजनेच्या विहिरीतून गावातील विहिरींमध्ये पाणी सोडले आहे. त्यातून ग्रामस्थ पाण्याची उचल करतात. नळ जोडणी घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. गैरसोय टाळण्यासाठी टँकर लावले.- युवराज मेहत्रे, गटविकास अधिकारी, नेरगावात मुबलक पाणी आहे. नळ योजनेच्या विहिरीतही पाणीसाठा आहे. गावातील काही विघ्नसंतोषी पाण्याचे राजकारण करून बदनामी करत आहे. याऐवजी ग्रामस्थांनी नळ कनेक्शन घेण्याची गरज आहे.- भाग्यश्री गणेश राठोड,सरपंच, आजंती(खाकी) 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई