शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

पाणीटंचाईमुळे नागरिकांनी केली जेसीबीची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 22:05 IST

पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट जीवन प्राधिकरणाच्या जेसीबीची तोडफोड करून संताप व्यक्त केला. विठ्ठलवाडी परिसरात ‘अमृत’ योजनेच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना सोमवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली.

ठळक मुद्देपाईपलाईन फोडली : संदीप टॉकीज परिसर, कंत्राटदारावर रोष

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी थेट जीवन प्राधिकरणाच्या जेसीबीची तोडफोड करून संताप व्यक्त केला. विठ्ठलवाडी परिसरात ‘अमृत’ योजनेच्या कामासाठी खोदकाम सुरू असताना सोमवारी दुपारी ३ वाजता ही घटना घडली.‘अमृत’ योजनेची पाईप लाईन टाकण्यासाठी शहरात जेसीबीने खोदकाम सुरू आहे. खोदकाम सुरू असताना विठ्ठलवाडीतील जुनी पाईप लाईन फुटली. यामुळे या परिसरातील नागरिकांना महिनाभरापासून पाणी मिळणे बंद झाले. पाईप लाईन दुरुस्त करण्यासाठी त्यांनी वारंवार प्राधिकरणाला साकडे घातले. मात्र अद्याप ती दुरुस्त करण्यात आली नाही. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी दुपारी जेसीबीची तोडफोड करून रोष व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच प्राधिकरणाच्या अधिकाºयांसह कंत्राटदाराने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यांनी नागरिकांचा रोष शमविण्याचा प्रयत्न केला. महिनाभरापासून विठ्ठलवाडी आणि गाडगेनगरातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. नागरिकांनी जीवन प्राधिकरण आणि कंत्राटदाराकडे पाईप लाईन दुरूस्तीची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे सोमवारी या परिसरात पाईप लाईन खोदण्यासाठी जेसीबी येताच नगरसेवक पिंटू बांगर व नागरिकांनी जेसीबी रोखून धरला. त्यांनी पुन्हा पाईप लाईन दुरूस्तीची मागणी केली. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही.यामुळे अखेर नागरिकांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी जेसीबीची तोडफोड करून संताप व्यक्त केला. हरगोविंद भुप्ता, रवी सूर्यवंशी, जी. व्ही. मानकर आदींनी कंत्राटदाराच्या कामावर आणि प्राधिकरणाच्या निष्काळजीपणावर तीव्र रोष व्यक्त केला.प्राधिकरणाला सुनावले, जेलभरोची तयारीजीवन प्राधिकरण आणि कंत्राटदार नागरिकांचा विचार करीत नाही. महिनाभरापासून नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहे. मात्र पाईप नाही, बेंड नाही, कामगार नाही, मशीन नाही, अशी विविध कारणे सांगून दुरूस्ती टाळली जात आहे. त्यामुळे पाईपलाईन उखडून फेका, असे नागरिकांनी सुनावले. पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याने आम्ही ‘जेलभरो’ आंदोलन करायला तयार असल्याचे सुरेखा दहिकर, विद्या पाटील, शांता वानखडे, स्वाती घुले, वैशाली शेंडे, गीता मडावी आदींनी सांगितले.सहा महिन्यांपासून प्राधिकरणाचे कवडीचेही लक्ष नाही. शेकडो तक्रारी करूनही दखल घेतली जात नाही. पाईप नसल्याचे कारण सांगून काम थांबविले. कामाच्या चुकीच्या पद्धतीने पाईप लाईन फुटत आहे. यातून नागरिकांचा संयम ढळला.- पिंटू बांगर,नगरसेवक, विठ्ठलवाडी.मुख्य पाईप लाईन टाकण्यासाठी नाली खोदली जात आहे. त्याच ठिकाणावरून जुनी पाईपलाईन गेली. यात अमृतच्या कंत्राटदाराला काम करण्यास विलंब झाला. त्यांना काळजीपूर्वक तसेच वेगाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहे.- राजेंद्र अजापुंजे,अभियंता जीवन प्राधिकरण, यवतमाळपाईपचा तुटवडा असल्याने कामास विलंब झाला. कामगारांना क्रमाक्रमाने काम करण्याच्या सूचना आहे. मात्र त्यांनी सर्वच ठिकाणी एकाचवेळी खोदकाम केले. आता लवकरच हे काम पूर्ण होईल.- स्वप्नील घनकर,कंत्राटदार, अमृत योजना