शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वन खात्याच्या फौजेला वाघिणीची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:48 IST

गेल्या काही महिन्यात अनेकांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघिणीच्या शोधार्थ ३० ते ४० वन कर्मचाºयांची फौज जंगलात राबते आहे, तिचे लोकेशन मिळविण्यासाठी ६० ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत.

ठळक मुद्दे६० ट्रॅप कॅमेरातही दर्शन नाही : दोन महिने प्रयत्नांची पराकाष्ठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या काही महिन्यात अनेकांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघिणीच्या शोधार्थ ३० ते ४० वन कर्मचाºयांची फौज जंगलात राबते आहे, तिचे लोकेशन मिळविण्यासाठी ६० ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही वाघिणी वन खात्याला हुलकावणी देत असल्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही या ‘रेस्क्यु आॅपरेशन’ला यश येताना दिसत नाही.पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाऱ्या राळेगाव तालुक्याच्या सखी कृष्णापूर गावात वाघाने शेतकºयाची शिकार केली होती. त्यावेळी संतप्त जमावाने उपविभागीय महसूल अधिकाºयाचे वाहन पेटविले होते. त्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पांढरकवडा वन विभागांतर्गत सात ते आठ बळी गेले असताना वन खात्याकडून या हिंस्त्र वाघाचा गांभीर्याने शोध घेतला जात नाही, अशी त्यावेळी नागरिकांची ओरड होती. त्यानंतर पांढरकवडा उपवनसंरक्षक म्हणून रुजू झालेल्या थेट भारतीय वन सेवेच्या महिला अधिकारी के.अभर्णा यांनी वाघाची शोध मोहीम हाती घेतली. सुरुवातीला ठसे, विष्ठा, लाळ यावरुन शिकार करणारा तो वाघ नव्हे तर पट्टेदार वाघीण असल्याची ओळख शास्त्रोक्तपद्धतीने पटविण्यात आली. त्यानंतर वाघिणीला पकडण्यासाठी खास व्युहरचना करण्यात आली. त्यासाठी यवतमाळ, पुसद, अकोला वन विभागातील सुमारे ३० ते ४० विशेष कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले. त्यात वाघाशी संबंधित प्रशिक्षण घेतलेल्या वनपाल-वनरक्षकांचा समावेश आहे. सोबतीला विविध लोकेशनवर ६० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. चार ते पाच ठिकाणी मचान बांधले गेले, सखी आणि उमरी या गावांमध्ये २५ ते ३० कर्मचाऱ्यांचा बेस कॅम्प लावण्यात आला. वन खात्याची ही फौज दोन महिन्यांपासून पांढरकवडा वन विभागातील जंगलात गस्त घालत आहे. स्वत: आयएफएस के. अभर्णा रात्री केव्हाही जंगलात जाऊन या मोहिमेची पाहणी करीत आहे. स्वत: गस्त घालत आहे. त्यांचे परिश्रम पाहून गावकरीही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. हेच प्रयत्न दोन वर्षाआधी झाले असते तर आतापर्यंत वाघ पकडला जाऊन इतरांचे प्राण वाचले असते, असा गावकऱ्यांचा सूर आहे. ट्रॅप कॅमेरातील चीप दररोज सकाळी काढून संशयित वाघ ट्रेस झाला का हे तपासले जात आहे. परंतु सदर वाघीण सतत लोकेशन बदलवित आहे, ज्या मार्गाने ती एकदा गेली त्या मार्गाने ती पुन्हा येत नसल्याचे निरीक्षक वन अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. जंगलात राबणाऱ्या या वन कर्मचाºयांना भोजन व निवासाची व्यवस्था पंचायत समिती सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे. आयएफएस के. अर्भणा यांच्या नेतृत्वातील वाघ पकडण्याच्या या मोहिमेवर यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण लक्ष ठेऊन आहेत. ते स्वत:ही जंगलात जात असल्याचे वन खात्यातून सांगण्यात आले. वाघिणीच्या हुलकावणीमुळे सध्या तरी तिला पकडण्याचे आव्हान वन खात्यापुढे आहे.