शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

वन खात्याच्या फौजेला वाघिणीची हुलकावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 23:48 IST

गेल्या काही महिन्यात अनेकांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघिणीच्या शोधार्थ ३० ते ४० वन कर्मचाºयांची फौज जंगलात राबते आहे, तिचे लोकेशन मिळविण्यासाठी ६० ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत.

ठळक मुद्दे६० ट्रॅप कॅमेरातही दर्शन नाही : दोन महिने प्रयत्नांची पराकाष्ठा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गेल्या काही महिन्यात अनेकांची शिकार करणाऱ्या पट्टेदार वाघिणीच्या शोधार्थ ३० ते ४० वन कर्मचाºयांची फौज जंगलात राबते आहे, तिचे लोकेशन मिळविण्यासाठी ६० ट्रॅप कॅमेरेही लावले आहेत. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ही वाघिणी वन खात्याला हुलकावणी देत असल्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही या ‘रेस्क्यु आॅपरेशन’ला यश येताना दिसत नाही.पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाऱ्या राळेगाव तालुक्याच्या सखी कृष्णापूर गावात वाघाने शेतकºयाची शिकार केली होती. त्यावेळी संतप्त जमावाने उपविभागीय महसूल अधिकाºयाचे वाहन पेटविले होते. त्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. पांढरकवडा वन विभागांतर्गत सात ते आठ बळी गेले असताना वन खात्याकडून या हिंस्त्र वाघाचा गांभीर्याने शोध घेतला जात नाही, अशी त्यावेळी नागरिकांची ओरड होती. त्यानंतर पांढरकवडा उपवनसंरक्षक म्हणून रुजू झालेल्या थेट भारतीय वन सेवेच्या महिला अधिकारी के.अभर्णा यांनी वाघाची शोध मोहीम हाती घेतली. सुरुवातीला ठसे, विष्ठा, लाळ यावरुन शिकार करणारा तो वाघ नव्हे तर पट्टेदार वाघीण असल्याची ओळख शास्त्रोक्तपद्धतीने पटविण्यात आली. त्यानंतर वाघिणीला पकडण्यासाठी खास व्युहरचना करण्यात आली. त्यासाठी यवतमाळ, पुसद, अकोला वन विभागातील सुमारे ३० ते ४० विशेष कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले. त्यात वाघाशी संबंधित प्रशिक्षण घेतलेल्या वनपाल-वनरक्षकांचा समावेश आहे. सोबतीला विविध लोकेशनवर ६० ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहे. चार ते पाच ठिकाणी मचान बांधले गेले, सखी आणि उमरी या गावांमध्ये २५ ते ३० कर्मचाऱ्यांचा बेस कॅम्प लावण्यात आला. वन खात्याची ही फौज दोन महिन्यांपासून पांढरकवडा वन विभागातील जंगलात गस्त घालत आहे. स्वत: आयएफएस के. अभर्णा रात्री केव्हाही जंगलात जाऊन या मोहिमेची पाहणी करीत आहे. स्वत: गस्त घालत आहे. त्यांचे परिश्रम पाहून गावकरीही सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. हेच प्रयत्न दोन वर्षाआधी झाले असते तर आतापर्यंत वाघ पकडला जाऊन इतरांचे प्राण वाचले असते, असा गावकऱ्यांचा सूर आहे. ट्रॅप कॅमेरातील चीप दररोज सकाळी काढून संशयित वाघ ट्रेस झाला का हे तपासले जात आहे. परंतु सदर वाघीण सतत लोकेशन बदलवित आहे, ज्या मार्गाने ती एकदा गेली त्या मार्गाने ती पुन्हा येत नसल्याचे निरीक्षक वन अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. जंगलात राबणाऱ्या या वन कर्मचाºयांना भोजन व निवासाची व्यवस्था पंचायत समिती सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे. आयएफएस के. अर्भणा यांच्या नेतृत्वातील वाघ पकडण्याच्या या मोहिमेवर यवतमाळचे मुख्य वनसंरक्षक जी.टी. चव्हाण लक्ष ठेऊन आहेत. ते स्वत:ही जंगलात जात असल्याचे वन खात्यातून सांगण्यात आले. वाघिणीच्या हुलकावणीमुळे सध्या तरी तिला पकडण्याचे आव्हान वन खात्यापुढे आहे.