शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

विविध अनुदान योजनेत केंद्राकडून होतेय कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2015 02:33 IST

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वाट्यात केंद्र सरकारने कपात केल्याने

दारव्हा : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वाट्यात केंद्र सरकारने कपात केल्याने आता अनुदानाच्या रकमेचा अर्धा भार राज्यावर पडणार आहे. त्यामुळे योजनांचे अनुदान वेळेवर मिळेल की नाही, या बाबत शेतकऱ्यांमध्ये काळजी दिसून येत आहे.शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा या दृष्टीने तसेच सिंचनाकरिता पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा यासाठी ठिबक, स्प्रिंकलर यासह विविध बाबींना शासनाकडून अनुदान देण्यात येते. यापूर्वी केंद्राकडून ठिबक, स्प्रिंकलरसाठी अनुदानाच्या ८० टक्के तर राज्य शासनाकडून २० टक्के निधी देण्यात येत होता. परंतु केंद्र सरकारने या निधीमध्ये ३० टक्के कपात केली आहे. आता ५० टक्के केंद्र सरकार व ५० टक्के राज्य सरकार अनुदान देणार आहे. परिणामी हे अनुदान वेळेत मिळणार का, या बाबत शेतकरीवर्गात साशंकता निर्माण होवू लागली आहे.दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. कोरडवाहू शेतीची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे विहीर किंवा तत्सम ओलिताची थोडीफार सोय आहे अशा शेतकरीवर्ग आता पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा या दृष्टीने ठिबक, स्प्रिंकलरकडे वळत आहे. शासनाकडून सर्वसाधारण शेतकऱ्यांना ५० टक्के तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देते. सुरुवातीला शेतकऱ्यांनी स्वत: पूर्ण संच खरेदी करावा लागतील. त्यानंतर कृषी विभागाकडून पाहणीनंतर अनुदानाची रक्कम थेट धनादेशाद्वारे शेतकऱ्यांना मिळते.ठिबक, स्प्रिंकलर शिवाय इतर भरपूर कृषी उपयोगी वस्तू, साधने, यंत्रेसुद्धा अनुदानावर कृषी विभागामार्फत पुरविल्या जातात. या अनुदानासाठी काही वस्तूंसाठी केंद्र ८० टक्के, ७५ टक्के असा निधी पुरवित होती. मात्र यात आता केंद्राने कपात केल्याने राज्य शासनावर त्याचा भार पडणार आहे. येणाऱ्या काळात हे अनुदान वेळेवर उपलब्ध होईल काय, या बाबत शेतकरीवर्गात उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)