शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
3
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
4
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
5
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
7
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
8
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
9
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
10
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
11
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
12
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
13
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
14
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
15
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
16
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
17
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
18
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
19
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
20
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

विविध अनुदान योजनेत केंद्राकडून होतेय कपात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2015 02:33 IST

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वाट्यात केंद्र सरकारने कपात केल्याने

दारव्हा : कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या वाट्यात केंद्र सरकारने कपात केल्याने आता अनुदानाच्या रकमेचा अर्धा भार राज्यावर पडणार आहे. त्यामुळे योजनांचे अनुदान वेळेवर मिळेल की नाही, या बाबत शेतकऱ्यांमध्ये काळजी दिसून येत आहे.शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा या दृष्टीने तसेच सिंचनाकरिता पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा यासाठी ठिबक, स्प्रिंकलर यासह विविध बाबींना शासनाकडून अनुदान देण्यात येते. यापूर्वी केंद्राकडून ठिबक, स्प्रिंकलरसाठी अनुदानाच्या ८० टक्के तर राज्य शासनाकडून २० टक्के निधी देण्यात येत होता. परंतु केंद्र सरकारने या निधीमध्ये ३० टक्के कपात केली आहे. आता ५० टक्के केंद्र सरकार व ५० टक्के राज्य सरकार अनुदान देणार आहे. परिणामी हे अनुदान वेळेत मिळणार का, या बाबत शेतकरीवर्गात साशंकता निर्माण होवू लागली आहे.दिवसेंदिवस वातावरणात बदल होत आहे. कोरडवाहू शेतीची शेतकऱ्यांनी धास्ती घेतली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे विहीर किंवा तत्सम ओलिताची थोडीफार सोय आहे अशा शेतकरीवर्ग आता पाण्याचा कार्यक्षम वापर व्हावा या दृष्टीने ठिबक, स्प्रिंकलरकडे वळत आहे. शासनाकडून सर्वसाधारण शेतकऱ्यांना ५० टक्के तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदान देते. सुरुवातीला शेतकऱ्यांनी स्वत: पूर्ण संच खरेदी करावा लागतील. त्यानंतर कृषी विभागाकडून पाहणीनंतर अनुदानाची रक्कम थेट धनादेशाद्वारे शेतकऱ्यांना मिळते.ठिबक, स्प्रिंकलर शिवाय इतर भरपूर कृषी उपयोगी वस्तू, साधने, यंत्रेसुद्धा अनुदानावर कृषी विभागामार्फत पुरविल्या जातात. या अनुदानासाठी काही वस्तूंसाठी केंद्र ८० टक्के, ७५ टक्के असा निधी पुरवित होती. मात्र यात आता केंद्राने कपात केल्याने राज्य शासनावर त्याचा भार पडणार आहे. येणाऱ्या काळात हे अनुदान वेळेवर उपलब्ध होईल काय, या बाबत शेतकरीवर्गात उत्सुकता लागली आहे. (प्रतिनिधी)