शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 05:00 IST

गुरुवारी यवतमाळसह पुसद, महागाव, वणी, मारेगाव, दारव्हा आदी तालुक्यांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर शुक्रवारीसुद्धा जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी पाऊस कोसळला. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. मारेगाव, पुसद, महागाव, कळंब, आर्णी, दारव्हा, पांढरकवडा, वणी, राळेगाव आदी तालुक्यांत वादळी पावसाने होत्याचे नव्हते केले. 

ठळक मुद्देहातात आलेले पीक नष्ट : गहू, हरभऱ्याच्या गंज्या झाल्या ओल्या, केसर आंबा, पपईला फटका

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सतत वादळी-वाऱ्यासह अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी संपूर्ण जिल्ह्यातच वादळी पावसाने हजेरी लावली. या पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. हातात आलेले पीक डोळ्यादेखत नष्ट होत असल्याचे बघून शेतकरी हतबल झाले. जिल्ह्यात गुरुवारपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. गुरुवारी यवतमाळसह पुसद, महागाव, वणी, मारेगाव, दारव्हा आदी तालुक्यांमध्ये तुरळक पावसाने हजेरी लावली. त्यानंतर शुक्रवारीसुद्धा जिल्ह्याच्या अनेक भागांत वादळी पाऊस कोसळला. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास जिल्ह्यात सर्वत्र वादळी पावसाने हजेरी लावली. यावेळी विजांचा प्रचंड कडकडाट सुरू होता. मारेगाव, पुसद, महागाव, कळंब, आर्णी, दारव्हा, पांढरकवडा, वणी, राळेगाव आदी तालुक्यांत वादळी पावसाने होत्याचे नव्हते केले. अवकाळी पावसामुळे शेतात गंजी लावून ठेवलेले गहू आणि हरभऱ्याचे पीक ओले झाले. शेतात उभा असलेला गहू आणि हरभरा पिकालाही फटका बसला. काही तालुक्यांत वादळामुळे गहू आडवा झाला. हरभऱ्याच्या घाट्या फुटून शेतकऱ्यांचे नुकसान झाले. संत्रा, पपई, केळी व आंबा पिकांनाही वादळ व अवकाळी पावसाचा फटका बसला. अनेक झाडांवरील कैऱ्या गळून पडल्या. केळी व पपईची झाडेसुद्धा मोडली. संत्रा पिकाचेही नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले. यावर्षी सुरुवातीपासूनच बळीराजावर संकटाची मालिका सुरू आहे. त्यातून सावरत असताना आता पुन्हा वादळासह पावसाने तडाखा दिल्याने शेतकरी हतबल झाले आहे. दारव्हा तालुक्यात शनिवारी कोसळलेल्या पावसाने खोपडी शिवारातील शेतकऱ्यांना चांगलाच फटका बसला. या परिसरात शेतकरी दत्तात्रय राहणे यांनी मोठा खर्च करून केसर आंब्याची लागवड केली आहे. काही फळे यापूर्वी पोपटांनी फस्त केली. आता त्यांनी झाडाला फिशनेटचे संरक्षण दिले. मात्र, वादळामुळे त्यांच्या शेतातील केसर आंब्याची वृक्ष मोडून पडली. झाडावरील कैऱ्याही गळाल्या. महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनाही वादळ आणि अवकाळी पावसाचा तडाखा बसला. तालुक्यातील गहू, मका, उन्हाळी ज्वारी, हरभरा, केळी, पपई व भाजीपाल्याला फटका बसला. या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी हतबल झाले. वीट कारखानदारांनाही पावसाचा फटका बसला. खरिपानंतर रबी हंगामातील पीक हातून जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले.

सावंगी पेरका येथे  सहा जनावरे ठार  राळेगाव : तालुक्याला शनिवारी वादळाने चांगलाच तडाखा दिला. यामुळे अनेक खांबांवरील वीज तार तुटले. सावंगी पेरका येथे रविवारी सकाळी याच वीज तारांचा स्पर्श झाल्याने सहा जनावरे जागीच ठार झाली. शेतकरी अशोक महाजन यांच्या मालकीची ही जनावरे होती. त्यांनी याबाबत तहसीलदार व पोलीस ठाण्याला माहिती दिली. तसेच त्वरित नुकसानभरपाई देण्याची मागणी केली. 

संपूर्ण जिल्ह्यात वीज गुल, ग्रामीण भाग अंधारातच  शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास वादळामुळे यवतमाळसह अनेक तालुक्यांतील वीज तारा तुटल्या. यामुळे संपूर्ण जिल्ह्यातच काही काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. यवतमाळ शहरातही वीज गुल झाली होती. काही तालुक्यांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली. रविवार सुटीचा दिवस असल्याने नेमक्या हानीची माहिती मिळू शकली नाही. प्रशासनासोबत संपर्क साधला असता कोणतीही माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

 

टॅग्स :Rainपाऊस