शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

सावधान! उष्णतेचा धोका ६६ आरोग्य केंद्रात विशेष कक्ष

By विशाल सोनटक्के | Updated: April 5, 2023 18:57 IST

 वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

यवतमाळ : वातावरणातील बदलाच्या परिणामामुळे उष्णतेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. यंदाही वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताचा धोका संंभवत असून नागरिकांना तत्काळ उपचार मिळावे यासाठी जिल्ह्यातील ६६ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात विशेष कक्ष तयार करण्यात आला आहे. येथील जिल्हा नियोजन सभागृहात आरोग्य विभागामार्फत वैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित कार्यशाळेत ही माहिती देण्यात आली.

वातावरणातील बदलाबाबत जागृती निर्माण करणे, आरोग्य संस्था वातावरणातील बदलासाठी अधिक सक्षम करणे, त्यासाठीची आवश्यक ती तयारी आणि मनुष्यबळ प्रशिक्षित करण्याचा एकभाग म्हणून बुधवारी ही कार्यशाळा घेण्यात आली. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी प्रा. डॉ. सचिन दिवेकर व ङॉ. विजय डोंपले यांनी पॉवरपॉईंटद्वारे सादरीकरण केले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी.एस. चव्हाण व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर.डी. राठोड यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. वातावरणातील बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रम आरोग्य अभियानामध्ये या विषयाचा २०२१ मध्येच समावेश करण्यात आला आहे. वातावरणातील बदलाला संवेदनशील असणाऱ्या आजारांना समर्थपणे तोंड देता याावे यासाठी सर्व नागरिकांसाठी आणि विशेषत: लहान मुले, स्त्रीया, वृद्ध, आदिवासी आणि परिघावरील जनसमुहासाठी आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यात येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. वाढत्या उष्णतेचा असा करावा सामनाउष्णतेमुळे उष्माघाताचा धोका संभवतो. चक्कर येणे, सुस्त वाटणे, त्वचा लालसर होणे, मळमळ, उलट्या होणे, हृदयाचे ठोके वाढणे आदी उष्माघाताची लक्षणे आहे. नागरिकांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी भरपूर पाणी, सरबत प्यावे, सैल कपडे घालावे, उन्हात जाताना रुमाल-टोपी, छत्रीचा वापर करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. कार्यशाळेला  मधुकर मडावी, डॉ. शाहू, डॉ. स्मिता पेठकर, डॉ. निलेश लिचडे आदींसह वैद्यकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

 

टॅग्स :Yavatmalयवतमाळ