शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

गुजरातच्या मिठामुळे काळवंडतेय पोषण आहाराची खिचडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 04:55 IST

मागील वर्षी तूरडाळ महागल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला फटका बसला होता.

- अविनाश साबापुरे यवतमाळ : मागील वर्षी तूरडाळ महागल्याने विद्यार्थ्यांच्या पोषण आहाराला फटका बसला होता. यंदा तूरडाळीसह तांदळाचीही चंगळ असली, तरी गुजरातच्या मिठामुळे खिचडी काळीकुट्ट होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शाळेतली खिचडी काळी होत असून आता विद्यार्थीही त्याला नाक मुरडत आहेत.राज्यातील ८६ हजार ४३९ शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. १ कोटी १२ लाख ८१ हजार ७७२ विद्यार्थ्यांची या योजनेत नोंद आहे. परंतु, केंद्र पुरस्कृत असलेल्या या योजनेत आता गुजरातमधून येणारे ठराविकच मीठ वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. या मिठामुळे प्रत्येक शाळेतली खिचडी काळी होत असल्याने विद्यार्थी ती खाण्यास नकार देत आहेत.शालेय पोषण आहारातून विद्यार्थ्यांना आयोडीन, आयर्न मिळाले पाहिजे, यासाठी शिक्षण विभागाने गुजरातमध्ये तयार होणारे‘डबल फोर्टिफाइड’ मीठच वापरण्याचे आदेश दिले आहेत.‘श्री सॉल्ट’ नावाचे हे मीठ गुजरातमधील चोपाडवा येथील केम फूड प्रा. लि. कंपनीने उत्पादित केलेले आहे.