शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

वन्यप्राण्यांच्या त्रासाने कोवळ्या पिकांचे नुकसान

By admin | Updated: July 25, 2015 02:47 IST

तालुक्यात सध्या रानडुक्कर अणि रोह्यांच्या त्रासाने शेतकरी बेजार झाले आहेत. एकीकडे पावसाने उशिरा येऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.

वनविभागाचे दुर्लक्ष : रोही, रानडुकरांचा हैदोसनेर : तालुक्यात सध्या रानडुक्कर अणि रोह्यांच्या त्रासाने शेतकरी बेजार झाले आहेत. एकीकडे पावसाने उशिरा येऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्याचवेळी वन्यप्राण्यांच्या वाढलेल्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहेत.जंगली श्वापदांद्वारे शेतातील पिके फस्त करण्यात येत आहे. त्यामुळे कास्तकारांसमोर नवीनच संकट उभे राहिले आहे. यातच मोझर, मांगलादेवी, कोलुरा, उत्तरवाढोणा, सोनखास, बाणगाव या परिसरात नुकत्याच उगवलेल्या शेतपिकांच्या अंकुरांवर वन्यप्राण्यांनी डल्ला मारणे सुरू केले आहे. आधीच कोरड्या दुष्काळाशी दोन हात करीत असलेला शेतकरी वन्यप्राण्यांमुळे अधिकच मोठ्या संकटात सापडलेला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज डोक्यावर असताना वन्यप्राणी पीक उद्ध्वस्त करीत आहे. त्यामुळे पुन्हा शेती कशी करावी, हे संकट शेतकऱ्याच्या डोक्यावर घोंघावत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी वनविभागाकडेही तक्रारी दाखल केल्या आहेत. वनविभागाने यावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. वन्यप्राण्यांनी ज्या शेतात नुकसान केले आहे, त्या शेतांची पाहणी करून संबंधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे. जंगल श्वापदांचा कायमचा बंदोबस्त करावा, तसेच कुंपणाची व्यवस्था करण्यासाठी शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याची मागणीही करण्यात आली आहे. परिसरातील शेतशिवारांमध्येही रोही आणि रानडुकरांनी हैदोस घातला असून सोयाबीन, कपाशी आदी पिकांची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवरातील शेतपिकांची मोक्कापाहणी करून शेतकरी वर्गाला नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)