शहरं
Join us  
Trending Stories
1
"धमकी देणं एका उपमुख्यमंत्र्यांना शोभतं का? त्या महिलेची..."; अंजली दमानिया अजित पवारांवर भडकल्या
2
ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत राहिले अन् भारताने सिंगापूरसोबत अब्जावधीचे ५ मोठे करार केले...
3
ADR चा धक्कादायक रिपोर्ट! मंत्र्यांकडे २३,९२९ कोटींची माया, ४७ टक्के मंत्र्यांवर ३०२ चे गुन्हे
4
अनिल अंबानींच्या अडचणी वाढल्या; आणखी एका सरकारी बँकेनं 'फ्रॉड'चा ठपका ठेवला, शेअर आपटला
5
आजचे राशीभविष्य, ५ सप्टेंबर २०२५: प्रवासाचे बेत, प्रियव्यक्तीचा सहवास पण वाणीवर संयम ठेवा !
6
अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी
7
मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही’; CM देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
8
पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये महिन्याला जमा करा ₹४०००; मिळेल ₹४५,४५९ चा गॅरेंटिड रिटर्न, पाहा संपूर्ण गणित
9
भारतातील जोडप्यांना मुले जन्माला घालण्यास आवडेना; पाच दशकांत जन्मदरात मोठी घट
10
'लव्ह अँड वॉर'मध्ये दिसणार एकत्र, राहाला कसा वेळ देतात रणबीर-आलिया? अभिनेत्री म्हणाली...
11
रॉस टेलरने निवृत्ती घेतली मागे, न्यूझीलंड सोडून बाहेर पडला, आता 'या' देशाकडून खेळणार क्रिकेट
12
Share Market: शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला; निफ्टीही वाढला; 'हे' स्टॉक्स चमकले
13
GST बदल! माझ्या कुटुंबाला फायदा किती?; मासिक बजेटवरचा भार हलका होणार, गणित समजून घ्या
14
अरे देवा, खूपच वाईट! आधी २ वर्षाच्या मुलाला १३व्या मजल्यावरून फेकले, नंतर आईने मारली उडी
15
जीएसटीतील बदलामुळे सामान्यांचा मोठा फायदा; अर्थव्यवस्थेलाही मिळेल बूस्टर, PM मोदींना विश्वास
16
अभिनेत्रीच्या जुळ्या मुली अन् आईवडील हिमाचलमध्ये अडकले; म्हणाली, "चार दिवसांपासून..."
17
शिक्षणाच्या दर्जात आयआयटी मद्रास अव्वलच...; क्रमवारीत आयआयटी बॉम्बे तिसऱ्या स्थानावर
18
यू टर्न की मास्टरस्ट्रोक? जनतेच्या खिशातून अधिकचेच पैसे काढले; ८ वर्षांनी सरकारच्या लक्षात आले
19
मराठा, ओबीसी आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमित्यांचे कार्य समांतर - चंद्रशेखर बावनकुळे
20
कुजबुज! राज ठाकरेंचं एवढेच वाक्य वादळ ठरले; शिंदेसेनेच्या आमदाराने लगावला टोला, "आधी लोकांमधून.."

८१४ गावांवर टंचाईचे सावट

By admin | Updated: January 4, 2015 23:19 IST

जिल्ह्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसाने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या असून प्रशासनाच्या लेखी ८१४ गावांत टंचाई निर्माण होणार आहे. त्यासाठी एक हजार ७३ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे.

१० कोटींचा आराखडा मंजूर : एक हजारांवर उपाययोजना यवतमाळ : जिल्ह्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसाने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या असून प्रशासनाच्या लेखी ८१४ गावांत टंचाई निर्माण होणार आहे. त्यासाठी एक हजार ७३ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. पाणी टंचाई निवारणार्थ दहा कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र या उपाययोजनांची कितपत अमलबजावणी होते यावर पाणी टंचाई निवारणाचे भविष्य अवलंबुन आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील ८१४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवणार आहे. याबाबतचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. याच्या अमलबजावणीचे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील १८६ गावामधील वाडी, वस्त्या आणि पोडावर १९० विंधन विहिरींची दुरूस्त करण्यात येणार आहे. यासोबत विहिरींचे खोलीकरण आणि दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील २३ गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरक नळयोजना सुचविण्यात आली आहे. त्यासाठी ५९ लाख रूपयांचा निधी आवश्यक आहे. १९९ गावांमध्ये नळयोजनेसाठी विशेष दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. अर्धवट असलेल्या नळयोजनांचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. या नळयोजना पूर्ण करण्यासाठी पाच कोटी १३ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ८० हजार रूपयांचा निधीची गरज आहे. २४४ गावांमध्ये सार्वजनिक विहिरींमध्ये पाण्याचा थेंबही नाही. त्या हिवाळ्यातच कोरड्या पडल्या आहे. या गावांसाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. यासाठी ५१६ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या उपाययोजनेच्या पुर्ततेसाठी दोन कोटी १२ लाख ७० हजार रुपयांचा निधी लागणार असून निधी मंजूर केला आहे.२० गावांतील विहिरींमध्ये पाण्याचा साठा भरपूर असला तरी या विहिरींमध्ये गाळ साचला आहे. हा गाळ काढल्यास तेथील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी पाच लाख पाच हजार रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील १२२ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडांवर खासगी विहीर अधिग्रहण करावे अशी परिस्थिती नाही. यासाठी बाहेर गावावरून टँकर अथवा बैलगाडीच्या मदतीने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्याकरिता ९८ लाख ८५ हजार रूपयांचा निधी लागणार आहे. हा निधी मंजूर करण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)