शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

८१४ गावांवर टंचाईचे सावट

By admin | Updated: January 4, 2015 23:19 IST

जिल्ह्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसाने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या असून प्रशासनाच्या लेखी ८१४ गावांत टंचाई निर्माण होणार आहे. त्यासाठी एक हजार ७३ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे.

१० कोटींचा आराखडा मंजूर : एक हजारांवर उपाययोजना यवतमाळ : जिल्ह्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसाने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या असून प्रशासनाच्या लेखी ८१४ गावांत टंचाई निर्माण होणार आहे. त्यासाठी एक हजार ७३ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. पाणी टंचाई निवारणार्थ दहा कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र या उपाययोजनांची कितपत अमलबजावणी होते यावर पाणी टंचाई निवारणाचे भविष्य अवलंबुन आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील ८१४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवणार आहे. याबाबतचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. याच्या अमलबजावणीचे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील १८६ गावामधील वाडी, वस्त्या आणि पोडावर १९० विंधन विहिरींची दुरूस्त करण्यात येणार आहे. यासोबत विहिरींचे खोलीकरण आणि दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील २३ गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरक नळयोजना सुचविण्यात आली आहे. त्यासाठी ५९ लाख रूपयांचा निधी आवश्यक आहे. १९९ गावांमध्ये नळयोजनेसाठी विशेष दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. अर्धवट असलेल्या नळयोजनांचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. या नळयोजना पूर्ण करण्यासाठी पाच कोटी १३ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ८० हजार रूपयांचा निधीची गरज आहे. २४४ गावांमध्ये सार्वजनिक विहिरींमध्ये पाण्याचा थेंबही नाही. त्या हिवाळ्यातच कोरड्या पडल्या आहे. या गावांसाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. यासाठी ५१६ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या उपाययोजनेच्या पुर्ततेसाठी दोन कोटी १२ लाख ७० हजार रुपयांचा निधी लागणार असून निधी मंजूर केला आहे.२० गावांतील विहिरींमध्ये पाण्याचा साठा भरपूर असला तरी या विहिरींमध्ये गाळ साचला आहे. हा गाळ काढल्यास तेथील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी पाच लाख पाच हजार रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील १२२ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडांवर खासगी विहीर अधिग्रहण करावे अशी परिस्थिती नाही. यासाठी बाहेर गावावरून टँकर अथवा बैलगाडीच्या मदतीने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्याकरिता ९८ लाख ८५ हजार रूपयांचा निधी लागणार आहे. हा निधी मंजूर करण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)