शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

८१४ गावांवर टंचाईचे सावट

By admin | Updated: January 4, 2015 23:19 IST

जिल्ह्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसाने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या असून प्रशासनाच्या लेखी ८१४ गावांत टंचाई निर्माण होणार आहे. त्यासाठी एक हजार ७३ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे.

१० कोटींचा आराखडा मंजूर : एक हजारांवर उपाययोजना यवतमाळ : जिल्ह्यात यंदा झालेल्या अपुऱ्या पावसाने पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागल्या असून प्रशासनाच्या लेखी ८१४ गावांत टंचाई निर्माण होणार आहे. त्यासाठी एक हजार ७३ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहे. पाणी टंचाई निवारणार्थ दहा कोटी रुपयांच्या कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे. मात्र या उपाययोजनांची कितपत अमलबजावणी होते यावर पाणी टंचाई निवारणाचे भविष्य अवलंबुन आहे.जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला. परिणामी जिल्ह्यातील ८१४ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवणार आहे. याबाबतचा अंतिम अहवाल जिल्हा प्रशासनाने तयार केला आहे. याच्या अमलबजावणीचे आदेश जिल्हा परिषदेला देण्यात आले आहे. या योजने अंतर्गत जिल्ह्यातील १८६ गावामधील वाडी, वस्त्या आणि पोडावर १९० विंधन विहिरींची दुरूस्त करण्यात येणार आहे. यासोबत विहिरींचे खोलीकरण आणि दुरुस्तीसाठी एक कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील २३ गावामध्ये पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पुरक नळयोजना सुचविण्यात आली आहे. त्यासाठी ५९ लाख रूपयांचा निधी आवश्यक आहे. १९९ गावांमध्ये नळयोजनेसाठी विशेष दुरुस्ती सुचविण्यात आली आहे. अर्धवट असलेल्या नळयोजनांचे काम पूर्ण करण्याची गरज आहे. या नळयोजना पूर्ण करण्यासाठी पाच कोटी १३ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. तर विंधन विहिरींच्या विशेष दुरुस्तीसाठी ८० हजार रूपयांचा निधीची गरज आहे. २४४ गावांमध्ये सार्वजनिक विहिरींमध्ये पाण्याचा थेंबही नाही. त्या हिवाळ्यातच कोरड्या पडल्या आहे. या गावांसाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करावे लागणार आहे. यासाठी ५१६ उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत. या उपाययोजनेच्या पुर्ततेसाठी दोन कोटी १२ लाख ७० हजार रुपयांचा निधी लागणार असून निधी मंजूर केला आहे.२० गावांतील विहिरींमध्ये पाण्याचा साठा भरपूर असला तरी या विहिरींमध्ये गाळ साचला आहे. हा गाळ काढल्यास तेथील पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. यासाठी पाच लाख पाच हजार रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्ह्यातील १२२ गाव, वाड्या, वस्त्या आणि पोडांवर खासगी विहीर अधिग्रहण करावे अशी परिस्थिती नाही. यासाठी बाहेर गावावरून टँकर अथवा बैलगाडीच्या मदतीने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. त्याकरिता ९८ लाख ८५ हजार रूपयांचा निधी लागणार आहे. हा निधी मंजूर करण्यात आला आहे. (शहर वार्ताहर)