शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या मुक्कामाने घरादारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:31 IST

महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव तालुक्यांमध्ये हजारो हेक्टर पीक पाण्याखाली आले.

ठळक मुद्देसहा तालुक्यात अतिवृष्टी : हजार घरांची पडझड, आर्णी, दिग्रसला पुराचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव तालुक्यांमध्ये हजारो हेक्टर पीक पाण्याखाली आले.तर जिल्ह्यात बाजीराव डेरे रा. धानोरा आणि अंकुश साबळे रा. सुकळी या दोघांचा बुडून मृत्यू झाला.दिग्रस तालुक्यात सर्वाधिक १३४, आर्णी १२७, दारव्हा ९२, पुसद १०६, उमरखेड ८६, महागाव ८३ मिमी पावसाची नोंद झाली. दिग्रसमध्ये पुरात अडकलेल्या ३०० प्रवाशांना प्रशासनाने तहसील कार्यालयात निवास आणि भोजनाची व्यवस्था केली. संततधार पावसामुळे जिल्ह्यात ९३७ घरांची पडझड झाली आहे. त्यात उमरखेड १००, महागाव २५१, दिग्रस ४००, पांढरकवडा ७३, पुसद ८४, यवतमाळ २३, घाटंजी तालुक्यात सहा घरे पडली. दरम्यान पुरामुळे दिग्रसमध्ये २२, यवतमाळ एक तर पुसद तालुक्यात सहा अशी २९ जनावरे वाहून गेली. तर दारव्हा तालुक्यात मात्र तब्बल १९४ जनावरांचा मृत्यू झाला.सुरुवातीला पिकांना संजीवनी देणारा पाऊस शुक्रवारी पिकांचा कर्दनकाळ ठरला. जवळपास तीन हजार हेक्टरवरील शेत पिके वाहून गेली. यात घाटंजी तालुक्यात सर्वाधिक दोन हजार हेक्टर, पांढरकवडा ३५९, पुसद ७९४ तर दारव्हा तालुक्यात १३९ हेक्टरवर नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांचा जलसाठा वाढला आहे. बेंबळा ५०.७१, निम्न वर्धा २६.५२, अधरपूस ८२.५२, अरुणावती ७७.२३, अपर पैनगंगा ३८.१५, अडाण प्रकल्प ८६.३७ टक्के भरला आहे. अडाण प्रकल्पाचे पाच आणि अधर पूस प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर