शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

पावसाच्या मुक्कामाने घरादारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 22:31 IST

महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव तालुक्यांमध्ये हजारो हेक्टर पीक पाण्याखाली आले.

ठळक मुद्देसहा तालुक्यात अतिवृष्टी : हजार घरांची पडझड, आर्णी, दिग्रसला पुराचा वेढा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : महिनाभराच्या विश्रांतीनंतर बुधवारी रात्री सुरू झालेल्या पावसाने जिल्हा आनंदाने भिजला होता. मात्र पावसाचा मुक्काम शुक्रवारी रात्रीपर्यंत वाढल्याने माणसे बेघर झाली. आर्णी, दिग्रस, दारव्हा शहरात पुराचा वेढा पडला. उमरखेड, घाटंजी, पांढरकवडा, नेर, महागाव तालुक्यांमध्ये हजारो हेक्टर पीक पाण्याखाली आले.तर जिल्ह्यात बाजीराव डेरे रा. धानोरा आणि अंकुश साबळे रा. सुकळी या दोघांचा बुडून मृत्यू झाला.दिग्रस तालुक्यात सर्वाधिक १३४, आर्णी १२७, दारव्हा ९२, पुसद १०६, उमरखेड ८६, महागाव ८३ मिमी पावसाची नोंद झाली. दिग्रसमध्ये पुरात अडकलेल्या ३०० प्रवाशांना प्रशासनाने तहसील कार्यालयात निवास आणि भोजनाची व्यवस्था केली. संततधार पावसामुळे जिल्ह्यात ९३७ घरांची पडझड झाली आहे. त्यात उमरखेड १००, महागाव २५१, दिग्रस ४००, पांढरकवडा ७३, पुसद ८४, यवतमाळ २३, घाटंजी तालुक्यात सहा घरे पडली. दरम्यान पुरामुळे दिग्रसमध्ये २२, यवतमाळ एक तर पुसद तालुक्यात सहा अशी २९ जनावरे वाहून गेली. तर दारव्हा तालुक्यात मात्र तब्बल १९४ जनावरांचा मृत्यू झाला.सुरुवातीला पिकांना संजीवनी देणारा पाऊस शुक्रवारी पिकांचा कर्दनकाळ ठरला. जवळपास तीन हजार हेक्टरवरील शेत पिके वाहून गेली. यात घाटंजी तालुक्यात सर्वाधिक दोन हजार हेक्टर, पांढरकवडा ३५९, पुसद ७९४ तर दारव्हा तालुक्यात १३९ हेक्टरवर नुकसान झाले. जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांचा जलसाठा वाढला आहे. बेंबळा ५०.७१, निम्न वर्धा २६.५२, अधरपूस ८२.५२, अरुणावती ७७.२३, अपर पैनगंगा ३८.१५, अडाण प्रकल्प ८६.३७ टक्के भरला आहे. अडाण प्रकल्पाचे पाच आणि अधर पूस प्रकल्पाचे दहा दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर