शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

यादीतील घोळामुळे दुष्काळाची मदत फसली

By admin | Updated: February 13, 2015 01:58 IST

दुष्काळाची मदत जमा करण्यासाठी मागितलेल्या बँक खात्यामध्ये तलाठ्यांनी प्रचंड घोळ केल्याचे प्रकार पुढे येत आहेत. काही शेतकऱ्यांची तर बँक बदलविण्यात आली.

किशोर वंजारी नेरदुष्काळाची मदत जमा करण्यासाठी मागितलेल्या बँक खात्यामध्ये तलाठ्यांनी प्रचंड घोळ केल्याचे प्रकार पुढे येत आहेत. काही शेतकऱ्यांची तर बँक बदलविण्यात आली. परिणामी त्यांना अजूनही दुष्काळाची मदत मिळाली नाही. तहसील कार्यालयाचे उंबरठे या शेतकऱ्यांना झिजवावे लागत आहे. तालुक्यात घडलेल्या या प्रकाराने महसूल प्रशासनाच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना गावाच्या आद्याक्षरानुसार मदतीचे वाटप करण्यात येत आहे. तत्पूर्वी महसूल विभागाने मदतीस पात्र गावोगावच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्याची यादी तयार करण्याचे काम तलाठ्यांकडे सोपविले. परंतु या कामात हयगय करण्यात आल्याचे काही बाबींवरून स्पष्ट झाले आहे. प्रत्यक्ष शेतकऱ्याकडून ही माहिती उपलब्ध करून न घेता इतर व्यक्तीकडून घेतलेल्या माहितीमुळे झालेला घोळ शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.तालुक्याच्या इंद्रठाणा येथील चरणदास मेश्राम यांचे खाते स्टेट बँकेत आहे. मात्र तलाठ्याने सादर केलेल्या यादीमध्ये त्यांचे खाते जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेत दाखविण्यात आले. आपल्या खात्यात मदतीची रक्कम का जमा झाली नाही, याची चौकशी करण्यासाठी गेले असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. मात्र झालेली चूकही महसूल प्रशासन दुरुस्त करून देण्यास चालढकल करत आहे. गेली काही दिवसांपासून त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहे. याच गावातील जगन बन्सोड यांच्या शेताचा समावेशच यादीमध्ये करण्यात आला नाही. तेही सध्या तरी मदतीपासून वंचित आहे. तलाठ्यांनी प्रत्यक्ष संबंधित शेतकऱ्याकडून बँक खात्याची माहिती घेणे आवश्यक असताना उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार करण्यात आला आहे. अजूनही काही गावांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे याद्या तयार करताना संबंधितांनी दक्षता बाळगावी, अशा सूचना तहसीलदारांनी द्याव्या, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. अडचणीच्या काळात रक्कम मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.