शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
3
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
4
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
5
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
6
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
7
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
8
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
9
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
10
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
11
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
12
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
13
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
14
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
15
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
16
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
17
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
18
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
19
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
20
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव

समन्वयाचा अभाव ठरतोय तंटामुक्तीत अडसर

By admin | Updated: December 19, 2015 02:35 IST

शांततेकडून समृद्धीकडे गावाला घेऊन जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त गाव समितीची महत्त्वाची भूमिका आहे.

मार्गदर्शनाची गरज : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुसद तालुक्यात थंडबस्त्यात पुसद : शांततेकडून समृद्धीकडे गावाला घेऊन जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त गाव समितीची महत्त्वाची भूमिका आहे. या समितीचे यश गावकरी, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयावर अवलंबून असते. मात्र सध्या त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसत असून त्यामुळे तंटामुक्त गाव योजना रखडली आहे.गावागावांत वाढत असलेले तंटे व त्यामधून होणारी ग्राम विकासाची अधोगती थांबविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. त्याचा परिणाम अनेक गावांमध्ये चांगला झाला. गावातील वाद गावातच मिटविला जात असल्याने ग्रामीण भागात विकासाच्या योजनासुद्धा परिणामकारकरीत्या राबविल्या जाऊ लागला आहेत. गावपातळीवर निर्माण झालेले किरकोळ घरगुती भांडणे कित्येकदा उग्ररूप धारण करतात. त्यातून हाणमारी होऊन कोर्टकचेरीपर्यंत प्रकरण जाते. गावातील शांतता भंग पावते. गावात निर्माण होणाऱ्या भांडणाचा ताण पोलीस, महसूल प्रशासनाला आणि न्यायालयावरही पडतो. तसेच ग्रामीण भागात व्यसनाधिनते पोटी महिलांना मानसीक व शारिरीक छळ होण्याच्या घटना घडत आहे. अशा वेळी गावागावात लहान-मोठे अनेक वादविवाद मिटविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहेत. या समित्या भांडणे मिटविणे, वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करू शकतात. वास्तविक गावपातळीवर या बाबी सामोपचाराने, विचारविनिमयाने मिटविण्याजोग्या असतात. परंतु एकमेकातील विसंवादामुळे त्याचे उग्ररूप घेऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. असे असले तरी अनेक गावात तंटामुक्त समित्यांचा बेजबाबदारपणा व निष्क्रियतेने आधीचे तंटे मिटण्याऐवजी आणखी तंट्यात वाढ झालेली दिसत आहे. शासनाने यामध्ये दखल घेऊन गावागावातील तंटामुक्त समित्यांमधील प्रतिनिधींची मानसीकता बदलवण्याची गरज आहे. तसेच निष्क्रिय पोलीस व तंटामुक्त समित्यांना समज देऊन परिणामी कलहातून उद्भवणारे तंटे मिटविण्यात त्याची भूमिका महत्वाची असते, जेणे करून गावागावांमध्ये शांतता राहिल व महात्मा गांधीच्या स्वप्नातील गाव निर्माण होईल. (तालुका प्रतिनिधी)