शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

समन्वयाचा अभाव ठरतोय तंटामुक्तीत अडसर

By admin | Updated: December 19, 2015 02:35 IST

शांततेकडून समृद्धीकडे गावाला घेऊन जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त गाव समितीची महत्त्वाची भूमिका आहे.

मार्गदर्शनाची गरज : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुसद तालुक्यात थंडबस्त्यात पुसद : शांततेकडून समृद्धीकडे गावाला घेऊन जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त गाव समितीची महत्त्वाची भूमिका आहे. या समितीचे यश गावकरी, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयावर अवलंबून असते. मात्र सध्या त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसत असून त्यामुळे तंटामुक्त गाव योजना रखडली आहे.गावागावांत वाढत असलेले तंटे व त्यामधून होणारी ग्राम विकासाची अधोगती थांबविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. त्याचा परिणाम अनेक गावांमध्ये चांगला झाला. गावातील वाद गावातच मिटविला जात असल्याने ग्रामीण भागात विकासाच्या योजनासुद्धा परिणामकारकरीत्या राबविल्या जाऊ लागला आहेत. गावपातळीवर निर्माण झालेले किरकोळ घरगुती भांडणे कित्येकदा उग्ररूप धारण करतात. त्यातून हाणमारी होऊन कोर्टकचेरीपर्यंत प्रकरण जाते. गावातील शांतता भंग पावते. गावात निर्माण होणाऱ्या भांडणाचा ताण पोलीस, महसूल प्रशासनाला आणि न्यायालयावरही पडतो. तसेच ग्रामीण भागात व्यसनाधिनते पोटी महिलांना मानसीक व शारिरीक छळ होण्याच्या घटना घडत आहे. अशा वेळी गावागावात लहान-मोठे अनेक वादविवाद मिटविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहेत. या समित्या भांडणे मिटविणे, वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करू शकतात. वास्तविक गावपातळीवर या बाबी सामोपचाराने, विचारविनिमयाने मिटविण्याजोग्या असतात. परंतु एकमेकातील विसंवादामुळे त्याचे उग्ररूप घेऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. असे असले तरी अनेक गावात तंटामुक्त समित्यांचा बेजबाबदारपणा व निष्क्रियतेने आधीचे तंटे मिटण्याऐवजी आणखी तंट्यात वाढ झालेली दिसत आहे. शासनाने यामध्ये दखल घेऊन गावागावातील तंटामुक्त समित्यांमधील प्रतिनिधींची मानसीकता बदलवण्याची गरज आहे. तसेच निष्क्रिय पोलीस व तंटामुक्त समित्यांना समज देऊन परिणामी कलहातून उद्भवणारे तंटे मिटविण्यात त्याची भूमिका महत्वाची असते, जेणे करून गावागावांमध्ये शांतता राहिल व महात्मा गांधीच्या स्वप्नातील गाव निर्माण होईल. (तालुका प्रतिनिधी)