शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

समन्वयाचा अभाव ठरतोय तंटामुक्तीत अडसर

By admin | Updated: December 19, 2015 02:35 IST

शांततेकडून समृद्धीकडे गावाला घेऊन जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त गाव समितीची महत्त्वाची भूमिका आहे.

मार्गदर्शनाची गरज : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम पुसद तालुक्यात थंडबस्त्यात पुसद : शांततेकडून समृद्धीकडे गावाला घेऊन जाणाऱ्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त गाव समितीची महत्त्वाची भूमिका आहे. या समितीचे यश गावकरी, पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या समन्वयावर अवलंबून असते. मात्र सध्या त्यांच्यात समन्वयाचा अभाव दिसत असून त्यामुळे तंटामुक्त गाव योजना रखडली आहे.गावागावांत वाढत असलेले तंटे व त्यामधून होणारी ग्राम विकासाची अधोगती थांबविण्यासाठी शासनाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना सुरू केली. त्याचा परिणाम अनेक गावांमध्ये चांगला झाला. गावातील वाद गावातच मिटविला जात असल्याने ग्रामीण भागात विकासाच्या योजनासुद्धा परिणामकारकरीत्या राबविल्या जाऊ लागला आहेत. गावपातळीवर निर्माण झालेले किरकोळ घरगुती भांडणे कित्येकदा उग्ररूप धारण करतात. त्यातून हाणमारी होऊन कोर्टकचेरीपर्यंत प्रकरण जाते. गावातील शांतता भंग पावते. गावात निर्माण होणाऱ्या भांडणाचा ताण पोलीस, महसूल प्रशासनाला आणि न्यायालयावरही पडतो. तसेच ग्रामीण भागात व्यसनाधिनते पोटी महिलांना मानसीक व शारिरीक छळ होण्याच्या घटना घडत आहे. अशा वेळी गावागावात लहान-मोठे अनेक वादविवाद मिटविण्यासाठी तंटामुक्त समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहेत. या समित्या भांडणे मिटविणे, वादविवाद संपुष्टात आणण्यासाठी नागरिकांचे प्रबोधन करू शकतात. वास्तविक गावपातळीवर या बाबी सामोपचाराने, विचारविनिमयाने मिटविण्याजोग्या असतात. परंतु एकमेकातील विसंवादामुळे त्याचे उग्ररूप घेऊन अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. असे असले तरी अनेक गावात तंटामुक्त समित्यांचा बेजबाबदारपणा व निष्क्रियतेने आधीचे तंटे मिटण्याऐवजी आणखी तंट्यात वाढ झालेली दिसत आहे. शासनाने यामध्ये दखल घेऊन गावागावातील तंटामुक्त समित्यांमधील प्रतिनिधींची मानसीकता बदलवण्याची गरज आहे. तसेच निष्क्रिय पोलीस व तंटामुक्त समित्यांना समज देऊन परिणामी कलहातून उद्भवणारे तंटे मिटविण्यात त्याची भूमिका महत्वाची असते, जेणे करून गावागावांमध्ये शांतता राहिल व महात्मा गांधीच्या स्वप्नातील गाव निर्माण होईल. (तालुका प्रतिनिधी)