शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेत कॅश नसल्याने शेतकऱ्यांची हेळसांड

By admin | Updated: November 18, 2016 02:32 IST

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाभूळगाव शाखेत गेल्या दोन दिवसांपासून कॅश नसल्यामुळे

निराधारांनाही फटका : दोन दिवसांपासून शेतकरी बँकेसमोर रांगेत, दुष्काळात तेरावा महिनाबाभूळगाव : यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाभूळगाव शाखेत गेल्या दोन दिवसांपासून कॅश नसल्यामुळे शेतकरी राजा बँकेसमोर कॅश येण्याच्या प्रतिक्षेत असल्याचे चित्र गुरूवारी निदर्शनास आले. हजार व पाचशेंच्या नोटा स्वीकारणे बंद केल्यानंतर शेतकऱ्यांना बँकेकडून मिळालेला हा दुसरा झटका आहे. सरकारने हजार व पाचशे रुपयांच्या नोटा रद्द ठरविल्यानंतर मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बाभूळगाव शाखेने १५ नोव्हेंबरपासून आपल्या शेतकरी ग्राहकांकडून आलेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा स्वीकारणे बंद केले होते. तालुक्यातील २० हजार शेतकऱ्यांचे या बँकेत खाते आहे. यातील सत्तर टक्के शेतकऱ्यांचे इतर बँकांमध्ये खाते नाही. त्यामुळे अंदाजे १५ हजार शेतकरी हक्काची बँक सोडून इतर बँकेच्या दारात नोटा बदलवताना आढळून आले. या बँकेत मंगळवारला दुपारनंतर कॅश संपल्याचे सांगून परत केले गेले. शेतकरी बुधवारी दिवसभर बँकेत बसून राहिले कॅश आली नाही. गुरूवारला बाभूळगावचा आठवडी बाजार असतो. शेतकरी बाजाराकरिता पिशव्या घेऊन बँकेत आले. मात्र कॅश नसल्याने त्यांनी तेथेच ठाण मांडले अशा पद्धतीने शेतकऱ्यांच्या हक्काचा, घामाचा पैसाही त्यांना दिला जात नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली असून तीन दिवसात बँकेकडून शेतकऱ्यांना दिल्या गेलेला हा दुसरा झटका आहे. या संबंधात शाखा व्यवस्थापकांशी प्रत्यक्ष संपर्क साधला असता कॅश आणण्याकरिता नागपूरला गाडी पाठविली होती. कॅश न मिळाल्याने गाडी परत आली, असे त्यांनी सांगितले. काही बँक आपल्या मर्जीनुसार ग्राहकांना वेठीस धरत असल्याचे चित्र दृष्टीस पडले. येथील विदर्भ कोंकण ग्रामीण बँकेत पाचशे रुपयांच्या दहा नोटा जरी बँकेत भरल्या तरी आधार कार्डची झेरॉक्स मागितली जात आहे. इतर बँकामध्ये जुन्या नोटा बदलविताना आधारकार्ड मागण्यात येत आहे. यावरून बँकांचा आपसात ताळमेळ नाही, असे दिसते आहे. शेकडोंच्या संख्येत असलेल्या निराधारांची आज मोठी गोची झाली. सहाशे रूपये महिना त्यांना मिळतो. बँकेत दोन हजारांच्याच नोटा असल्याने त्यांना परत केले गेले. काही गरिबांच्या खात्यात केवळ एकच हजार रुपये आहेत. बँकेत दोन हजारांचीच नोट असल्याने त्यांना त्यांच्या हक्काचे पैसे काढता आले नाही. परिणामी अनेकांची कामे आणि दैनंदिन व्यवहार खोळंबले आहेत. (प्रतिनिधी)