शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
3
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
4
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
5
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
6
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
7
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर!
9
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
10
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
11
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
12
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
13
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
14
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
15
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
16
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
17
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
18
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
19
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
20
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला

वाघांची संख्या वाढल्याने वनवर्तुळ तणावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:11 IST

पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्दे१८ ते २० बछडे : वन्यजीव-मानव संघर्ष पेटला, सहा महिन्यांत बछडे होणार आईपासून दूर

संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : पांढरकवडा वनविभागाच्या जंगलात वाढत असलेली वाघांची संख्या आणि त्यातून पेटलेला वन्यजीव मानव संघर्ष यामुळे वनविभाग सध्या तणावात आहे. जवळपास आठ वाघ-वाघिणी व त्यांचे १८ ते २० बछडे या जंगलात अधिवास करून असल्याची माहिती वनविभागाच्या एका अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली. त्यातील काही बछडे हे टिपेश्वर अभयारण्यात वास्तव्याला आहेत.‘वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत’ असा दावा भलेही वनविभाग करीत असला तरी वनविभागाअंतर्गत येणाºया जंगलांलगत गावांची संख्या मोठी आहे. टिपेश्वर अभयारण्यापेक्षा बफर झोनमध्येच वाघांचा अधिवास अधिक असल्याची माहिती वनविभागातील सुत्राने दिली. गेल्या काही महिन्यात एका नरभक्षी वाघिणीने १४ जणांचा बळी घेतला. त्यामुळे नागरिकांमध्ये वन्यजीव व वनविभागाबद्दल प्रचंड रोष आहे. हा रोष कमी करण्यासाठी वनविभागाने राळेगाव परिसरात नरभक्षी वाघिणीला पकडण्यासाठी मोठी फिल्डींग लावली असली तरी अद्याप ती वाघिण वनविभागाच्या जाळ्यात अडकली नाही. तिच्यासोबत तिचे दोन बछडे व वाघ असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे केवळ वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वनविभागाची कसरत सुरू आहे. तिला पकडण्यासाठी मोठा लावाजमा उभा करण्यात आला आहे. असे असले तरी नरभक्षी वाघिण या लावाजम्याला सातत्याने गुंगारा देत आहे.पांढरकवडा वनविभागाअंतर्गत पांढरकवडासह राळेगाव, मारेगाव, झरी, घाटंजी, वणी, आदी तालुके येतात. टिपेश्वर अभयारण्यातील अन्नसाखळी तुटल्याने तृणभक्षी प्राणी या अभयारण्याबाहेर पडल्याचे सांगण्यात येते. वाघाचे खाद्य तृणभक्षी प्राणीच असल्याने या प्राण्यांच्यामागे वाघही जंगलाबाहेर पडलेत. त्यातून वाघ आणि मानव संघर्षाची ठिणगी पडली. सध्या पांढरकवडा वनविभागाअंतर्गत १८ ते २० बछडे असून येत्या काही महिन्यात ते मोठे होऊन आईपासून दूर होणार आहेत. त्यामुळे वनविभागाची चिंता आणखी वाढली आहे. जंगलाला लागून अनेक गावे असून या गावातील नागरिकांचा जंगलाशी संबंध येतो. झरी तालुक्यात शेती हा मुख्य व्यवसाय असून अनेक लोकांची शेती थेट जंगलातच आहे. वाघाचे दर्शन झाल्यानंतर शेतकरी शेतात जाण्यासाठी घाबरतात. आता पुन्हा वाघांची संख्या वाढल्याने परिस्थिती धोकादायक बनण्याची भीती जंगलालगतच्या गावामधील नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.वाघांची संख्या वाढत असली तरी पांढरकवडा वनविभागाचे क्षेत्र मोठे आहे. त्यामुळे वाघांच्या संख्येने कोणती अडचण निर्माण होईल असे वाटत नाही. ज्या दुर्दैवी घटना घडल्या, त्यातील ९० टक्के घटना जंगल भागातच घडल्या आहेत. वन्यजीवांसाठी जंगल क्षेत्र कमी पडते अथवा जास्त आहे, हा तांत्रिक मुद्दा असल्याने त्यावर भाष्य करता येणार नाही.- संगीता कोकणे, आरएफओ, पांढरकवडा.

टॅग्स :Tigerवाघforestजंगल