शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

हटखोर पावसामुळे जिल्ह्यात अर्धी पिके करपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 22:09 IST

मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते.

ठळक मुद्देदुष्काळी स्थिती : तुरळक ठिकाणी सरी कोसळल्याने पिकांना संजीवनी, सरासरी उत्पन्नाचीही आशा मावळली

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मोसमी पावसावरच शेतीचा हंगाम अवलंबून आहे. यवतमाळ जिल्ह्यात दरवर्षी सरासरी इतका पाऊस येतोच. याही वर्षी मोठ्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी उशिरा का होईना पेरणी केली. मात्र पावसाने दगा दिला. सुरुवातीला काळे ढग दिलासा दाखवत होते. आता पीक बहरात आल्यानंतर आकाश निरभ्र असून कडक उन्हात पिके कोळपली आहे. जवळपास ३० टक्के पेरणी पूर्णत: नष्ट झाल्याचा अंदाज कृषी खात्याकडून वर्तविला जात आहे.हमखास पाऊस बरसणारा जिल्हा म्हणून यवतमाळची ओळख आहे. यावर्षीच्या पावसाने ही ओळख पुसून काढण्याचेच काम सुरू केले आहे. यामुळे संपूर्ण जिल्हाच संकटात सापडला आहे. याची सर्वाधिक झळ शेतकरी कुटुंबाला बसली आहे. कृषी उत्पादनात घट होण्याचा धोका तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.विपूल निसर्ग संपदा लाभलेला जिल्ह्याला वरूणराजाच्या वक्रदृष्टीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक पाऊस बरसणाºया जून, जुलै महिन्यातच पावसाने दडी मारली आहे. यामुळे पीक जगवायचे तरी कसे असा प्रश्न प्रत्येकांपुढे उभा ठाकला आहे. या गंभीर स्थितीतून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांनी निसर्गाकडे साकडे घातले आहे.हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतरही पाऊस न बरसल्याने जिल्ह्यातील शेतकरी कुटुंब चिंतेत आहेत. पाऊस बरसावा इतकीच विनंती ते वरूण राजाला करीत आहे. काही मोजक्या गावामध्ये पाऊस बरसला. अनेक ठिकाणी हा पाऊस बरसलाच नाही. यामुळे काही ठिकाणी पिके वाचली तर अनेक ठिकाणी पिके करपली, असे विरोधाभासी चित्र जिल्ह्यात ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.जुलै आणि आॅगस्टचा पाऊस महत्त्वाचासाधारणता जूनमध्ये १५० मिमी, जुलै आणि आॅगस्टमध्ये प्रत्येकी ३५० मिमी पाऊस बरसतो. जून ते जुलैपर्यंत १३९ मिमी इतकाच पाऊस यावर्षी आला आहे. जुलैमध्ये पावसाची मोठी उघडीप राहिली. सर्वाधिक पाऊस पडणाºया महिन्यातच पाऊस गायब आहे. यामुळे भविष्यात पडणाऱ्या पावसामुळे धरणे भरणार किंवा नाही हे सांगणे अवघड झाले आहे. एकूणच विदारक चित्र या ठिकाणी पहायला मिळत आहे.