शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

सदोष ‘एफआयआर’मुळे आरोपींना जामीन, निर्दोष मुक्तता; पोलीस महासंचालकांचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:03 IST

गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जामीन मिळणे अथवा खटल्यातून निर्दोष मुक्तता होणे यासाठी ‘एफआयआर’मधील त्रुट्या कारणीभूत असल्याचा ठपका खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी ठेवला आहे.

ठळक मुद्दे राज्यभरातील ठाणेदारांसाठी दहा मार्गदशक तत्वे जारी

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जामीन मिळणे अथवा खटल्यातून निर्दोष मुक्तता होणे यासाठी ‘एफआयआर’मधील त्रुट्या कारणीभूत असल्याचा ठपका खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी ठेवला आहे. यापुढे ‘एफआयआर’मध्ये त्रुट्या राहू नये म्हणून ठाणेदारांसाठी मार्गदर्शक तत्वे व चेक लिस्ट जारी करण्यात आली आहे.पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी २५ आॅक्टोबर २०१८ रोजी राज्यातील तमाम ठाणेदार, तपास अधिकाऱ्यांसाठी परिपत्रक जारी केले आहे. कनिष्ठ न्यायालये व सत्र न्यायालयांमध्ये चालणाऱ्या खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी खुद्द गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनाही केल्या जात आहे. मात्र त्यानंतरही अपेक्षेनुसार दोषसिद्धी व शिक्षेचे प्रमाण वाढताना दिसत नाही. शिक्षेचे प्रमाण कमी असण्यामागे विविध कारणांपैकी सदोष ‘एफआयआर’ हेसुद्धा एक प्रमुख कारण असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी नमूद केले आहे. सदोष ‘एफआयआर’मुळे बचाव पक्षाचे वकील आरोपींना जामीन मिळवून देतात, खटल्यातून निर्दोष मुक्तता करून घेतात. पर्यायाने फिर्यादीस न्याय मिळत नाही व त्याचा न्याय व्यवस्था, पोलिसांवर विश्वास राहत नाही. म्हणूनच ‘एफआयआर’ नोंदविताना नेमकी काय खबरदारी घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना महासंचालकांनी सर्व ठाणेदारांसाठी जारी केल्या आहेत.

२० प्रश्नांची चेक लिस्ट जारीसदर परिपत्रक सर्व ठाणेदारांनी तीन दिवस रोलकॉलवर (गिणती) वाचून दाखविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. या परिपत्रकासोबत २० प्रश्नांची चेक लिस्टही ठाणेदारांसाठी जोडण्यात आली आहे.काय आहेत मार्गदर्शक सूचना

  • ठाणेदाराने तक्रारदाराचे म्हणणे योग्यरीत्या ऐकून घ्यावे. त्यासंबंधी अथवा समर्पक प्रश्न तक्रारदाराला विचारावे.
  • एफआयआर लिहिताना तक्रारदाराला ज्या महत्वाच्या बाबी समाविष्ठ करावयाच्या आहेत, त्या ठाणेदाराने निट समजून घ्याव्या.
  • तक्रार लिहून घेताना कायद्याची जी कलमे लावायची आहेत, त्याबाबत स्पष्टता हवी. तक्रारदाराच्या सांगण्यानुसार एफआयआर नोंदवून तक्रारदाराला वाचवून दाखवावा.
  • लावावयाच्या कलमांच्या घटकांचा समावेश झाला की नाही, याची खातरजमा करावी.
  • एफआयआर देताना साक्षीदार व इतर व्यक्ती उपलब्ध असले तरी फिर्याद ही बळी ठरलेल्या व्यक्तीचीच घ्यावी. तो असमर्थ असेल तरच इतर व्यक्तीची फिर्याद घ्यावी.
  • फिर्याद दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे एफआयआरच्या कॉलम क्र. ८ मध्ये स्पष्टीकरण नोंदवावे.
  • आरोपी अज्ञात असेल आणि फिर्यादीने त्याला पाहिले असेल तर त्याचे इत्यंभूत वर्णन एफआयआरच्या कॉलम ७ मध्ये नोंदवावे.
टॅग्स :Policeपोलिस