शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सदोष ‘एफआयआर’मुळे आरोपींना जामीन, निर्दोष मुक्तता; पोलीस महासंचालकांचा ठपका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2018 12:03 IST

गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जामीन मिळणे अथवा खटल्यातून निर्दोष मुक्तता होणे यासाठी ‘एफआयआर’मधील त्रुट्या कारणीभूत असल्याचा ठपका खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी ठेवला आहे.

ठळक मुद्दे राज्यभरातील ठाणेदारांसाठी दहा मार्गदशक तत्वे जारी

राजेश निस्ताने।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जामीन मिळणे अथवा खटल्यातून निर्दोष मुक्तता होणे यासाठी ‘एफआयआर’मधील त्रुट्या कारणीभूत असल्याचा ठपका खुद्द राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी ठेवला आहे. यापुढे ‘एफआयआर’मध्ये त्रुट्या राहू नये म्हणून ठाणेदारांसाठी मार्गदर्शक तत्वे व चेक लिस्ट जारी करण्यात आली आहे.पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी २५ आॅक्टोबर २०१८ रोजी राज्यातील तमाम ठाणेदार, तपास अधिकाऱ्यांसाठी परिपत्रक जारी केले आहे. कनिष्ठ न्यायालये व सत्र न्यायालयांमध्ये चालणाऱ्या खटल्यांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढविण्यासाठी खुद्द गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनाही केल्या जात आहे. मात्र त्यानंतरही अपेक्षेनुसार दोषसिद्धी व शिक्षेचे प्रमाण वाढताना दिसत नाही. शिक्षेचे प्रमाण कमी असण्यामागे विविध कारणांपैकी सदोष ‘एफआयआर’ हेसुद्धा एक प्रमुख कारण असल्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांनी नमूद केले आहे. सदोष ‘एफआयआर’मुळे बचाव पक्षाचे वकील आरोपींना जामीन मिळवून देतात, खटल्यातून निर्दोष मुक्तता करून घेतात. पर्यायाने फिर्यादीस न्याय मिळत नाही व त्याचा न्याय व्यवस्था, पोलिसांवर विश्वास राहत नाही. म्हणूनच ‘एफआयआर’ नोंदविताना नेमकी काय खबरदारी घ्यावी याबाबतच्या मार्गदर्शक सूचना महासंचालकांनी सर्व ठाणेदारांसाठी जारी केल्या आहेत.

२० प्रश्नांची चेक लिस्ट जारीसदर परिपत्रक सर्व ठाणेदारांनी तीन दिवस रोलकॉलवर (गिणती) वाचून दाखविण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. या परिपत्रकासोबत २० प्रश्नांची चेक लिस्टही ठाणेदारांसाठी जोडण्यात आली आहे.काय आहेत मार्गदर्शक सूचना

  • ठाणेदाराने तक्रारदाराचे म्हणणे योग्यरीत्या ऐकून घ्यावे. त्यासंबंधी अथवा समर्पक प्रश्न तक्रारदाराला विचारावे.
  • एफआयआर लिहिताना तक्रारदाराला ज्या महत्वाच्या बाबी समाविष्ठ करावयाच्या आहेत, त्या ठाणेदाराने निट समजून घ्याव्या.
  • तक्रार लिहून घेताना कायद्याची जी कलमे लावायची आहेत, त्याबाबत स्पष्टता हवी. तक्रारदाराच्या सांगण्यानुसार एफआयआर नोंदवून तक्रारदाराला वाचवून दाखवावा.
  • लावावयाच्या कलमांच्या घटकांचा समावेश झाला की नाही, याची खातरजमा करावी.
  • एफआयआर देताना साक्षीदार व इतर व्यक्ती उपलब्ध असले तरी फिर्याद ही बळी ठरलेल्या व्यक्तीचीच घ्यावी. तो असमर्थ असेल तरच इतर व्यक्तीची फिर्याद घ्यावी.
  • फिर्याद दाखल करण्यास झालेल्या विलंबाचे एफआयआरच्या कॉलम क्र. ८ मध्ये स्पष्टीकरण नोंदवावे.
  • आरोपी अज्ञात असेल आणि फिर्यादीने त्याला पाहिले असेल तर त्याचे इत्यंभूत वर्णन एफआयआरच्या कॉलम ७ मध्ये नोंदवावे.
टॅग्स :Policeपोलिस