शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
2
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
3
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
5
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
6
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
7
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
8
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
9
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
10
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
11
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
12
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
13
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
14
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
15
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
16
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
17
समुद्रात दडलाय सोन्याचा खजिना; किंमत 2000 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त, काढणार कसा?
18
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
19
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
20
ICC T20I Rankings : नंबर वन अभिषेक शर्मानं साधला मोठा डाव; कॅप्टन सूर्यासह तिलक वर्मा घाट्यात

पाझर तलाव कोरडे पडल्याने पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

By admin | Updated: May 14, 2014 00:01 IST

भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून तालुक्याच्या जलाशयातील साठाही कमी होत आहे. बरेचसे पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेर : भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून तालुक्याच्या जलाशयातील साठाही कमी होत आहे. बरेचसे पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काळात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाणी समस्या निवारणासाठी तालुका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न होत असले तरी बर्‍याचशा ठिकाणी ‘आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतामानामुळे पाण्याची पातळी आणखी खोल जात आहे.

सूर्य आग ओकू लागल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच जनावरांसाठी वैरण हा प्रश्नही पशुधनपालकांना सतावत आहे. ते आपली धष्टपुष्ट जनावरे विकायला काढत आहेत. नदीनाल्यांचे पात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांना पाणी उपलब्ध होत नाही. वैरण आणि पाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा याची चिंता शेतकर्‍यांना आहे.

वाटसरूंची तृष्णातृप्ती व्हावी यासाठी गावागावात प्रमुख ठिकाणी पाणपोई लावली जात होती. विविध सामाजिक संस्था आणि संघटना यासाठी पुढाकार घेत होत्या. मात्र यात कमालीची घट झाली आहे. पाणीटंचाई हे प्रमुख कारण यासाठी कारणीभूत मानले जाते. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. अनेक कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही.

पाणी पिण्यासाठी नागरिकांना हॉटेल किंवा चहाटपरीची वाट धरावी लागते. त्याठिकाणीही काही वस्तू घेतल्याशिवाय पाणी दिले जात नाही. व्यावसायिकांनाही पाणी विकत घ्यावे लागत आहे. एकीकडे हा गंभीर प्रश्न असताना दुसरीकडे वटफळी येथे हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याठिकाणची पाईपलाईन लिकेज असल्याने होत असलेला पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाय केले जात नाही. तालुक्यात निर्माण झालेल्या या प्रश्नाविषयी स्थानिकसह तालुक्याचे लोकप्रतिनिधीही गंभीर नाही. (तालुका प्रतिनिधी)