शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

पाझर तलाव कोरडे पडल्याने पाणीप्रश्न गंभीर होण्याची भीती

By admin | Updated: May 14, 2014 00:01 IST

भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून तालुक्याच्या जलाशयातील साठाही कमी होत आहे. बरेचसे पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेर : भूगर्भातील पाण्याची पातळी खालावली असून तालुक्याच्या जलाशयातील साठाही कमी होत आहे. बरेचसे पाझर तलाव कोरडे पडल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील काळात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची समस्या भीषण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

पाणी समस्या निवारणासाठी तालुका प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न होत असले तरी बर्‍याचशा ठिकाणी ‘आडातच नाही तर पोहर्‍यात कुठून’ असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या उष्णतामानामुळे पाण्याची पातळी आणखी खोल जात आहे.

सूर्य आग ओकू लागल्याने पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असतानाच जनावरांसाठी वैरण हा प्रश्नही पशुधनपालकांना सतावत आहे. ते आपली धष्टपुष्ट जनावरे विकायला काढत आहेत. नदीनाल्यांचे पात्र कोरडे पडल्यामुळे जनावरांना पाणी उपलब्ध होत नाही. वैरण आणि पाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा याची चिंता शेतकर्‍यांना आहे.

वाटसरूंची तृष्णातृप्ती व्हावी यासाठी गावागावात प्रमुख ठिकाणी पाणपोई लावली जात होती. विविध सामाजिक संस्था आणि संघटना यासाठी पुढाकार घेत होत्या. मात्र यात कमालीची घट झाली आहे. पाणीटंचाई हे प्रमुख कारण यासाठी कारणीभूत मानले जाते. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयात येणार्‍या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावे लागते. अनेक कार्यालयांमध्ये नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली नाही.

पाणी पिण्यासाठी नागरिकांना हॉटेल किंवा चहाटपरीची वाट धरावी लागते. त्याठिकाणीही काही वस्तू घेतल्याशिवाय पाणी दिले जात नाही. व्यावसायिकांनाही पाणी विकत घ्यावे लागत आहे. एकीकडे हा गंभीर प्रश्न असताना दुसरीकडे वटफळी येथे हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत आहे. याठिकाणची पाईपलाईन लिकेज असल्याने होत असलेला पाण्याचा अपव्यय थांबविण्यासाठी ग्रामपंचायतीकडून उपाय केले जात नाही. तालुक्यात निर्माण झालेल्या या प्रश्नाविषयी स्थानिकसह तालुक्याचे लोकप्रतिनिधीही गंभीर नाही. (तालुका प्रतिनिधी)