शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
3
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
4
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
5
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
6
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
7
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
8
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
9
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
10
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
11
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
12
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
13
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
14
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
15
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
16
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
17
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
18
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
19
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
20
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन विक्रीत मोठी वाढ

By admin | Updated: February 1, 2015 23:05 IST

महागाव तालुक्यातील शेतजमीन वगळता इतर सर्व भाग हा वनविभागाच्या जंगलाने व्यापलेला आहे. परंतु तालुक्यातील पशुधन घटत आहे ही चिंतेची बाब आहे. शासनाने पशुपालन व्यवसाय

मोहदी : महागाव तालुक्यातील शेतजमीन वगळता इतर सर्व भाग हा वनविभागाच्या जंगलाने व्यापलेला आहे. परंतु तालुक्यातील पशुधन घटत आहे ही चिंतेची बाब आहे. शासनाने पशुपालन व्यवसाय करण्याची अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु महागाव तालुक्यात कागदावरच असल्याचे वास्तव दिसून येत आहे. जगण्याचे मुख्य साधन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाकडे आजही ग्रामीण भागातील जनतेने दुर्लक्ष केले नाही. शेती बरोबरच कुटुंबाचे अर्थचक्र चालावे म्हणून पशुपालनावर भर देण्यात आला आहे. सध्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पशुपालन हा व्यवसाय राबविल्या जात असलेल्या अनेक योजना या फक्त कागदावरच राहिल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेती व्यवसायात सातत्याने विशिष्ट बदल झालेले दिसत आहे. अयोग्य नियोजन निसर्गाने न दिलेली साथ व्यवसायासाठी कर्जाऊ घेतलेल्या भांडवलाचे वाढलेले व्याज वाढती महागाई आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. मात्र शासनाने राबविलेल्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचत नसल्यामुळे आर्थिक स्वावलंबनात अनेक अडचणी येत आहेत. पाच वर्षात सतत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे याकरिता शासनाने पशुपालन व्यवसाय करणाऱ्या अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या. परंतु अद्यापही या योजनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही. ग्रामीण भागात मोजक्याच लोकांना या योजनांबद्दलची माहिती मिळते व बऱ्याच लोकांना योजनाच माहिती नाही. अशा शासनाच्या योजनेचा उपयो करून घेऊन आपल्या आर्थिक चक्राची घडी बसवून विकास करणे गरजेचे आहे. शासनाने पशुपालनासाठी महत्त्वपूर्ण अशा योजना राबविल्या आहेत. मात्र या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आजही पोहोचलेल्याच नाही. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने या तालुक्यातील आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. तेव्हा या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष कार्यक्रम घ्यावे तसेच जनजागृती करून ग्रामीण नागरिकांना जनावरविषयी योग्य माहिती पोहोचविणेही गरजेचे आहे. यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. याविषयी योग्य उपाय योजना कराव्या, अशी मागणी जनता करीत आहे. (वार्ताहर)