शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

दुष्काळी परिस्थितीमुळे पशुधन विक्रीत मोठी वाढ

By admin | Updated: February 1, 2015 23:05 IST

महागाव तालुक्यातील शेतजमीन वगळता इतर सर्व भाग हा वनविभागाच्या जंगलाने व्यापलेला आहे. परंतु तालुक्यातील पशुधन घटत आहे ही चिंतेची बाब आहे. शासनाने पशुपालन व्यवसाय

मोहदी : महागाव तालुक्यातील शेतजमीन वगळता इतर सर्व भाग हा वनविभागाच्या जंगलाने व्यापलेला आहे. परंतु तालुक्यातील पशुधन घटत आहे ही चिंतेची बाब आहे. शासनाने पशुपालन व्यवसाय करण्याची अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या आहेत. परंतु महागाव तालुक्यात कागदावरच असल्याचे वास्तव दिसून येत आहे. जगण्याचे मुख्य साधन म्हणून पाहिल्या जाणाऱ्या शेती व्यवसायाकडे आजही ग्रामीण भागातील जनतेने दुर्लक्ष केले नाही. शेती बरोबरच कुटुंबाचे अर्थचक्र चालावे म्हणून पशुपालनावर भर देण्यात आला आहे. सध्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी पशुपालन हा व्यवसाय राबविल्या जात असलेल्या अनेक योजना या फक्त कागदावरच राहिल्या आहेत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून शेती व्यवसायात सातत्याने विशिष्ट बदल झालेले दिसत आहे. अयोग्य नियोजन निसर्गाने न दिलेली साथ व्यवसायासाठी कर्जाऊ घेतलेल्या भांडवलाचे वाढलेले व्याज वाढती महागाई आदी प्रश्नांमुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. पशुपालन हा शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार ठरत आहे. मात्र शासनाने राबविलेल्या अनेक योजना शेतकऱ्यांपर्यंत परिणामकारकपणे पोहोचत नसल्यामुळे आर्थिक स्वावलंबनात अनेक अडचणी येत आहेत. पाच वर्षात सतत होत असलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण कमी व्हावे याकरिता शासनाने पशुपालन व्यवसाय करणाऱ्या अर्थसहाय्य करणाऱ्या विविध योजना सुरू केल्या. परंतु अद्यापही या योजनांचा पुरेपूर उपयोग झाला नाही. ग्रामीण भागात मोजक्याच लोकांना या योजनांबद्दलची माहिती मिळते व बऱ्याच लोकांना योजनाच माहिती नाही. अशा शासनाच्या योजनेचा उपयो करून घेऊन आपल्या आर्थिक चक्राची घडी बसवून विकास करणे गरजेचे आहे. शासनाने पशुपालनासाठी महत्त्वपूर्ण अशा योजना राबविल्या आहेत. मात्र या योजना सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आजही पोहोचलेल्याच नाही. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने या तालुक्यातील आत्महत्याचे प्रमाण वाढत आहे. तेव्हा या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष कार्यक्रम घ्यावे तसेच जनजागृती करून ग्रामीण नागरिकांना जनावरविषयी योग्य माहिती पोहोचविणेही गरजेचे आहे. यामुळे या योजनांचा फायदा शेतकऱ्यांनासुद्धा मोठ्या प्रमाणात होणार आहे. याविषयी योग्य उपाय योजना कराव्या, अशी मागणी जनता करीत आहे. (वार्ताहर)