शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

दुष्काळग्रस्त गावाचं शिवार पाणीदार झालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:31 IST

सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका वर्षात गावाचे संपूर्ण चित्रच पालटले.

ठळक मुद्देसंडे अँकर । कामासाठी युवकांचे स्थलांतर थांबले, शेतशिवारही समृद्धीच्या दिशेने, तोरनाळा गावात घडली किमया

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ:सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका वर्षात गावाचे संपूर्ण चित्रच पालटले. याला केवळ गावकऱ्यांचे श्रमदान आणि सकारात्मक दृष्टिकोन कारणीभूत ठरला. त्यातूनच हे दुष्काळग्रस्त गाव आज पाणीदार झाले आहे.या गावाने गतवर्षी पावसाळ्यापूर्वी श्रमदानातून आठ हजार ६६६ घनमीटरचे काम केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी १६६ शोषखड्डे केले. यंत्राच्या मदतीने एक लाख १४ हजार ६४६ घनमीटरचे काम करण्यात आले. यामुळे पावसाळ्यात १२ कोटी ६१ लाख लिटर पाण्याचा साठा झाला. या जलसमृद्धीने गावात आज आटलेल्या विहिरींनाही पाणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.शिवारात इतके खेळते पाणी आजपर्यंत पाहिले नव्हते, असे मत गावकरी व्यक्त करतात. भूजल स्त्रोतातही सुधारणा झाली. विहिरींना मोठ्या प्रमाणात झरे खेळते झाले. यातून ओलित वाढले. यावर्षी गावातले स्थलांतर कमी होण्यास मोलाची मदत लाभली. गावातच अनेकांना रोजगार मिळाला.दगडांचं गाव टँकरमुक्तडोंगरमाथ्यावर वसलेले तोरणाळा गाव दगडांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामुळे या गावाला नागालँड अशी ओळख मिळाली होती. दगडामुळे गावात पाणी नाही. यातून गावात सहा महिने टँकर लागलेलेच असायचे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी तीन किलोमीटर प्रवास करावा लागत होता. दुष्काळी स्थितीत या गावातील २५ जनावरे पाण्यावाचून मेली. मात्र वॉटरकप स्पर्धेने आज या गावाच्या शेतशिवारात मुबलक पाणी आहे.लहान, थोरांच्या पुढाकाराने शिवार हिरवेगारगावशिवारातील पाण्याचा प्रत्येक स्रोत गतवर्षीपर्यंत कोरडा पडत होता. मात्र लहान-थोरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे प्रत्येक स्रोताला पाणी आले. विविध प्रकारचे शेती उत्पादन या पाण्यावर घेतले जाऊ लागले. संपूर्ण शिवार हिरवेगार झाले. भाजीपाला, फळे याशिवाय दुबार पिकेही या भागात घ्यायला सुरुवात झाली.पाणीदार गावासाठी गावकरी आपल्या परीने युद्धपातळीवर काम करीत आहे. जलयुक्तशिवारमधून शासनाने काम दिल्यास हे गाव आदर्श ठरेल.- शेषराव राठोडमाजी सरपंच, तोरनाळागावकºयांच्या योगदानाने गावात हिरवे स्वप्न साकार करता आले. गावकºयांनी श्रमदानात भरपूर योगदान केल्यामुळे पाण्याचा आज सुकाळ झाला.- बेबी राठोडसरपंच, तोरनाळा