शहरं
Join us  
Trending Stories
1
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
2
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
5
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
6
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
7
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
8
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
9
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
10
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
11
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
12
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
13
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
14
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
15
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
16
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
17
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
18
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
19
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
20
"प्रज्ञा सातव यांच्या राजीनाम्याची घटना दुर्दैवी, सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर भाजपा…’’ नाना पटोले यांची टीका   
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त गावाचं शिवार पाणीदार झालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:31 IST

सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका वर्षात गावाचे संपूर्ण चित्रच पालटले.

ठळक मुद्देसंडे अँकर । कामासाठी युवकांचे स्थलांतर थांबले, शेतशिवारही समृद्धीच्या दिशेने, तोरनाळा गावात घडली किमया

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ:सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका वर्षात गावाचे संपूर्ण चित्रच पालटले. याला केवळ गावकऱ्यांचे श्रमदान आणि सकारात्मक दृष्टिकोन कारणीभूत ठरला. त्यातूनच हे दुष्काळग्रस्त गाव आज पाणीदार झाले आहे.या गावाने गतवर्षी पावसाळ्यापूर्वी श्रमदानातून आठ हजार ६६६ घनमीटरचे काम केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी १६६ शोषखड्डे केले. यंत्राच्या मदतीने एक लाख १४ हजार ६४६ घनमीटरचे काम करण्यात आले. यामुळे पावसाळ्यात १२ कोटी ६१ लाख लिटर पाण्याचा साठा झाला. या जलसमृद्धीने गावात आज आटलेल्या विहिरींनाही पाणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.शिवारात इतके खेळते पाणी आजपर्यंत पाहिले नव्हते, असे मत गावकरी व्यक्त करतात. भूजल स्त्रोतातही सुधारणा झाली. विहिरींना मोठ्या प्रमाणात झरे खेळते झाले. यातून ओलित वाढले. यावर्षी गावातले स्थलांतर कमी होण्यास मोलाची मदत लाभली. गावातच अनेकांना रोजगार मिळाला.दगडांचं गाव टँकरमुक्तडोंगरमाथ्यावर वसलेले तोरणाळा गाव दगडांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामुळे या गावाला नागालँड अशी ओळख मिळाली होती. दगडामुळे गावात पाणी नाही. यातून गावात सहा महिने टँकर लागलेलेच असायचे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी तीन किलोमीटर प्रवास करावा लागत होता. दुष्काळी स्थितीत या गावातील २५ जनावरे पाण्यावाचून मेली. मात्र वॉटरकप स्पर्धेने आज या गावाच्या शेतशिवारात मुबलक पाणी आहे.लहान, थोरांच्या पुढाकाराने शिवार हिरवेगारगावशिवारातील पाण्याचा प्रत्येक स्रोत गतवर्षीपर्यंत कोरडा पडत होता. मात्र लहान-थोरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे प्रत्येक स्रोताला पाणी आले. विविध प्रकारचे शेती उत्पादन या पाण्यावर घेतले जाऊ लागले. संपूर्ण शिवार हिरवेगार झाले. भाजीपाला, फळे याशिवाय दुबार पिकेही या भागात घ्यायला सुरुवात झाली.पाणीदार गावासाठी गावकरी आपल्या परीने युद्धपातळीवर काम करीत आहे. जलयुक्तशिवारमधून शासनाने काम दिल्यास हे गाव आदर्श ठरेल.- शेषराव राठोडमाजी सरपंच, तोरनाळागावकºयांच्या योगदानाने गावात हिरवे स्वप्न साकार करता आले. गावकºयांनी श्रमदानात भरपूर योगदान केल्यामुळे पाण्याचा आज सुकाळ झाला.- बेबी राठोडसरपंच, तोरनाळा