शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

दुष्काळग्रस्त गावाचं शिवार पाणीदार झालं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 21:31 IST

सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका वर्षात गावाचे संपूर्ण चित्रच पालटले.

ठळक मुद्देसंडे अँकर । कामासाठी युवकांचे स्थलांतर थांबले, शेतशिवारही समृद्धीच्या दिशेने, तोरनाळा गावात घडली किमया

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ:सतत दुष्काळी स्थितीचा सामना करणाऱ्या तोरनाळा गावाला स्थलांतराची कीड लागली होती. पाण्याअभावी शेतशिवार ओस पडले होते. रोजगाराच्या शोधात युवक गावाबाहेर पडत होते. यामुळे गावकरी चिंतातुर होते. अशात पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेने आशेचा किरण उगवला. एका वर्षात गावाचे संपूर्ण चित्रच पालटले. याला केवळ गावकऱ्यांचे श्रमदान आणि सकारात्मक दृष्टिकोन कारणीभूत ठरला. त्यातूनच हे दुष्काळग्रस्त गाव आज पाणीदार झाले आहे.या गावाने गतवर्षी पावसाळ्यापूर्वी श्रमदानातून आठ हजार ६६६ घनमीटरचे काम केले. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडविण्यासाठी १६६ शोषखड्डे केले. यंत्राच्या मदतीने एक लाख १४ हजार ६४६ घनमीटरचे काम करण्यात आले. यामुळे पावसाळ्यात १२ कोटी ६१ लाख लिटर पाण्याचा साठा झाला. या जलसमृद्धीने गावात आज आटलेल्या विहिरींनाही पाणी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.शिवारात इतके खेळते पाणी आजपर्यंत पाहिले नव्हते, असे मत गावकरी व्यक्त करतात. भूजल स्त्रोतातही सुधारणा झाली. विहिरींना मोठ्या प्रमाणात झरे खेळते झाले. यातून ओलित वाढले. यावर्षी गावातले स्थलांतर कमी होण्यास मोलाची मदत लाभली. गावातच अनेकांना रोजगार मिळाला.दगडांचं गाव टँकरमुक्तडोंगरमाथ्यावर वसलेले तोरणाळा गाव दगडांचे गाव म्हणून ओळखले जाते. यामुळे या गावाला नागालँड अशी ओळख मिळाली होती. दगडामुळे गावात पाणी नाही. यातून गावात सहा महिने टँकर लागलेलेच असायचे. जनावरांना पाणी पाजण्यासाठी तीन किलोमीटर प्रवास करावा लागत होता. दुष्काळी स्थितीत या गावातील २५ जनावरे पाण्यावाचून मेली. मात्र वॉटरकप स्पर्धेने आज या गावाच्या शेतशिवारात मुबलक पाणी आहे.लहान, थोरांच्या पुढाकाराने शिवार हिरवेगारगावशिवारातील पाण्याचा प्रत्येक स्रोत गतवर्षीपर्यंत कोरडा पडत होता. मात्र लहान-थोरांनी घेतलेल्या पुढाकारामुळे प्रत्येक स्रोताला पाणी आले. विविध प्रकारचे शेती उत्पादन या पाण्यावर घेतले जाऊ लागले. संपूर्ण शिवार हिरवेगार झाले. भाजीपाला, फळे याशिवाय दुबार पिकेही या भागात घ्यायला सुरुवात झाली.पाणीदार गावासाठी गावकरी आपल्या परीने युद्धपातळीवर काम करीत आहे. जलयुक्तशिवारमधून शासनाने काम दिल्यास हे गाव आदर्श ठरेल.- शेषराव राठोडमाजी सरपंच, तोरनाळागावकºयांच्या योगदानाने गावात हिरवे स्वप्न साकार करता आले. गावकºयांनी श्रमदानात भरपूर योगदान केल्यामुळे पाण्याचा आज सुकाळ झाला.- बेबी राठोडसरपंच, तोरनाळा