शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कापसाचे दर घसरल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:05 IST

परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस घरीच साठवून ठेवला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा धास्तावला आहे.

ठळक मुद्देघरातच साठवणूक : अनेकांना त्वचारोगाची लागणी, आरोग्यावरील खर्चात झाली वाढ

ऑनलाईन लोकमतहिवरी : परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस घरीच साठवून ठेवला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा धास्तावला आहे. खरीप हंगामात उधार, उसनवारीवर पैसे आणून शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त केले. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीवर नांगर फिरविला. त्यानंतर अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त झाले. कपाशीच्या उतारीतही घट आली. महागडे बियाणे घेवून लागवड केलेल्या कापसाचा खर्च निघनेही कठीण झाले. मात्र निसर्गाने शेतकºयांच्या अपेक्षेवर पाणी फेरले.सर्व संकटांना पार करीत शेतकऱ्यांनी कापूस वेचाई केली. तत्पूर्वी उधारीवरच कीटकनाशकांची फवारणी केली. दर वाढण्याच्या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला. मात्र आता बाजारात दर घसरल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. शेतकऱ्यांनी घरी साठवून ठेवलेल्या कापसामुळे त्वचारोगाची लागण होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे. या सर्व बाबींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. शासनाकडूनही कोणतीच उपाययोजना केली जात नाही. राज्य शासनाने कापसाला वाढीव भाव देवून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.लोणबेहळ परिसरातील शेतकऱ्यांचा घातलोणबेहळ : कापसाचे दर सतत कमी होत असल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहे. यावर्षी लोणबेहळ परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली होती. मात्र अपुऱ्या पावसामुळे आणि नंतर आलेल्या बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन घटले. दरवर्षीपेक्षा उत्पादन निम्यावरच आले. उत्पादन कमी झाल्याने किमान भाव तरी चांगले मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे अनेकांनी चांगल्या प्रतीचा कापूस घरातच भरून ठेवला होता. मात्र आता कापसाचे भाव दररोज घसरत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीच्या कापसाला योग्य दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :cottonकापूस