शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

कापसाचे दर घसरल्याने शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 22:05 IST

परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस घरीच साठवून ठेवला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे. यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा धास्तावला आहे.

ठळक मुद्देघरातच साठवणूक : अनेकांना त्वचारोगाची लागणी, आरोग्यावरील खर्चात झाली वाढ

ऑनलाईन लोकमतहिवरी : परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांनी दरवाढीच्या अपेक्षेने कापूस घरीच साठवून ठेवला. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे.यावर्षी अस्मानी आणि सुलतानी संकटाने बळीराजा धास्तावला आहे. खरीप हंगामात उधार, उसनवारीवर पैसे आणून शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. मात्र बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त केले. अनेक शेतकऱ्यांनी उभ्या कपाशीवर नांगर फिरविला. त्यानंतर अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकरी उद्ध्वस्त झाले. कपाशीच्या उतारीतही घट आली. महागडे बियाणे घेवून लागवड केलेल्या कापसाचा खर्च निघनेही कठीण झाले. मात्र निसर्गाने शेतकºयांच्या अपेक्षेवर पाणी फेरले.सर्व संकटांना पार करीत शेतकऱ्यांनी कापूस वेचाई केली. तत्पूर्वी उधारीवरच कीटकनाशकांची फवारणी केली. दर वाढण्याच्या अपेक्षेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला. मात्र आता बाजारात दर घसरल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. शेतकऱ्यांनी घरी साठवून ठेवलेल्या कापसामुळे त्वचारोगाची लागण होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना खर्च करावा लागत आहे. या सर्व बाबींमुळे शेतकरी हवालदिल झाले आहे. शासनाकडूनही कोणतीच उपाययोजना केली जात नाही. राज्य शासनाने कापसाला वाढीव भाव देवून शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.लोणबेहळ परिसरातील शेतकऱ्यांचा घातलोणबेहळ : कापसाचे दर सतत कमी होत असल्याने परिसरातील शेतकरी चिंतेत सापडले आहे. यावर्षी लोणबेहळ परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली होती. मात्र अपुऱ्या पावसामुळे आणि नंतर आलेल्या बोंडअळीमुळे कपाशीचे उत्पादन घटले. दरवर्षीपेक्षा उत्पादन निम्यावरच आले. उत्पादन कमी झाल्याने किमान भाव तरी चांगले मिळतील, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. त्यामुळे अनेकांनी चांगल्या प्रतीचा कापूस घरातच भरून ठेवला होता. मात्र आता कापसाचे भाव दररोज घसरत असल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहे. शेतकऱ्यांच्या चांगल्या प्रतीच्या कापसाला योग्य दर मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :cottonकापूस