शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

ट्रान्सफार्मर जळाल्याने ओलीत दुर्लभ, शेतकरी झाले संतप्त

By admin | Updated: October 9, 2014 23:09 IST

येथील ३३ के़व्ही़ उपकेंद्रातील मजरा-बोदाड शिवारातील कृषी पंपाकरिता असलेले ट्रान्सफार्मर एक आठवड्यापूर्वी जळाला़ अद्याप पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत आहे़

मार्डी : येथील ३३ के़व्ही़ उपकेंद्रातील मजरा-बोदाड शिवारातील कृषी पंपाकरिता असलेले ट्रान्सफार्मर एक आठवड्यापूर्वी जळाला़ अद्याप पर्यायी व्यवस्था न झाल्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी वाळण्याच्या स्थितीत आहे़विठ्ठल बदकी यांच्या शेतात असलेल्या विद्युत ट्रान्सफार्मरवरून परिसरातील २७ कृषी ग्राहकांना विद्युत पुरवठा केला जातो. याशिवाय काही अवैध जोडण्या असण्याचा आरोप आहे़ या ट्रान्सफार्मरच्या क्षमतेनुसार २० कृषी पंपाना विद्युत पुरवठा होऊ शकतो़ परंतु विद्युत विभागाचा आनागोंदी कारभार आणि कामचलावू धोरणामुळे यांत्रिक क्षमता विचारात न घेता नियमबाह्य पध्दतीने जादा जोडण्यात आल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. याचा परिणाम ट्रान्सफार्मरवर झाला. ते ओव्हरलोड होऊन सयंत्रात बिघाड निर्माण झाला. अखेर हे ट्रान्सफार्मरच जळाले.या बाबी परिसरात वारंवार घडत असतात़ या तांत्रिक दोषाकडे विद्युत विभागाचे कर्मचारी, अभियंते दुर्लक्ष करतात़ यात शेतकरी, ग्राहकांसोभतच महावितरणचेही आर्थिक नुकसान होते़ त्याचबरोबर शेतकऱ्यांना शेतमालांना पाणी देणे कठीण जाते. ओलिताच्या पिकांवर त्याचा विपरीत परिणाम होऊन शेतमाल करपून वाळण्याच्या अवस्थेत जातो. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला जातो़ सध्या पिकांना ओलिताच्या पाण्याची अत्यंत गरज आहे़ परंतु पाणी असूनही वीजेअभावी शेतकरी हतबल ठरले आहेत़या संदर्भात संबंधित शेतकरी मारेगाव, पांढरकवडा येथील महावितरण कार्यालयात गेले. तेथे त्यांनी पर्यायी ट्रान्सफार्मर त्वरित उपलब्ध करून द्यावा अशी मागणी केली. यासाठी त्यांनी अनेकदा चकरा मारल्या. तरीही महावितरणचे अधिकारी दखल घेण्यास टाळाटाळ करीत असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे़ वरिष्ठ कार्यालयाकडून ट्रान्सफार्मर उपलब्ध झाल्यानंतर पाठवू म्हणून शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. महावितरणच्या चुकीच्या कार्यपध्दतीचा फटका मात्र शेतकरी, ग्राहकांना बसत आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होऊन त्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे़ या नुकसानीला महावितरण जबाबदार नाही का, असा प्रश्न अन्यायग्रस्त शेतकरी उपस्थित करीत आहेत. (वार्ताहर)