शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बांधकाम विभागाच्या पुलामुळे शेतीचे नुकसान

By admin | Updated: November 17, 2014 23:03 IST

तालुक्यातील लेवा ते बारभाई तांडा या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम केले. मुळात या पुलाचा आराखडाच चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आल्यामुळे पाणी पुलाखालून जाण्या ऐवजी

महागाव : तालुक्यातील लेवा ते बारभाई तांडा या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम केले. मुळात या पुलाचा आराखडाच चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आल्यामुळे पाणी पुलाखालून जाण्या ऐवजी भिंतीवर आदळून परिसरातील शेतात साचत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लेवा ते बारभाई तांडा मार्गावर पूल उभारण्यासाठी करण्यात आलेला सर्वेत प्रचंड चुका असल्याचे आता आढळून येत आहे. चुकीचा सर्वेक्षण अहवाल सादर झाला. त्यावरून ४० लाख रुपयांचे पुलाचे बांधकाम झाले. पूलच चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह पुलाच्या भिंतीवर आदळत आहे. हे पाणी परिसरातील शेतात घुसल्याने जवळपास १५ एकर शेतीचे नुकसान झाले आहे. या मार्गावर असलेल्या पोखरी, मोहदी, माळवागद, बारभाई तांडा, लेवा येथील नाल्याला बारमाही पाणी असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांच्या सोयीसाठी येथे पूल उभारण्यात आला. मात्र चुकीचा सर्वेक्षण अहवाल घेऊन काम झाल्यामुळे नवीनच समस्या निर्माण झाली आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव येथील शाखा अभियंत्याच्या चुकीने ४० लाखांचा खर्च मातीमोल ठरत आहे. या प्रकरणात परिसरातील शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे. चुकीेचे सर्वेक्षण करून निधीचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जावी अशी मागणीही त्या परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)