शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
5
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
6
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
7
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
8
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
9
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
10
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
11
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
12
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
13
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
14
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
15
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
16
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
17
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
18
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
19
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
20
मोठी बातमी! कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश

बांधकाम विभागाच्या पुलामुळे शेतीचे नुकसान

By admin | Updated: November 17, 2014 23:03 IST

तालुक्यातील लेवा ते बारभाई तांडा या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम केले. मुळात या पुलाचा आराखडाच चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आल्यामुळे पाणी पुलाखालून जाण्या ऐवजी

महागाव : तालुक्यातील लेवा ते बारभाई तांडा या मार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाचे बांधकाम केले. मुळात या पुलाचा आराखडाच चुकीच्या पद्धतीने बनविण्यात आल्यामुळे पाणी पुलाखालून जाण्या ऐवजी भिंतीवर आदळून परिसरातील शेतात साचत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. लेवा ते बारभाई तांडा मार्गावर पूल उभारण्यासाठी करण्यात आलेला सर्वेत प्रचंड चुका असल्याचे आता आढळून येत आहे. चुकीचा सर्वेक्षण अहवाल सादर झाला. त्यावरून ४० लाख रुपयांचे पुलाचे बांधकाम झाले. पूलच चुकीच्या ठिकाणी टाकण्यात आल्याने पाण्याचा प्रवाह पुलाच्या भिंतीवर आदळत आहे. हे पाणी परिसरातील शेतात घुसल्याने जवळपास १५ एकर शेतीचे नुकसान झाले आहे. या मार्गावर असलेल्या पोखरी, मोहदी, माळवागद, बारभाई तांडा, लेवा येथील नाल्याला बारमाही पाणी असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रवास करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. नागरिकांच्या सोयीसाठी येथे पूल उभारण्यात आला. मात्र चुकीचा सर्वेक्षण अहवाल घेऊन काम झाल्यामुळे नवीनच समस्या निर्माण झाली आहे. शिवाय सार्वजनिक बांधकाम उपविभाग महागाव येथील शाखा अभियंत्याच्या चुकीने ४० लाखांचा खर्च मातीमोल ठरत आहे. या प्रकरणात परिसरातील शेतकऱ्यांना आपली जमीन पडीत ठेवण्याची वेळ आली आहे. चुकीेचे सर्वेक्षण करून निधीचा अपव्यय करणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई केली जावी अशी मागणीही त्या परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे. (शहर प्रतिनिधी)