शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

सिमेंट बंधाऱ्यांमुळे जलस्रोतांची पातळी स्थिर

By admin | Updated: November 2, 2015 01:51 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून बंधारा परिसरातील जलस्रोतांची पातळी स्थिर आहे.

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून बंधारा परिसरातील जलस्रोतांची पातळी स्थिर आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करत अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय विहिरी आणि हातपंपांची पाण्याची पातळी चांगली असल्याने पुढील काळात पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार नाही, असे सांगितले जाते. यवतमाळ लघुसिंचन विभागामार्फत अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. राळेगाव तालुक्याच्या पिंपळगाव या पाणीटंचाईग्रस्त गावात सिमेंटनाला बांध निर्माण करण्यात आला. १८ मीटर लांब आणि एक मीटर उंचीच्या या बंधाऱ्यात पहिल्याच पावसात भरपूर पाणी संचय झाले. बांधकामासह नाला खोलीकरण आणि रूंदीकरणाचेही काम घेण्यात आले. यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ट्यूबवेलच्या पातळीत वाढ झाली. लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. कुंभारे यांच्या मार्गदर्शनात सदर बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. बेंबळा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.व्ही. राठोड, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते आदींनी या बंधाऱ्याची पाहणी वेळोवेळी केली. शिवाय नेर तालुक्यातील धुलापूर येथे विनोद गेडाम यांच्या शेतात सिमेंट नाला बांध निर्माण करण्यात आला. यातील पाण्याचा वापर करून ते ओलित करत आहे. पुसद तालुक्याच्या वडसद येथील बंधाऱ्याविषयी साहेबराव राठोड यांनीही विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्याचे सांगितले. कळंब तालुक्यात तीन ठिकाणी सिमेंट नाला बांधाचे काम करण्यात आले. याशिवाय उमरखेड, घाटंजी, दारव्हा आदी तालुक्यात बांध बांधण्यात आले. यातून सिंचनासोबतच जलपातळीत वाढ झाली आहे. याविषयीचे शेतकऱ्यांनीही आपले अनुभव मांडले आहे. (वार्ताहर)