शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

सिमेंट बंधाऱ्यांमुळे जलस्रोतांची पातळी स्थिर

By admin | Updated: November 2, 2015 01:51 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून बंधारा परिसरातील जलस्रोतांची पातळी स्थिर आहे.

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून बंधारा परिसरातील जलस्रोतांची पातळी स्थिर आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करत अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय विहिरी आणि हातपंपांची पाण्याची पातळी चांगली असल्याने पुढील काळात पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार नाही, असे सांगितले जाते. यवतमाळ लघुसिंचन विभागामार्फत अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. राळेगाव तालुक्याच्या पिंपळगाव या पाणीटंचाईग्रस्त गावात सिमेंटनाला बांध निर्माण करण्यात आला. १८ मीटर लांब आणि एक मीटर उंचीच्या या बंधाऱ्यात पहिल्याच पावसात भरपूर पाणी संचय झाले. बांधकामासह नाला खोलीकरण आणि रूंदीकरणाचेही काम घेण्यात आले. यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ट्यूबवेलच्या पातळीत वाढ झाली. लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. कुंभारे यांच्या मार्गदर्शनात सदर बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. बेंबळा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.व्ही. राठोड, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते आदींनी या बंधाऱ्याची पाहणी वेळोवेळी केली. शिवाय नेर तालुक्यातील धुलापूर येथे विनोद गेडाम यांच्या शेतात सिमेंट नाला बांध निर्माण करण्यात आला. यातील पाण्याचा वापर करून ते ओलित करत आहे. पुसद तालुक्याच्या वडसद येथील बंधाऱ्याविषयी साहेबराव राठोड यांनीही विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्याचे सांगितले. कळंब तालुक्यात तीन ठिकाणी सिमेंट नाला बांधाचे काम करण्यात आले. याशिवाय उमरखेड, घाटंजी, दारव्हा आदी तालुक्यात बांध बांधण्यात आले. यातून सिंचनासोबतच जलपातळीत वाढ झाली आहे. याविषयीचे शेतकऱ्यांनीही आपले अनुभव मांडले आहे. (वार्ताहर)