शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

सिमेंट बंधाऱ्यांमुळे जलस्रोतांची पातळी स्थिर

By admin | Updated: November 2, 2015 01:51 IST

जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून बंधारा परिसरातील जलस्रोतांची पातळी स्थिर आहे.

यवतमाळ : जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून ठिकठिकाणी बंधाऱ्याची निर्मिती केली जात आहे. या माध्यमातून बंधारा परिसरातील जलस्रोतांची पातळी स्थिर आहे. बंधाऱ्यातील पाण्याचा वापर करत अनेक शेतकऱ्यांनी आर्थिक समृद्धी साधण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय विहिरी आणि हातपंपांची पाण्याची पातळी चांगली असल्याने पुढील काळात पाणीटंचाईची तीव्रता जाणवणार नाही, असे सांगितले जाते. यवतमाळ लघुसिंचन विभागामार्फत अनेक ठिकाणी बंधारे बांधण्यात आले. राळेगाव तालुक्याच्या पिंपळगाव या पाणीटंचाईग्रस्त गावात सिमेंटनाला बांध निर्माण करण्यात आला. १८ मीटर लांब आणि एक मीटर उंचीच्या या बंधाऱ्यात पहिल्याच पावसात भरपूर पाणी संचय झाले. बांधकामासह नाला खोलीकरण आणि रूंदीकरणाचेही काम घेण्यात आले. यामुळे गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या ट्यूबवेलच्या पातळीत वाढ झाली. लघु सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता एस.डी. कुंभारे यांच्या मार्गदर्शनात सदर बंधाऱ्याची निर्मिती करण्यात आली. बेंबळा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता डी.व्ही. राठोड, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते आदींनी या बंधाऱ्याची पाहणी वेळोवेळी केली. शिवाय नेर तालुक्यातील धुलापूर येथे विनोद गेडाम यांच्या शेतात सिमेंट नाला बांध निर्माण करण्यात आला. यातील पाण्याचा वापर करून ते ओलित करत आहे. पुसद तालुक्याच्या वडसद येथील बंधाऱ्याविषयी साहेबराव राठोड यांनीही विहिरीच्या पाण्याची पातळी वाढल्याचे सांगितले. कळंब तालुक्यात तीन ठिकाणी सिमेंट नाला बांधाचे काम करण्यात आले. याशिवाय उमरखेड, घाटंजी, दारव्हा आदी तालुक्यात बांध बांधण्यात आले. यातून सिंचनासोबतच जलपातळीत वाढ झाली आहे. याविषयीचे शेतकऱ्यांनीही आपले अनुभव मांडले आहे. (वार्ताहर)