शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

खत रॅक पॉईंटचे भीजत घोंगडे

By admin | Updated: June 9, 2014 23:52 IST

गेल्या चार वर्षांपासून कायर येथील रॅक पॉईंटचे घोंगडे भीजतच पडले आहे. खासदारांनी मोठा गाजावाजा केलेला हा रॅक पॉईंट अद्याप केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात कायरला अजूनही खत उतरलेच नाही.

वणी : गेल्या चार वर्षांपासून कायर येथील रॅक पॉईंटचे घोंगडे भीजतच पडले आहे.  खासदारांनी मोठा गाजावाजा केलेला हा रॅक पॉईंट अद्याप केवळ कागदावरच आहे. प्रत्यक्षात कायरला अजूनही खत उतरलेच नाही.परिसरातील शेतकर्‍यांच्या सोयीसाठी कायर येथील खताचा रॅक पॉईंट प्रस्तावित होता. कायरला खत उतरल्यास या परिसरातील शेतकर्‍यांना खत मिळणे सहज, सोपे आणि कमी खर्चाचे झाले असते. गेल्या चार वर्षांपूर्वी कायर येथील या खत रॅक पॉईंटला मंजुरी मिळाल्याचे खासदार हंसराज अहीर यांनी सांगितले होते. आता त्याला चार वर्षे लोटली आहेत. त्यावर्षी नाही तर किमान दुसर्‍या, तिसर्‍या वर्षी हा रॅक पॉईंट अस्तित्वात येईल, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा होती. मात्र आता चार वर्षे लोटूनही हा रॅक पॉईंट प्रत्यक्षात आलाच नाही. कायर येथे अद्याप खत उतरलेच नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या आशा आता पूर्णपणे मावळल्या आहेत. जिल्हय़ाला धामणगाव येथील रॅक पॉईंटवरून खताचा पुरवठा होतो. वणीलगतच्या चंद्रपूर येथेही खतासाठी रॅक पॉईट देण्यात आला आहे. धामणगाव येथून येणार्‍या खतावरच वणी, मारेगाव, झरी, पांढरकवडा तालुक्यातील शेतकर्‍यांना अवलंबून राहावे लागते. धामणगाव ते वणी हे अंतर जवळपास दीडशे किलोमीटर आहे. तेथून वणी, मारेगाव, पंढरकवडा, झरी तालुक्यातील कृषी केंद्र चालकांना खत आणावे लागते. त्यासाठी त्यांचा प्रवास खर्च वाढतो. या वाढीव प्रवास खर्चाचा भार अखेर शेतकर्‍यांवरच येऊन पडतो. धामणगाव येथून खत आणण्यासाठी जादा वेळही लागतो. परिणामी वेळेवर खत उपलब्ध होईल की नाही, अशी साशंकता शेतकर्‍यांना असते. धामणगावचे अंतर, वेळ, वाहतूक खर्च या सर्व बाबी विचारात घेऊनच कायर येथे रॅक पॉईंट देण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत होती. त्याच अनुषंगाने खासदारांनी रेल्वे मंत्रालयाकडे कायर येथे रॅक पॉईंट देण्याची मागणी केली होती. रेल्वेने ती मंजूर केल्याचे खासदारांनीच जाहीर केले होते. तसे पत्रही त्यांनी वृत्तपत्र प्रतिनिधींना दाखविले होते. हा रॅक पॉईंट आपणच खेचून आणल्याचा दावाही त्यांनी केला होता. आता त्याला चार वर्षे लोटली. मात्र कायरचा रॅक र्पाईंट कागदावरून अद्याप पुढे सरकलाच नाही.आता खरीप हंगाम सुरू होत आहे. शेतकरी खतासाठी धावाधाव करीत आहे. त्यांना चढय़ा दराने खत खरेदी करावे लागत आहे. मात्र खासदारांना त्याचे कोणतेच सोयरसुतक दिसून येत नाही. कायर येथे खत साठविण्यासाठी गोदामाची व्यवस्था नसल्याने रॅक पॉईंट रखडल्याचे आता सांगण्यात येत आहे. त्यासाठी राज्य शासन अडवणूक करीत असल्याचा आरोप करण्यात येतो. दुसरीकडे कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनीही हा रॅक पाईंट कॉंग्रसनेच आणल्याचे सांगितले होते. तेही आता मूग गिळून आहे. त्यामुळे शेतकरी मात्र वार्‍यावर सापडले आहे.कायर येथील रेल्वे स्थानकात मात्र सिमेंटची पोती सर्वत्र दिसतात. सिमेंट कंपन्या तेथूनच संपूर्ण रेल्वेत सिमेंटची पोती भरून तेथून दुसरीकडे पाठवितात. सिमेंट तेथे उतरत असताना, खत का उतरू शकत नाही, असा प्रश्न आहे. सिमेंट तर थोडे जरी पाणी लागले तरी वाया जाऊ शकते. तरीही सिमेंट कंपन्या तेथे सिमेंटची पोती उतरवितात. त्याचप्रमाणे तेथे खत उतरविणेही शक्य आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींच्या दृढ इच्छाशक्तीची गरज आहे. (कार्यालय प्रतिनिधी)