शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

खाजगी ट्रॅव्हल्सच्या मद्यधुंद चालकामुळे प्रवाशांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2023 20:37 IST

Yawatmal News पुणे येथून बुधवारी रात्री प्रवासी घेवून निघालेल्या ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत सुसाट वाहन हाकत होता. हे पाहून त्यातील २५ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. एका प्रवाशाने दारव्हा ठाणेदाराचा मोबाईल नंबर मिळवून त्यांना संपर्क केला.

यवतमाळ : ट्रॅव्हल्स मालक व चालकांच्या बेदरकारपणामुळे निष्पाप प्रवाशांचा बळी जात आहे. समृद्धी महामार्गावर २५ जणांचा ट्रॅव्हल्स अपघातात नुकताच जळून दुदैवी मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच ट्रॅव्हल्स चालक व मालक सुधारण्यास तयार नाही. पुणे येथून बुधवारी रात्री प्रवासी घेवून निघालेल्या ट्रॅव्हल्सचा चालक मद्यधुंद अवस्थेत सुसाट वाहन हाकत होता. हे पाहून त्यातील २५ प्रवाशांचा जीव टांगणीला लागला. एका प्रवाशाने दारव्हा ठाणेदाराचा मोबाईल नंबर मिळवून त्यांना संपर्क केला. आपबिती सांगितली. त्यानंतर ही ट्रॅव्हल्स दारव्हा येथे गुरुवारी दुपारी ३.४५ वाजता थांबविण्यात आली. तेव्हा प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.

 बुधवारी रात्री पुणे येथून २५ प्रवासी घेवून ही ट्रॅव्हल्स नागपूरकडे निघाली. काही अंतर पार केल्यानंतर ट्रॅव्हल्स चालक बेदरकारपणे वाहन हाकत असल्याचे प्रवाशांच्या लक्षात आले. नुकतीच समृद्धी महामार्गावरील पिंपळखुटा येथील अपघाताची घटना घडली आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाच्या मनात ट्रॅव्हल्सबाबत भीती निर्माण झाली आहे. त्यात चालक काही ऐक ऐकण्यास तयार नव्हता. या संकटातून सुटका कशी करायची अशी धडपड प्रवाशांची सुरू होती. या प्रवाशांनी दारव्हा ठाणेदार विलास कुलकर्णी यांचा मोबाईल क्रमांक मिळवून त्यांना संपर्क केला.

ट्रॅव्हल्स चालकाच्या कृत्याची व जीव धोक्यात असल्याची माहिती दिली. त्यानंतर तत्काळ शहरात बसस्थानकासमोर ही ट्रॅव्हल्स पोलिसांनी थांबविली. चालक अमृत प्रल्हाद थेर (४६) रा. माहुली ता. दारव्हा याला ताब्यात घेतले. तो मद्यधुंद अवस्थेत होता. त्याची तत्काळ वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्ताचे नमुनेही तपासणीला पाठविण्यात आले. ट्रॅव्हल्स मालक व चालक या दोघांवरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया दारव्हा पोलिस ठाण्यात सुरू होती. शिवाय या ट्रॅव्हल्सची सुद्धा आरटीओंकडून तपासणी केली जाणार आहे. ट्रॅव्हल्स मालकावरही कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांनी केली. त्यानंतर प्रवासी पर्यायी वाहनाने नागपूरकडे रवाना झाले आहे.

प्रवाशांच्या सतर्कतेने टळला अनर्थदिवसाचा प्रवास असल्याने मद्यधुंद चालकाचा प्रताप प्रवाशांच्या लक्षात आला. रात्री जाणाऱ्या ट्रॅव्हल्समध्ये मात्र प्रवाशी बिनधास्तपणे झोपी जातात. ट्रॅव्हल्स मालक कुठलीही पडताळणी न करता चालकांना ट्रॅव्हल्स सोपवितात. त्यात प्रवाशांचा जीव धोक्यात घातला जातो. असे प्रकार सातत्याने घडत आहे. यवतमाळातील अपघातात १२ प्रवासी तर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या अपघातात २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला. त्यानंतरही यात सुधारणा झालेली नाही. प्रशासन कुठलीच कारवाई करताना दिसत नाही. हप्तेखोरीतून ट्रॅव्हल्स मालकांनी यंत्रणेला दावणीला बांधल्याचा आरोप होत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी