शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

एक दिवसात पावणे दोन लाख क्विंटलचे आव्हान

By admin | Updated: May 31, 2017 00:25 IST

तूर खरेदीसाठी केवळ एक दिवस उरला आहे. या एका दिवसाात तब्बल पावणे दोन लाख क्विंटल तुरीचे

शेवटचा दिवस : तुरीच्या ट्रान्सपोर्टसाठी वाहनांच्या रांगा, पोलिसांचीही मदत घेणार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : तूर खरेदीसाठी केवळ एक दिवस उरला आहे. या एका दिवसाात तब्बल पावणे दोन लाख क्विंटल तुरीचे मोजपाप करण्याचे आव्हान खरेदी केंद्रांपुढे उभे ठाकले आहे. जिल्ह्यातील १५ केंद्रांवर आत्तापर्यंत नव्याने तीन लाख क्विंटल तूर खरेदी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या केंद्रांवर आणखी पावणे दोन लाख क्विंटल तूर खरेदी करायची आहे. सध्या या केंद्रांवर ६० हजार ३५० क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. याशिवाय आठ हजार १९२ टोकनधारक शेतकऱ्यांच्या घरी एक लाख १२ हजार ३४७ क्विंटल तूर पडून आहे. त्यांना अद्याप खरेदी केंद्राकडून बोलावणेच आले नाही. ३१ मे ही तूर खरेदीची अंतिम तारीख आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केंंद्रांवर एकच गर्दी केली आहे. ही स्थिती हाताळण्यासाठी पोलिसांची मदत घेण्याच्या सूचना सहकार विभागाने केंद्रांना दिल्या आहेत. शासकीय तूर खरेदी केंद्रावर आलेली तूर वेअर हाऊसमध्ये घेऊन जाणे बंधनकारक आहे. त्यानंतरच चुकारे मिळणार आहे. मात्र वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. गोदामात जागा नसल्याने वाहन रिकामे करण्यासाठी गोदामासमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच तूर खरेदी वादात सापडली आहे. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. तुरीचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले आहे. परंतु शासनाकडून नियोजनपूर्वक खरेदी करण्यात न आल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याचा फायदा व्यापाऱ्यांनी करून घेतला आहे. आता पुन्हा एकदा तूर खरेदीसाठी केवळ एक दिवस उरला असल्याने शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे. एका दिवसात तूर खरेदी करण्याचे आव्हान यंत्रणेला पेलवणे कठीण वाटत आहे.