शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: राज्यात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीवर, महाविकाआघाडीची काय परिस्थिती?
2
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
3
Jawhar Nagar Parishad Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
4
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
5
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
6
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
7
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
8
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
9
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
10
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
11
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
12
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
13
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
14
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
15
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
16
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
17
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
18
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
19
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
20
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
Daily Top 2Weekly Top 5

मलमपट्टी झाली, आता सर्जरी करा !

By admin | Updated: June 18, 2017 00:56 IST

कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जखमांवर तातडीची मलमपट्टी झाली. मात्र, माफीमुळे कर्जमुक्ती होणार नाही.

बच्चू कडू : स्वामिनाथन आयोगासाठी पंतप्रधान निवासावर मोर्चा काढणार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जखमांवर तातडीची मलमपट्टी झाली. मात्र, माफीमुळे कर्जमुक्ती होणार नाही. त्यासाठी सर्जरी करावी लागणार आहे. म्हणूनच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, या मागणीसाठी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासावर प्रहारतर्फे मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. बाभूळगाव तालुक्यातील भोई समाजबांधवांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी शनिवारी आमदार कडू आले होते. बाभूळगावातील सभेनंतर यवतमाळातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, शेतकरी आंदोलन हे सामान्य शेतकऱ्यांचेच आंदोलन होते. कर्जमाफीचे श्रेय त्या आंदोलक शेतकऱ्यांचेच आहे. ५ जूनचा बंद ही देशातील ऐतिहासिक घटना होय. मात्र, निकषांमुळे या कर्जमाफीचा लाभ अर्ध्याच शेतकऱ्यांना होणार आहे. आता स्वामिनाथन आयोग लागू करण्यासोबतच आयात-निर्यातीच्या धोरणावरही लक्ष द्यावे लागणार आहे. सरकार आधी ३१ आॅक्टोबरपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्याची भाषा करत होते. मात्र, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि सुकाणू समितीच्या चर्चेमुळे आत्ताच कर्जमाफी घोषित झाली व नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या तातडीने १० हजारांचे कर्ज मिळणे आवश्यक आहे. घोषणेनंतर २-३ दिवस उलटूनही ते मिळताना दिसत नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असलेल्या शेतकऱ्यांवर घातलेली बंधनेही काढण्याबाबत चर्चा करणार असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले. पॉलीहाउस, ठिबक सिंचनासाठी कर्ज घेणारे शेतकरी, उसणवारी करून बँकेचे कर्ज फेडणारे शेतकरी यांनाही कर्जमाफीचा फायदा मिळावा, यासाठी २०-२१ जूनच्या बैठकीत प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. वाघासाठी अमिताभ, मग शेतकऱ्यांसाठी कोण ? यवतमाळ जिल्ह्यात अनेकांची शेती जंगलाकाठी असल्याने वन्यप्राण्यांचा त्रास आहे. वन्यप्राण्यांना मारले, तर शेतकऱ्यांवर कारवाई होते. शेतकऱ्याचा बैल वनजमिनीत घुसला, तर वापसच येत नाही. वाघ वाचवण्यासाठी सरकारने आमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर केले. पण वाघाच्या हल्ल्यात मरणाऱ्या शेतकऱ्यांना कोण वाचवणार? आत्तापर्यंत २१ नेते शेतकऱ्यांविषयी अपशब्द बोलले. शेतकरी वेगवेगळ्या पक्षाच्या दावणीला बांधला गेल्याने त्यांचे प्रश्न सुटत नाही. हाती नांगर धरला की शेतकऱ्याने डोक्यात धर्म-जात ठेवूच नये. आपल्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले.