शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

मलमपट्टी झाली, आता सर्जरी करा !

By admin | Updated: June 18, 2017 00:56 IST

कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जखमांवर तातडीची मलमपट्टी झाली. मात्र, माफीमुळे कर्जमुक्ती होणार नाही.

बच्चू कडू : स्वामिनाथन आयोगासाठी पंतप्रधान निवासावर मोर्चा काढणार लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : कर्जमाफीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जखमांवर तातडीची मलमपट्टी झाली. मात्र, माफीमुळे कर्जमुक्ती होणार नाही. त्यासाठी सर्जरी करावी लागणार आहे. म्हणूनच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, या मागणीसाठी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान निवासावर प्रहारतर्फे मोर्चा काढण्यात येईल, अशी माहिती आमदार बच्चू कडू यांनी दिली. बाभूळगाव तालुक्यातील भोई समाजबांधवांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी शनिवारी आमदार कडू आले होते. बाभूळगावातील सभेनंतर यवतमाळातील पत्रकार परिषदेत ते म्हणाले, शेतकरी आंदोलन हे सामान्य शेतकऱ्यांचेच आंदोलन होते. कर्जमाफीचे श्रेय त्या आंदोलक शेतकऱ्यांचेच आहे. ५ जूनचा बंद ही देशातील ऐतिहासिक घटना होय. मात्र, निकषांमुळे या कर्जमाफीचा लाभ अर्ध्याच शेतकऱ्यांना होणार आहे. आता स्वामिनाथन आयोग लागू करण्यासोबतच आयात-निर्यातीच्या धोरणावरही लक्ष द्यावे लागणार आहे. सरकार आधी ३१ आॅक्टोबरपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्याची भाषा करत होते. मात्र, शेतकऱ्यांचे आंदोलन आणि सुकाणू समितीच्या चर्चेमुळे आत्ताच कर्जमाफी घोषित झाली व नवीन कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. सध्या तातडीने १० हजारांचे कर्ज मिळणे आवश्यक आहे. घोषणेनंतर २-३ दिवस उलटूनही ते मिळताना दिसत नाही. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असलेल्या शेतकऱ्यांवर घातलेली बंधनेही काढण्याबाबत चर्चा करणार असल्याचे आमदार बच्चू कडू म्हणाले. पॉलीहाउस, ठिबक सिंचनासाठी कर्ज घेणारे शेतकरी, उसणवारी करून बँकेचे कर्ज फेडणारे शेतकरी यांनाही कर्जमाफीचा फायदा मिळावा, यासाठी २०-२१ जूनच्या बैठकीत प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. वाघासाठी अमिताभ, मग शेतकऱ्यांसाठी कोण ? यवतमाळ जिल्ह्यात अनेकांची शेती जंगलाकाठी असल्याने वन्यप्राण्यांचा त्रास आहे. वन्यप्राण्यांना मारले, तर शेतकऱ्यांवर कारवाई होते. शेतकऱ्याचा बैल वनजमिनीत घुसला, तर वापसच येत नाही. वाघ वाचवण्यासाठी सरकारने आमिताभ बच्चन यांना ब्रॅण्ड अ‍ॅम्बेसिडर केले. पण वाघाच्या हल्ल्यात मरणाऱ्या शेतकऱ्यांना कोण वाचवणार? आत्तापर्यंत २१ नेते शेतकऱ्यांविषयी अपशब्द बोलले. शेतकरी वेगवेगळ्या पक्षाच्या दावणीला बांधला गेल्याने त्यांचे प्रश्न सुटत नाही. हाती नांगर धरला की शेतकऱ्याने डोक्यात धर्म-जात ठेवूच नये. आपल्या प्रश्नांसाठी एकजुटीने लढावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले.