शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू

By विशाल सोनटक्के | Updated: September 12, 2025 10:28 IST

डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात ऐतिहासिक रामकथा सोहळ्याचे आयोजन केले आहे.

-विशाल सोनटक्के, यवतमाळआम्हीच स्वयंभू, आमचा ग्रंथ महान, आमचा नायक महान, आमची संस्कृती महान हा अभिमान नव्हे तर आसुरी अहंकार आहे. कोणाच्याही निंदेत रमू नका, द्वेष, ईर्षा बाळगू नका, केवळ संस्कृती महान असून भागणार नाही, तर त्यासोबत सत्कृतीही हवी, असे प्रतिपादन प्रसिद्ध आध्यात्मिक संत तथा प्रख्यात कथाकार मोरारीबापू यांनी गुरुवारी केले.

डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात ऐतिहासिक रामकथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याच्या सहाव्या दिवसाची सुरुवात मोरारीबापू यांनी महाराष्ट्राच्या पावनभूमीला प्रणाम करून केली. 

बापू म्हणाले, आचार्य विनोबा भावे यांनी चिंतनातून तीन महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. संस्कृती, सत्ता आणि संपत्ती आसुरी बनल्यास नुकसानकारक ठरतात. संस्कृती हा चांगला शब्द आहे; पण, त्यासोबत सत्कृती असेल तरच. युरोपियन म्हणतात, आमचीच सभ्यता महान, तर आफ्रिकन म्हणतात, आमची संस्कृती महान, विविध धर्मीयही त्यांच्या-त्यांच्या संस्कृतीचे नारे देतात. खरं तर सत्य, प्रेम, करूणा, श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तृप्ती, क्रिया, उन्नती, बुद्धी, स्मृती आणि लज्जा हे सर्व धर्माशी एकत्र यायला हवेत आणि आपल्या वर्तनातही दिसायला हवेत.

जप करताना शत्रुता नसावी

भारत भूमीत भगवान श्रीराम, त्याच काळात दुसरे परशुराम आणि तिसरे द्वारका युगात भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम असे तीन राम झाले. तर कैकयीनंदन भरत, श्रीमद् भागवतचे जडभरत आणि तिसरे कालिदासांच्या शाकुंतलातील शूरवीर भरत असे तीन भरत झाले. तुलसीदास यांनी रामनाम जप करणाऱ्यांना तीन नियम सांगितले आहेत. शोषण करू नये, तो पोषणकर्ता असावा, मनात शत्रुता बाळगू नये आणि त्याने समाजाचा आधार व्हावे, असे म्हटल्याचे मोरारीबापू यांनी सांगितले.

गुरू म्हणजे आत्म्याला परमात्म्यासोबत जोडणारा सेतू : डॉ. विजय दर्डा

सुदामा आणि त्यांचे प्रिय मित्र राजाधीराज कृष्णभेटीने काल माझेही डोळे पाणावल्याचे सांगत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा रामकथा पर्वाचे यजमान डॉ. विजय दर्डा यांनी 'तु मुझे छोड कर जा नहीं सकता, छोड इस बात में क्या रखा हैं, वो मिला देगा हमे भी, जिससे आब और गिल को मिला रखा हैं, कई ईक जाल बुना रखा है, आज आसमानोंसे गवाही के लिए एक सितारा बचा रखा है' अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाही, तर तो मार्गदर्शक मित्र असून, आत्याला परमात्म्यासोबत जोडणारा सेतू असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमramayanरामायण