शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू

By विशाल सोनटक्के | Updated: September 12, 2025 10:28 IST

डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात ऐतिहासिक रामकथा सोहळ्याचे आयोजन केले आहे.

-विशाल सोनटक्के, यवतमाळआम्हीच स्वयंभू, आमचा ग्रंथ महान, आमचा नायक महान, आमची संस्कृती महान हा अभिमान नव्हे तर आसुरी अहंकार आहे. कोणाच्याही निंदेत रमू नका, द्वेष, ईर्षा बाळगू नका, केवळ संस्कृती महान असून भागणार नाही, तर त्यासोबत सत्कृतीही हवी, असे प्रतिपादन प्रसिद्ध आध्यात्मिक संत तथा प्रख्यात कथाकार मोरारीबापू यांनी गुरुवारी केले.

डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि दर्डा परिवाराच्या वतीने यवतमाळ येथील चिंतामणी बाजार समितीच्या आवारात ऐतिहासिक रामकथा सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याच्या सहाव्या दिवसाची सुरुवात मोरारीबापू यांनी महाराष्ट्राच्या पावनभूमीला प्रणाम करून केली. 

बापू म्हणाले, आचार्य विनोबा भावे यांनी चिंतनातून तीन महत्त्वाच्या नोंदी केल्या आहेत. संस्कृती, सत्ता आणि संपत्ती आसुरी बनल्यास नुकसानकारक ठरतात. संस्कृती हा चांगला शब्द आहे; पण, त्यासोबत सत्कृती असेल तरच. युरोपियन म्हणतात, आमचीच सभ्यता महान, तर आफ्रिकन म्हणतात, आमची संस्कृती महान, विविध धर्मीयही त्यांच्या-त्यांच्या संस्कृतीचे नारे देतात. खरं तर सत्य, प्रेम, करूणा, श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तृप्ती, क्रिया, उन्नती, बुद्धी, स्मृती आणि लज्जा हे सर्व धर्माशी एकत्र यायला हवेत आणि आपल्या वर्तनातही दिसायला हवेत.

जप करताना शत्रुता नसावी

भारत भूमीत भगवान श्रीराम, त्याच काळात दुसरे परशुराम आणि तिसरे द्वारका युगात भगवान श्रीकृष्णाचे मोठे बंधू बलराम असे तीन राम झाले. तर कैकयीनंदन भरत, श्रीमद् भागवतचे जडभरत आणि तिसरे कालिदासांच्या शाकुंतलातील शूरवीर भरत असे तीन भरत झाले. तुलसीदास यांनी रामनाम जप करणाऱ्यांना तीन नियम सांगितले आहेत. शोषण करू नये, तो पोषणकर्ता असावा, मनात शत्रुता बाळगू नये आणि त्याने समाजाचा आधार व्हावे, असे म्हटल्याचे मोरारीबापू यांनी सांगितले.

गुरू म्हणजे आत्म्याला परमात्म्यासोबत जोडणारा सेतू : डॉ. विजय दर्डा

सुदामा आणि त्यांचे प्रिय मित्र राजाधीराज कृष्णभेटीने काल माझेही डोळे पाणावल्याचे सांगत लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन तथा रामकथा पर्वाचे यजमान डॉ. विजय दर्डा यांनी 'तु मुझे छोड कर जा नहीं सकता, छोड इस बात में क्या रखा हैं, वो मिला देगा हमे भी, जिससे आब और गिल को मिला रखा हैं, कई ईक जाल बुना रखा है, आज आसमानोंसे गवाही के लिए एक सितारा बचा रखा है' अशा शब्दात भावना व्यक्त केल्या.

आध्यात्मिक दृष्टिकोनातून गुरु म्हणजे केवळ शिक्षक नाही, तर तो मार्गदर्शक मित्र असून, आत्याला परमात्म्यासोबत जोडणारा सेतू असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Religious programmeधार्मिक कार्यक्रमramayanरामायण