शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
6
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
7
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
8
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
9
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
10
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
11
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
12
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
13
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
14
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
15
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
16
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
17
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
18
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
19
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
20
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?

लोअर पूसला पुन्हा एकदा चकमा

By admin | Updated: January 7, 2015 23:00 IST

शून्य टक्के सिंचन असणाऱ्या जामनाला व आमडापूर प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनसंजीवनी समजल्या जाणाऱ्या वेणी येथील लोअर

महागाव : शून्य टक्के सिंचन असणाऱ्या जामनाला व आमडापूर प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनसंजीवनी समजल्या जाणाऱ्या वेणी येथील लोअर पूस प्रकल्पाला क्षमतेप्रमाणे सिंचन होण्यासाठी भरीव निधीची आवश्यकता असताना या निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील आमदारांची आढावा बैठक घेतली. यावेळी जामनाला प्रकल्पाला दीड कोटी रुपये तर आमडापूर प्रकल्पाला साडे सात कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. परंतु तालुक्यातील विकासात अतिशय महत्वपूर्ण असलेल्या लोअर पूस प्रकल्पाला वंचित ठेवण्यात आले. नऊ हजार २०० हेक्टर सिंचनाची लोअर पूस प्रकल्पाची क्षमता आहे. प्रत्यक्षात मात्र चार हजार हेक्टर सिंचन कसेबसे होते. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांच्या अस्थरीकरणासाठी पाच कोटी रुपये निधी मिळावा असा प्रस्ताव दोन वर्षांपासून शासन दरबारी धूळ खात पडला आहे. अनेक ठिकाणी कालवे नादुरूस्त आहेत. पुरेसे कर्मचारी नाहीत, जे कालवे सुरू आहेत अशा कालव्यांमध्ये लिकेजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक आमदारांनी या दिशेने प्रयत्न केले असते तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या जिल्ह्यातील आमदारांच्या आढावा सभेत निश्चितच निधीची तरतूद झाली असती. तालुक्यात सर्वात मोठा सिंचन प्रकल्प १९८५ मध्ये निर्माण झाला. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हा प्रकल्प सिंचनासाठी वरदान ठरणार आहे. परंतु आजी, माजी आमदारांनी या प्रकल्पाबाबतच्या समस्या कधीच जाणून घेतल्या नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील इतर जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असताना महागाव तालुक्यातील अतिशय महत्वपूर्ण लोअर पूस प्रकल्पाला वगळण्यात आले आहे. लोअर पूस प्रकल्पावर या परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे यापूर्वीसुद्धा नागरिकांमधून वेळोवेळी या प्रकल्पासाठी निधी खचून आणण्याची मागणी सबंधित लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली होती. परंतु परिसरातील लोकप्रतिनिधी याकडे गांभिर्याने लक्ष देण्यास तयार नाही. सिंचन व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे. या भागातील आमदारांनी योग्यरित्या या प्रकल्पाच्या समस्यांकडे लक्ष दिले असते आणि ही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती. तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या क्षमतेप्रमाणे सिंचनासाठी शासनाने भरीव असा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)