शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

लोअर पूसला पुन्हा एकदा चकमा

By admin | Updated: January 7, 2015 23:00 IST

शून्य टक्के सिंचन असणाऱ्या जामनाला व आमडापूर प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनसंजीवनी समजल्या जाणाऱ्या वेणी येथील लोअर

महागाव : शून्य टक्के सिंचन असणाऱ्या जामनाला व आमडापूर प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनसंजीवनी समजल्या जाणाऱ्या वेणी येथील लोअर पूस प्रकल्पाला क्षमतेप्रमाणे सिंचन होण्यासाठी भरीव निधीची आवश्यकता असताना या निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील आमदारांची आढावा बैठक घेतली. यावेळी जामनाला प्रकल्पाला दीड कोटी रुपये तर आमडापूर प्रकल्पाला साडे सात कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. परंतु तालुक्यातील विकासात अतिशय महत्वपूर्ण असलेल्या लोअर पूस प्रकल्पाला वंचित ठेवण्यात आले. नऊ हजार २०० हेक्टर सिंचनाची लोअर पूस प्रकल्पाची क्षमता आहे. प्रत्यक्षात मात्र चार हजार हेक्टर सिंचन कसेबसे होते. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांच्या अस्थरीकरणासाठी पाच कोटी रुपये निधी मिळावा असा प्रस्ताव दोन वर्षांपासून शासन दरबारी धूळ खात पडला आहे. अनेक ठिकाणी कालवे नादुरूस्त आहेत. पुरेसे कर्मचारी नाहीत, जे कालवे सुरू आहेत अशा कालव्यांमध्ये लिकेजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक आमदारांनी या दिशेने प्रयत्न केले असते तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या जिल्ह्यातील आमदारांच्या आढावा सभेत निश्चितच निधीची तरतूद झाली असती. तालुक्यात सर्वात मोठा सिंचन प्रकल्प १९८५ मध्ये निर्माण झाला. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हा प्रकल्प सिंचनासाठी वरदान ठरणार आहे. परंतु आजी, माजी आमदारांनी या प्रकल्पाबाबतच्या समस्या कधीच जाणून घेतल्या नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील इतर जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असताना महागाव तालुक्यातील अतिशय महत्वपूर्ण लोअर पूस प्रकल्पाला वगळण्यात आले आहे. लोअर पूस प्रकल्पावर या परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे यापूर्वीसुद्धा नागरिकांमधून वेळोवेळी या प्रकल्पासाठी निधी खचून आणण्याची मागणी सबंधित लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली होती. परंतु परिसरातील लोकप्रतिनिधी याकडे गांभिर्याने लक्ष देण्यास तयार नाही. सिंचन व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे. या भागातील आमदारांनी योग्यरित्या या प्रकल्पाच्या समस्यांकडे लक्ष दिले असते आणि ही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती. तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या क्षमतेप्रमाणे सिंचनासाठी शासनाने भरीव असा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)