शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
2
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
3
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
4
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
5
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
7
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
8
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
9
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
10
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
11
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
12
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
13
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
14
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
15
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
16
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
17
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
18
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
19
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
20
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लोअर पूसला पुन्हा एकदा चकमा

By admin | Updated: January 7, 2015 23:00 IST

शून्य टक्के सिंचन असणाऱ्या जामनाला व आमडापूर प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनसंजीवनी समजल्या जाणाऱ्या वेणी येथील लोअर

महागाव : शून्य टक्के सिंचन असणाऱ्या जामनाला व आमडापूर प्रकल्पाला मुख्यमंत्र्यांनी निधी जाहीर केला. परंतु तालुक्यातील शेतकऱ्यांची जीवनसंजीवनी समजल्या जाणाऱ्या वेणी येथील लोअर पूस प्रकल्पाला क्षमतेप्रमाणे सिंचन होण्यासाठी भरीव निधीची आवश्यकता असताना या निधीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्यातील आमदारांची आढावा बैठक घेतली. यावेळी जामनाला प्रकल्पाला दीड कोटी रुपये तर आमडापूर प्रकल्पाला साडे सात कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. परंतु तालुक्यातील विकासात अतिशय महत्वपूर्ण असलेल्या लोअर पूस प्रकल्पाला वंचित ठेवण्यात आले. नऊ हजार २०० हेक्टर सिंचनाची लोअर पूस प्रकल्पाची क्षमता आहे. प्रत्यक्षात मात्र चार हजार हेक्टर सिंचन कसेबसे होते. या प्रकल्पाच्या मुख्य कालव्यांच्या अस्थरीकरणासाठी पाच कोटी रुपये निधी मिळावा असा प्रस्ताव दोन वर्षांपासून शासन दरबारी धूळ खात पडला आहे. अनेक ठिकाणी कालवे नादुरूस्त आहेत. पुरेसे कर्मचारी नाहीत, जे कालवे सुरू आहेत अशा कालव्यांमध्ये लिकेजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. स्थानिक आमदारांनी या दिशेने प्रयत्न केले असते तर मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या जिल्ह्यातील आमदारांच्या आढावा सभेत निश्चितच निधीची तरतूद झाली असती. तालुक्यात सर्वात मोठा सिंचन प्रकल्प १९८५ मध्ये निर्माण झाला. तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना हा प्रकल्प सिंचनासाठी वरदान ठरणार आहे. परंतु आजी, माजी आमदारांनी या प्रकल्पाबाबतच्या समस्या कधीच जाणून घेतल्या नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील इतर जिल्ह्यातील प्रकल्पांसाठी भरीव निधी उपलब्ध करून दिला असताना महागाव तालुक्यातील अतिशय महत्वपूर्ण लोअर पूस प्रकल्पाला वगळण्यात आले आहे. लोअर पूस प्रकल्पावर या परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी अवलंबून आहेत. त्यामुळे यापूर्वीसुद्धा नागरिकांमधून वेळोवेळी या प्रकल्पासाठी निधी खचून आणण्याची मागणी सबंधित लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली होती. परंतु परिसरातील लोकप्रतिनिधी याकडे गांभिर्याने लक्ष देण्यास तयार नाही. सिंचन व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष, यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये रोष निर्माण होणे सहाजिक आहे. या भागातील आमदारांनी योग्यरित्या या प्रकल्पाच्या समस्यांकडे लक्ष दिले असते आणि ही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली असती तर परिस्थिती वेगळी राहिली असती. तालुक्यातील शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या क्षमतेप्रमाणे सिंचनासाठी शासनाने भरीव असा निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. (तालुका प्रतिनिधी)