शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

बंदीभागातील जेवली झाले डॉक्टरांचे गाव

By admin | Updated: July 20, 2015 02:25 IST

उमरखेड तालुक्यातील बंदीभागात मोडणारी गावे शासकीय औदासीन्याची अवकळा भोगणारीच. पण, दुर्गम वातावरणच अनेकांना जिद्दीची शिदोरी देते.

लोकमत विशेषपुंजाराम हटकरे जेवलीउमरखेड तालुक्यातील बंदीभागात मोडणारी गावे शासकीय औदासीन्याची अवकळा भोगणारीच. पण, दुर्गम वातावरणच अनेकांना जिद्दीची शिदोरी देते. अशाच जिद्दीची एक अनोखी कहाणी जेवली नावाच्या लहानशा खेड्यात घडली. जिल्हा मुख्यालयापासून लांब आणि जेमतेम सुविधा असलेल्या या खेड्यातून तब्बल ११ विद्यार्थी डॉक्टर झाले आहेत. जेवली गाव चार हजार लोकसंख्येचे. येथे शिक्षणाची सुविधाच नव्हती. १९९१ मध्ये राजाराम बापू विद्यालयाच्या रूपाने कशीबशी दहावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय झाली. अशा परिस्थितीत जेवलीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढे जाणे महाकठीण होते. पण जे कुणीही करत नाही, तेच आपण करायचे, असा काहींचा प्रण असतो. जेवलीतील ११ विद्यार्थ्यांनी हेच दुर्लभ ध्येय उराशी बाळगले. अमोल वसंतराव देवसरकर , सुरज बालसिंग पडवाले, देवानंद भीमराव देवसरकर, संतोष गोपीसिंग घोती, संदीप गोपीसिंग घोती, राहुल प्रकाश जाधव, श्याम भुजंग दळवी, पूजा बालसिंग पडवाले, वैशाली वसंतराव देवसरकर, आकाश बालसिंग पडवाले, सतीश जगदेवराव देवसरकर यांनी अडचणींना ओलांडून एमबीबीएसपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. या पैकी चौघांनी तर एमबीबीएसनंतर एमडीचेही शिक्षण पूर्ण केले. यातील सूरज, पूजा आणि आकाश यांच्या वडिलांकडे पोटापुरती शेती आहे. डॉ. अमोल देवसरकर यांच्या वडिलांचीही भिस्त शेतीवरच. संतोष आणि संदीप घोती दोघे भाऊ डॉक्टर झाले तेही घरच्या दोन एकर शेतीच्या भरवशावरच. श्याम दळवी यांच्या वडिलांची मदार उण्यापुऱ्या पाच एकर शेतीवर आहे. वैशाली देवसरकर यांच्या वडीलांकडे १० तर देवानंद देवसरकर यांच्या वडीलांडे पाच एकर शेती आहे. राहुल जाधव यांचे वडील डॉक्टर आहेत. सतीश देवसरकर यांच्या वडीलांकडे दहा एकर शेती आहे. आज अमोल वसंतराव देवसरकर (एमडी) मुंबईमध्ये, देवानंद भीमराव देवसरकर (एमडी) ठाणे येथे, राहुल जाधव (एमडी) पुणे येथे तर संतोष घोती (एमडी) नागपुरात कार्यरत आहेत.