शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

शेतकरी कन्या किरण व पूजा होणार डॉक्टर

By admin | Updated: July 23, 2016 00:03 IST

बारावीच्या परीक्षेत दोन सख्या बहिणी गुणवत्ता यादीत झळकल्या. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतही अव्वल ठरल्या. त्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबरही लागला.

चेतना अभियानातून मदत : आर्थिक अडचणीने रखडलेला वैद्यकीय प्रवेशाचा मार्ग मोकळा रूपेश उत्तरवार यवतमाळ बारावीच्या परीक्षेत दोन सख्या बहिणी गुणवत्ता यादीत झळकल्या. वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षेतही अव्वल ठरल्या. त्यांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबरही लागला. परंतु आर्थिक अडचणींमुळे या शेतकरी कन्यांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली. अशा वेळी बळीराजा चेतना अभियान या शेतकरी कन्यांच्या मदतीला धावून आले. अभियानाच्या माध्यमातून गोळा झालेल्या लोकवर्गणीतून त्यांना प्रवेशासाठी निधी दिला जाणार आहे. यामुळे शेतकरी कन्यांचा डॉक्टर होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. किरण सुभाष गायकवाड आणि पूजा सुभाष गायकवाड या नेर नबाबपूर येथील भगिनी. बारावीच्या परीक्षेत किरण गतवर्षी ८७ टक्के गुण घेऊन बारावी उत्तीर्ण झाली तर पूजा ९०.१५ टक्के गुण घेऊन यंदा विज्ञान शाखेत उत्तीर्ण झाली. या दोघींनी यंदा वैद्यकीय प्रवेशपूर्व परीक्षा दिली. किरणला सीईटी परीक्षेत १६४ तर पूजाला १७७ गुण मिळाले. किरणचा गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि पूजाचा नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नंबर लागला. परंतु अल्पभूधारक शेतकरी असलेल्या या दोनही कन्यांचा मेडिकल प्रवेश आर्थिक अडचणीमुळे रखडला होता. सुभाष गायकवाड यांना २००७ मध्ये दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेतून एक हेक्टर ६१ आर जमीन मिळाली होती. त्याच भरोश्यावर कुटुंबाचा गुजरान करीत होते. त्यांच्या दोनही गुणी लेकींनी बारावीत आणि वैद्यकीय पूर्व परीक्षेत नाव चमकविले. परंतु या गुणी मुलींच्या प्रवेशासाठी पैसे आणायचे कोठून असा प्रश्न निर्माण झाला. कुणी तरी त्यांंना बळीराजा चेतना अभियानाची माहिती दिली. त्यामुळे त्यांनी थेट यवतमाळ गाठून निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांची भेट घेतली. त्यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्यापुढे आपली आपबिती कथन केली. जिल्हाधिकाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न लावता या दोन भगिनींच्या प्रथम वर्षाच्या शुल्कासाठी बळीराजा चेतना अभियानातून गोळा झालेल्या लोकवर्गणीतून निधी देण्याचे मान्य केले. यामुळे या दोन भगिनींचे डॉक्टर होण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे.