शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

महसूलचे कामकाज तलाठी भवनातून करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 21:32 IST

राज्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वात आलेल्या तलाठी भवनांचा वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी महसूल विभागाचे ग्रामीण भागातील कामकाज तलाठी भवनातून झाले पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

ठळक मुद्देसंजय राठोड : नागरिकांच्या तक्रारीवरून प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्यात केवळ यवतमाळ जिल्ह्यात अस्तित्वात आलेल्या तलाठी भवनांचा वापर होत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. याची दखल घेत महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी महसूल विभागाचे ग्रामीण भागातील कामकाज तलाठी भवनातून झाले पाहिजे यादृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.तलाठी भवन शोभेच्या वास्तू ठरल्याची तक्रार अनेक ठिकाणी नागरिक करीत आहेत. शासनाने नागरिकांच्या सोईसाठी दिलेल्या वास्तू वापरात आल्याच पाहिजे, त्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आढावा घेऊन जिल्ह्यातील किती तलाठी या भवनांमधून कामकाज करतात, याचा अहवाल मागविला आहे.महसूल विभागाशी शेतकरी, विद्यार्थी, सामान्य जनता यांचा दररोजचा संबंध येतो. एकाच तलाठ्याकडे अनेक गावांचा प्रभार असल्याने त्यांचे बसण्याचे निश्चित ठिकाण नव्हते. त्यामुळे तलाठ्यांच्या सर्व महसूली कामांचे विकेद्र्रीकरण करून ते नागरिकांना ठराविक वेळेत एका जागेवर भेटावे, त्यातून जनतेच्या अडचणी, त्यांचे दाखले, प्रमाणपत्रं आदी कामांचा निपटारा व्हावा, हा तलाठी भवनाचा उद्देश आहे. शिवाय अनेक गावात तलाठी किरायाने खोली करून तेथून कामकाज करायचे. मात्र त्याचे भाडे वषार्नुवर्षे थकीत राहत असल्याचे प्रकारही निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून गावात तलाठी भवन बांधण्याचा निर्णय ना. संजय राठोड यांनी घेतला. कोणत्या गावांमध्ये तलाठ्यांना कामकाजासाठी खासगी जागा, खोली भाडेपट्टीने घेतली, कोणाचे भाडे थकीत आहे, याचा अहवालही ना. राठोड यांनी जिल्हाधिकाºयांना मागितला आहे.बांधकाम पूर्ण करून हस्तांतरणाचे आदेशअपूर्ण तलाठी भवनाचे काम बांधकाम विभागाने तातडीने पूर्ण करून महसूल विभागाकडे हस्तांतरित करावे, अशा सूचनाही ना.राठोड यांनी केल्या. तलाठी भवनाच्या देखरेखीचे काम गावातील कोतवालांकडे सोपविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :Sanjay Rathodसंजय राठोड