शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

यवतमाळ जिल्ह्यातील १२०० सिकलसेलग्रस्त ‘आॅक्सिजन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 11:30 IST

राज्यात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात बाराशेवर रुग्णांची नोंद आहे. या रुग्णांना दरमहा १२०० ते १५०० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते.

ठळक मुद्देरक्ताचा तुटवडा बदली रक्तदाता दिल्यास मिळते बॅग

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिकलसेल आणि थॅलेसिमीयाग्रस्त रुग्णांना जगण्यासाठी दरमहा रक्त घ्यावे लागते. शासकीय रुग्णालयातून अशा रुग्णांना अग्रक्रमाने रक्त उपलब्ध करून दिले जाते. मात्र गत महिनाभरापासून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून सिकलसेलग्रस्तांना रक्त मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील १२०० वर सिकलसेलग्रस्त आज आॅक्सिजनवर आले आहे.सिकलसेल रुग्णांमध्ये रक्तपेशीची निर्मिती होत नाही. अशा रुग्णांना वारंवार रक्त घ्यावे लागते. राज्यात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात बाराशेवर रुग्णांची नोंद आहे. या रुग्णांना दरमहा १२०० ते १५०० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. यवतमाळच्या शासकीय रक्तपेढीतून त्यांना अग्रक्रमाने रक्त पुरवठा केला जातो.परंतु उन्हाळ्याच्या दिवसात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होते. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे शिबिरेही घेतले जात नाही. परिणामी यवतमाळच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम सिकलसेलग्रस्त रुग्णांवर होत आहे. बदली रक्तदाता दिल्यानंतरच येथून आता रक्ताची बॅग मिळते. सिकलसेलग्रस्त रुग्ण हे ग्रामीण भागातील असून यवतमाळात येऊन रक्तदाता शोधणे त्यांना कठीण जाते. अशा वेळेस रक्त मिळाले नाही तर त्यांचा श्वासही थांबू शकतो.

सद्यस्थितीत रक्तपेढीत पुरेसे रक्त उपलब्ध नाही. रुग्णालयात अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी रक्त राखीव ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे रक्तदाता आणणाऱ्यांस रक्त दिले जाते. वर्षभरात १२०० रक्त बॅगचे कलेक्शन करून रुग्णांपर्यंत पुरविले जाते.- डॉ. विकास येडशीकरसहयोगी प्राध्यापक, शासकीय रक्तपेढी, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

दात्यांनी पुढे येण्याची गरजरक्ताची निर्मिती करणे कुणालाही शक्य नाही. त्यासाठी रक्तदाता हाच एकमेव पर्याय आहे. शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचे संकलन केले जाते. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रक्तपेढी आहे. या ठिकाणी अनेक जण रक्तदानासाठी येतात. परंतु उन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या दरवर्षी कमी होते, यंदाही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजातील रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य