शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

यवतमाळ जिल्ह्यातील १२०० सिकलसेलग्रस्त ‘आॅक्सिजन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 11:30 IST

राज्यात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात बाराशेवर रुग्णांची नोंद आहे. या रुग्णांना दरमहा १२०० ते १५०० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते.

ठळक मुद्देरक्ताचा तुटवडा बदली रक्तदाता दिल्यास मिळते बॅग

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिकलसेल आणि थॅलेसिमीयाग्रस्त रुग्णांना जगण्यासाठी दरमहा रक्त घ्यावे लागते. शासकीय रुग्णालयातून अशा रुग्णांना अग्रक्रमाने रक्त उपलब्ध करून दिले जाते. मात्र गत महिनाभरापासून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून सिकलसेलग्रस्तांना रक्त मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील १२०० वर सिकलसेलग्रस्त आज आॅक्सिजनवर आले आहे.सिकलसेल रुग्णांमध्ये रक्तपेशीची निर्मिती होत नाही. अशा रुग्णांना वारंवार रक्त घ्यावे लागते. राज्यात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात बाराशेवर रुग्णांची नोंद आहे. या रुग्णांना दरमहा १२०० ते १५०० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. यवतमाळच्या शासकीय रक्तपेढीतून त्यांना अग्रक्रमाने रक्त पुरवठा केला जातो.परंतु उन्हाळ्याच्या दिवसात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होते. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे शिबिरेही घेतले जात नाही. परिणामी यवतमाळच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम सिकलसेलग्रस्त रुग्णांवर होत आहे. बदली रक्तदाता दिल्यानंतरच येथून आता रक्ताची बॅग मिळते. सिकलसेलग्रस्त रुग्ण हे ग्रामीण भागातील असून यवतमाळात येऊन रक्तदाता शोधणे त्यांना कठीण जाते. अशा वेळेस रक्त मिळाले नाही तर त्यांचा श्वासही थांबू शकतो.

सद्यस्थितीत रक्तपेढीत पुरेसे रक्त उपलब्ध नाही. रुग्णालयात अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी रक्त राखीव ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे रक्तदाता आणणाऱ्यांस रक्त दिले जाते. वर्षभरात १२०० रक्त बॅगचे कलेक्शन करून रुग्णांपर्यंत पुरविले जाते.- डॉ. विकास येडशीकरसहयोगी प्राध्यापक, शासकीय रक्तपेढी, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

दात्यांनी पुढे येण्याची गरजरक्ताची निर्मिती करणे कुणालाही शक्य नाही. त्यासाठी रक्तदाता हाच एकमेव पर्याय आहे. शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचे संकलन केले जाते. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रक्तपेढी आहे. या ठिकाणी अनेक जण रक्तदानासाठी येतात. परंतु उन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या दरवर्षी कमी होते, यंदाही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजातील रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य