शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

यवतमाळ जिल्ह्यातील १२०० सिकलसेलग्रस्त ‘आॅक्सिजन’वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 11:30 IST

राज्यात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात बाराशेवर रुग्णांची नोंद आहे. या रुग्णांना दरमहा १२०० ते १५०० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते.

ठळक मुद्देरक्ताचा तुटवडा बदली रक्तदाता दिल्यास मिळते बॅग

रूपेश उत्तरवार।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सिकलसेल आणि थॅलेसिमीयाग्रस्त रुग्णांना जगण्यासाठी दरमहा रक्त घ्यावे लागते. शासकीय रुग्णालयातून अशा रुग्णांना अग्रक्रमाने रक्त उपलब्ध करून दिले जाते. मात्र गत महिनाभरापासून रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून सिकलसेलग्रस्तांना रक्त मिळविण्यासाठी मोठी धडपड करावी लागते. वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्याने जिल्ह्यातील १२०० वर सिकलसेलग्रस्त आज आॅक्सिजनवर आले आहे.सिकलसेल रुग्णांमध्ये रक्तपेशीची निर्मिती होत नाही. अशा रुग्णांना वारंवार रक्त घ्यावे लागते. राज्यात सर्वाधिक सिकलसेल रुग्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे. जिल्ह्यात बाराशेवर रुग्णांची नोंद आहे. या रुग्णांना दरमहा १२०० ते १५०० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. यवतमाळच्या शासकीय रक्तपेढीतून त्यांना अग्रक्रमाने रक्त पुरवठा केला जातो.परंतु उन्हाळ्याच्या दिवसात रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी होते. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे शिबिरेही घेतले जात नाही. परिणामी यवतमाळच्या रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम सिकलसेलग्रस्त रुग्णांवर होत आहे. बदली रक्तदाता दिल्यानंतरच येथून आता रक्ताची बॅग मिळते. सिकलसेलग्रस्त रुग्ण हे ग्रामीण भागातील असून यवतमाळात येऊन रक्तदाता शोधणे त्यांना कठीण जाते. अशा वेळेस रक्त मिळाले नाही तर त्यांचा श्वासही थांबू शकतो.

सद्यस्थितीत रक्तपेढीत पुरेसे रक्त उपलब्ध नाही. रुग्णालयात अत्यावश्यक शस्त्रक्रियेसाठी रक्त राखीव ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे रक्तदाता आणणाऱ्यांस रक्त दिले जाते. वर्षभरात १२०० रक्त बॅगचे कलेक्शन करून रुग्णांपर्यंत पुरविले जाते.- डॉ. विकास येडशीकरसहयोगी प्राध्यापक, शासकीय रक्तपेढी, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, यवतमाळ.

दात्यांनी पुढे येण्याची गरजरक्ताची निर्मिती करणे कुणालाही शक्य नाही. त्यासाठी रक्तदाता हाच एकमेव पर्याय आहे. शासकीय आणि खासगी रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचे संकलन केले जाते. यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात रक्तपेढी आहे. या ठिकाणी अनेक जण रक्तदानासाठी येतात. परंतु उन्हाळ्यात रक्तदात्यांची संख्या दरवर्षी कमी होते, यंदाही तशीच स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे समाजातील रक्तदात्यांनी पुढे येण्याची गरज आहे.

टॅग्स :Healthआरोग्य