शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जिल्ह्याला मिळाले १२३ कोटी

By admin | Updated: January 13, 2015 23:08 IST

खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

यवतमाळ : खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यास १२२ कोटी ८० लक्ष रुपये प्राप्त झाले असून सदर निधी या आठवड्यात तातडीने शेतकऱ्यांना वितरित करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या. पालकमंत्र्यांनी विश्राम भवन येथे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी १२२ कोटी ८० लाख रुपये प्राप्त झाले असून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या ४ लाख ५० हजारांवर शेतकऱ्यांना सदर मदत या आठवड्याच्या शेवटपर्यंत वितरित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. २ हेक्टरपर्यंत प्रती हेक्टरी ४ हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे. प्रत्येक गावातील तलाठी कार्यालये व पोलीस ठाणे असलेल्या गावी पोलीस पाटील भवन बांधण्याचा एकत्रित कार्यक्रम राबविता येईल काय, यावर यावेळी विचार करण्यात आला.अतिक्रमण मोहिमेंतर्गत अनेक व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली. अशा व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ठिकाणी जागा निश्चित करावी, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात करार तत्वावर गाळे काढून त्यांना वितरित करावी तसेच राज्यात काही ठिकाणी अशा अतिक्रमणधारकांचे कशा प्रकारे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्याची माहिती घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यात दारिद्र्यरेषेच्या निकषात नसणाऱ्यांना यादीतून वगळून त्या ठिकाणी खऱ्या कुटुंबांना सामावून घेणे आवश्यक आहे. या बाबतीत अपिलात करणाऱ्या कार्डधारकांना निकष तपासून सामावून घेण्यात यावे. राजस्व अभियानाअंतर्गत पांदण रस्ते खुले करण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यासोबतच जिल्हा वार्षीक योजनेतून शेतकऱ्यांसाठी अनुदान तत्त्वावर कुंपण याजना राबविता येईल काय याबाबत बैठकीत चर्चा झाली. वाळू धोरण, महसुली गावांना दर्जा, रिक्त पदे, वन जमीनीवरील लिज पट्टे, पूरसंरक्षक भिंती, कोंडवाडा बांधकाम आदींवरही यावेळी चर्चा झाली. (प्रतिनिधी)