शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

जिल्ह्याला मिळाले १२३ कोटी

By admin | Updated: January 13, 2015 23:08 IST

खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

यवतमाळ : खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यास १२२ कोटी ८० लक्ष रुपये प्राप्त झाले असून सदर निधी या आठवड्यात तातडीने शेतकऱ्यांना वितरित करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या. पालकमंत्र्यांनी विश्राम भवन येथे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी १२२ कोटी ८० लाख रुपये प्राप्त झाले असून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या ४ लाख ५० हजारांवर शेतकऱ्यांना सदर मदत या आठवड्याच्या शेवटपर्यंत वितरित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. २ हेक्टरपर्यंत प्रती हेक्टरी ४ हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे. प्रत्येक गावातील तलाठी कार्यालये व पोलीस ठाणे असलेल्या गावी पोलीस पाटील भवन बांधण्याचा एकत्रित कार्यक्रम राबविता येईल काय, यावर यावेळी विचार करण्यात आला.अतिक्रमण मोहिमेंतर्गत अनेक व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली. अशा व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ठिकाणी जागा निश्चित करावी, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात करार तत्वावर गाळे काढून त्यांना वितरित करावी तसेच राज्यात काही ठिकाणी अशा अतिक्रमणधारकांचे कशा प्रकारे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्याची माहिती घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यात दारिद्र्यरेषेच्या निकषात नसणाऱ्यांना यादीतून वगळून त्या ठिकाणी खऱ्या कुटुंबांना सामावून घेणे आवश्यक आहे. या बाबतीत अपिलात करणाऱ्या कार्डधारकांना निकष तपासून सामावून घेण्यात यावे. राजस्व अभियानाअंतर्गत पांदण रस्ते खुले करण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यासोबतच जिल्हा वार्षीक योजनेतून शेतकऱ्यांसाठी अनुदान तत्त्वावर कुंपण याजना राबविता येईल काय याबाबत बैठकीत चर्चा झाली. वाळू धोरण, महसुली गावांना दर्जा, रिक्त पदे, वन जमीनीवरील लिज पट्टे, पूरसंरक्षक भिंती, कोंडवाडा बांधकाम आदींवरही यावेळी चर्चा झाली. (प्रतिनिधी)