शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
3
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
4
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
5
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
6
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
7
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
8
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
9
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
10
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
11
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
12
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
13
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात
14
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
15
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
16
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
17
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
18
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
19
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
20
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल

जिल्ह्याला मिळाले १२३ कोटी

By admin | Updated: January 13, 2015 23:08 IST

खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे.

यवतमाळ : खरीप हंगामातील कमी पर्जन्यमानामुळे जिल्ह्यात टंचाईसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या स्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्यास १२२ कोटी ८० लक्ष रुपये प्राप्त झाले असून सदर निधी या आठवड्यात तातडीने शेतकऱ्यांना वितरित करा, अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या. पालकमंत्र्यांनी विश्राम भवन येथे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांसोबत विविध विषयांवर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदत वाटपासाठी १२२ कोटी ८० लाख रुपये प्राप्त झाले असून मदतीसाठी पात्र ठरणाऱ्या ४ लाख ५० हजारांवर शेतकऱ्यांना सदर मदत या आठवड्याच्या शेवटपर्यंत वितरित करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. २ हेक्टरपर्यंत प्रती हेक्टरी ४ हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे. प्रत्येक गावातील तलाठी कार्यालये व पोलीस ठाणे असलेल्या गावी पोलीस पाटील भवन बांधण्याचा एकत्रित कार्यक्रम राबविता येईल काय, यावर यावेळी विचार करण्यात आला.अतिक्रमण मोहिमेंतर्गत अनेक व्यावसायिकांची दुकाने हटविण्यात आली. अशा व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक ठिकाणी जागा निश्चित करावी, त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपात करार तत्वावर गाळे काढून त्यांना वितरित करावी तसेच राज्यात काही ठिकाणी अशा अतिक्रमणधारकांचे कशा प्रकारे पुनर्वसन करण्यात आले आहे, त्याची माहिती घेण्याची सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. जिल्ह्यात दारिद्र्यरेषेच्या निकषात नसणाऱ्यांना यादीतून वगळून त्या ठिकाणी खऱ्या कुटुंबांना सामावून घेणे आवश्यक आहे. या बाबतीत अपिलात करणाऱ्या कार्डधारकांना निकष तपासून सामावून घेण्यात यावे. राजस्व अभियानाअंतर्गत पांदण रस्ते खुले करण्याचा धडक कार्यक्रम राबविण्यासोबतच जिल्हा वार्षीक योजनेतून शेतकऱ्यांसाठी अनुदान तत्त्वावर कुंपण याजना राबविता येईल काय याबाबत बैठकीत चर्चा झाली. वाळू धोरण, महसुली गावांना दर्जा, रिक्त पदे, वन जमीनीवरील लिज पट्टे, पूरसंरक्षक भिंती, कोंडवाडा बांधकाम आदींवरही यावेळी चर्चा झाली. (प्रतिनिधी)