शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

जिल्हा पोलीस दलात फेरबदल

By admin | Updated: July 3, 2015 00:16 IST

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पोलीस दलात अनेक बदल केले आहेत.

यवतमाळ : जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी पोलीस दलात अनेक बदल केले आहेत. दहा निरीक्षक व सहा सहायक निरीक्षकांना नव्याने जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यवतमाळ शहरचे ठाणेदार दिलीप चव्हाण यांच्यावर जिल्हा वाहतूक शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. जालना येथून पदोन्नतीवर बदलून आलेल्या मुकुंद कुळकर्णी यांना यवतमाळ शहरचे ठाणेदार बनविण्यात आले. त्याच प्रमाणे राळेगाव ठाणेदारपदी शिवशंकर ठाकूर, आर्णी संजय खंदाडे, यवतमाळ ग्रामीणमध्ये संजय डहाके, कळंब अरुण आगे तर मुकुटबन ठाणेदारपदी भरत गाडे यांची नियुक्ती करण्यात आली. पुसद येथील वाहतूक शाखेचे प्रमुख म्हणून हनुमंत गायकवाड तर वणी वाहतूक शाखेत बळवंत मांडगे यांना पाठविण्यात आले. मोहन प्रजापती यांना स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून नेमण्यात आले. त्याच प्रमाणे सहायक पोलीस निरीक्षक गोपाल भारती यांना वडगाव जंगलचे ठाणेदार बनविण्यात आले आहे. लाडखेड ठाणेदारपदी अनिल राऊत तर गजानन खाडे यांना पाटण ठाणेदार म्हणून नेमण्यात आले. एपीआय संतोष मोरे यांना आर्थिक गुन्हे शाखा, गजेंद्र क्षीरसागर यांना स्थानिक गुन्हे शाखेअंतर्गत अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष प्रमुख तर किरण बकाले यांना पोलीस अधीक्षक कार्यालयातील अर्ज शाखेत नेमणूक देण्यात आली आहे. १ जुलै रोजी नियुक्त्यांचे हे आदेश जारी करण्यात आले. जिल्ह्यातील वरकमाईचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काही ठाण्यांसाठी पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय मार्गाने मोर्चेबांधणी केली होती. मात्र पोलीस प्रशासनाने राजकीय दबाव झुगारुन मेरिटनुसार बदल्या केल्याचे पोलीस वर्तुळातून सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)