शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

जिल्ह्याच्या आमदारांनी घेतला कोरोनाचा धसका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

खरीप हंगामासाठी बियाणे व पीक कर्जाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीतील अहवाल आयुक्त व मंत्रालय स्तरावर पाठविला जातो. यातून खरिपाचे परिपूर्ण नियोजन केले जाते. अशा महत्वपूर्ण बैठकीला सर्वच विधानसभा व विधान परिषद आमदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देखरीप आढावा बैठक, पालकमंत्र्यांसह चारच आमदार उपस्थितीत, आठ जणांची पाठ

सुरेंद्र राऊत ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या नियोजनाची आढावा बैठक पालकमंत्री संजय राठोड यांच्या उपस्थितीत शुक्रवारी पार पडली. या बैठकीला बहुतांश आमदारांनी दांडी मारली. आर्णीचे विधानसभा व विधान परिषद आमदार या बैठकीला उपस्थित होते. अतिशय महत्वाच्या बैठकीकडे आमदारांनी पाठ का फिरविली याचे कोडे आहे.खरीप हंगामासाठी बियाणे व पीक कर्जाच्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीतील अहवाल आयुक्त व मंत्रालय स्तरावर पाठविला जातो. यातून खरिपाचे परिपूर्ण नियोजन केले जाते. अशा महत्वपूर्ण बैठकीला सर्वच विधानसभा व विधान परिषद आमदारांनी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. जेणे करून त्यांच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या अडचणी, खते, बियाण्यांची उपलब्धता, पीक कर्जाची स्थिती याची माहिती या बैठकीच्या माध्यमातून वरिष्ठांकडे पाठविणे शक्य होते. जनतेचा कैवारी असल्याचा आव आणणारे लोकप्रतिनिधीच बैठकींना गैरहजर राहून शेतकऱ्यांप्रती किती गंभीर आहे हे दिसून येते.जिल्ह्यात विधानसभेचे सात तर विधान परिषदेचे पाच आमदार आहेत. यापैकी केवळ खासदार सुरेश धानोरकर, खासदार हेमंत पाटील, आमदार दुष्यंत चतुर्वेदी, आमदार ख्वाजा बेग, आमदार डॉ. संदीप धुर्वे व पालकमंत्री संजय राठोड उपस्थित होते. विधानसभेच्या सात आमदारांनी सहा जण गैरहजर होते. या बैठकीत आमदार डॉ.संदीप धुर्वे यांनी घाटंजी व आर्णी तालुक्यातील दुष्काळी मदतीचा मुद्दा उपस्थित केला. २०१८-१९ या वर्षात दुष्काळग्रस्त भागात शासनाने आर्थिक मदत जाहीर केली. ५० टक्के पैसेवारी असलेल्या सात तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. या मदतीचे फाईल बाहेर येताच धक्कादायक माहिती मिळाली. आर्णी, दिग्रस, नेर, पुसद, घाटंजी, वणी, झरीजामणी या तालुक्यांना मदतीचे २१२ कोटी ४३ लाख वितरित झाले नसल्याचा प्रकार उजेडात आला. आमदार डॉ. संदीप धुर्वे यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ही गंभीरबाब प्रशासनाच्या लक्षात आली. यासाठी विभागीय आयुक्तांकडे पाठपुरावा करण्यात येईल असेही जिल्हाधिकाºयांनी बैठकीत सांगितले.कृषी विज्ञान केंद्राच्या उपयोगितेवर प्रश्नखरिपाच्या आढावा बैठकीत जिल्ह्यात असलेल्या कृषी विज्ञान केंद्राच्या उपयोगितेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. इतक्या वर्षाच्या कालावधीत या विज्ञान केंद्राकडून कोणत्या शिफारसी, संशोधन शेतकऱ्यांसाठी करण्यात आल्या आहेत. या शिफारसी व संशोधनाचा शेतकऱ्यांना कितपत फायदा झाला याची माहिती आमदारांनी बैठकीत मागितली. प्रशासनाकडून यासाठी वेळ घेण्यात आला आहे.कापूस संशोधन केंद्र नेमके कुणासाठी ?कापूस संशोधन केंद्र असूनसुद्धा त्याचा शेतकऱ्यांना कोणताच फायदा झालेला नाही. इतकी संकटे कापसाच्या पिकावर येत आहे. त्याच्या नियोजनासाठी कोणता उपाय या संशोधन केंद्राकडून देण्यात आला, या हिशेब खरीपच्या बैठकीत आमदारांनी मागितला.

टॅग्स :MLAआमदारcorona virusकोरोना वायरस बातम्या