शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

जिल्ह्यात २१ लाख ७२ हजार मतदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

२०१४ मध्ये सात विधानसभा क्षेत्रामध्ये २० लाख २५ हजार ८४३ मतदारांची नोंद करण्यात आली. ३१ आॅगस्टच्या अंतिम मतदार यादीत २१ लाख ७२ हजार १७४ मतदारांची नोंद करण्यात आली. गत पाच वर्षात एक लाख ४६ हजार ३३१ मतदार जिल्ह्यात वाढले आहेत.

ठळक मुद्देसात विधानसभा : दीड लाख मतदार वाढले

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्यापूर्वी मतदारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. निवडणूक विभागाने ३१ आॅगस्टला मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली. या मतदार यादीनुसार जिल्ह्यात २१ लाख ७२ हजार १७४ मतदार विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे. सन २०१४ च्या तुलनेत २०१९ मध्ये एक लाख ४६ हजार ३३१ मतदार वाढले आहे. हे मतदार सात आमदारांची निवड करणार आहे.विधानसभेचा पाच वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे. यामुळे राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची पूर्वप्रक्रिया सुरू केली आहे. मतदारांची नावे नोंदविण्याचे काम निवडणूक विभागाने पूर्ण केले. यावर आक्षेपही मागविण्यात आले. त्यानुसार मतदार यादीमध्ये दुरूस्त्याही करण्यात आल्या.२०१४ मध्ये सात विधानसभा क्षेत्रामध्ये २० लाख २५ हजार ८४३ मतदारांची नोंद करण्यात आली. ३१ आॅगस्टच्या अंतिम मतदार यादीत २१ लाख ७२ हजार १७४ मतदारांची नोंद करण्यात आली. गत पाच वर्षात एक लाख ४६ हजार ३३१ मतदार जिल्ह्यात वाढले आहेत. यवतमाळ विधानसभा क्षेत्रामध्ये सर्वाधिक एक लाख ९५ हजार ९७९ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ८८ हजार १३९ महिला मतदार आहेत. वणी विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ४७ हजार ५५२ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३६ हजार ९४५ महिला मतदार आहेत.राळेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ४५ हजार १६० पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३८ हजार २९ महिला मतदार आहेत. दिग्रस विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ६७ हजार ६८० पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ५४ हजार ६७३ महिला मतदार आहेत.आर्णी विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ६० हजार ८२९ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ५१ हजार १६४ महिला मतदार आहेत. पुसद विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ५४ हजार ३३४ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३८ हजार ८२२ महिला मतदार आहेत. उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये एक लाख ५३ हजार ५१८ पुरूष मतदार आहेत. तर एक लाख ३९ हजार ३५० महिला मतदार आहेत.३१ तृतीयपंथी मतदारांची नोंदजिल्ह्यात ३१ तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये २१ तृतीयपंथी मतदारांची नोंद यवतमाळमध्ये करण्यात आली आहे. वणी विधानसभा क्षेत्रात तृतीयपंथी मतदारांची नोंद निरंक आहेत. इतर मतदान केंद्रावर १० तृतीयपंथी मतदारांची नोंद करण्यात आली आहे.सहा मतदान केंद्र वाढविण्याचा प्रस्तावविधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांच्या आधारावर मतदान केंद्राची निर्मिती करावी लागते. या निकषानुसार सहा मतदान केंद्र वाढविण्याचा प्रस्ताव निवडणूक विभागाकडे आला आहे. या व्यतिरिक्त २ हजार ४९१ मतदान केंद्र निर्माण करण्यात आले आहे. त्याकरिता २ हजार ४९१ मतदान यंत्रे लागणार आहेत.

टॅग्स :Votingमतदान