शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

जिल्हा सहकारी बँकेला आग, ४० संगणक जळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 23:31 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील पाचकंदील चौक स्थित मुख्य कार्यालयाच्या इमारतीत रात्री १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत कृषी व लेखा विभागातील ४० संगणक व पीक कर्जाचे बरेच रेकॉर्ड जळून खाक झाल्याचे सांगितले जाते.

ठळक मुद्देशॉर्टसर्किट : ४० लाखांवर नुकसान, जुने रेकॉर्डही खाक

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या येथील पाचकंदील चौक स्थित मुख्य कार्यालयाच्या इमारतीत रात्री १ वाजताच्या सुमारास आग लागली. या आगीत कृषी व लेखा विभागातील ४० संगणक व पीक कर्जाचे बरेच रेकॉर्ड जळून खाक झाल्याचे सांगितले जाते.गुरुवारच्या रात्री जिल्हा बँकेतील शेती कर्ज व बँकींग विभागातून धूर निघत असल्याचे सुरक्षा रक्षक व संगणक कंपनी कर्मचाऱ्याच्या निदर्शनास आले. त्यांनी लगेच याची सूचना बाजूलाच असलेल्या शहर पोलीस ठाणे व अग्नीशमन विभागाला दिली. नगरपरिषदेच्या अग्नीशमन विभागाने तातडीने घटनास्थळी पोहोचून आग विझविणे सुरू केले. मात्र जुने रेकॉर्ड, फर्निचर, कापडी पडदे यामुळे आग विझविण्यास काहीसा वेळ लागला. ही आग शॉर्टसर्किटने लागल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पार्किंग होताना आढळून आले. ४० संगणक व अन्य साहित्य जळून खाक झाले. या आगीत ४० लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.नोकरभरती, वादग्रस्त कर्जप्रकरणांमुळे घातपाताची चर्चा- जिल्हा बँकेत आग लागल्याचे वृत्त कळताच आग लागली की लावली, असा प्रश्न करीत घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे. कारण जिल्हा बँकेमध्ये १४७ पदांची नोकरभरती होणार आहे. याशिवाय बँकेतील भ्रष्टाचार, पैशाची उधळपट्टी, वारेमाप खर्च, बोगस कर्ज प्रकरणे हे विषय नेहमीच चर्चेत राहतात. या वादग्रस्त प्रकरणांचे रेकॉर्ड जाळून पुरावे नष्ट करण्यासाठी तर ही आग लावली गेली नाही ना? असा शंकेचा सूर दिवसभर शहरात व विशेषत: बँकेच्या परिसरात ऐकायला मिळाला. परंतु जिल्हा बँकेच्या व्यवस्थापनाने व प्रशासनाने घातपाताची शक्यता फेटाळून लावली आहे. कर्जाचे रेकॉर्ड सेवा संस्थांकडेही उपलब्ध असते. नोकरभरतीला अद्याप सुरुवातच झाली नाही. या नोकरभरतीचा बँकेचा थेट संबंध नाही. त्याचे संपूर्ण रेकॉर्ड आॅनलाईन परीक्षा घेणाºया खासगी संस्थेकडे असल्याने संशयाला कोणतीही जागा नसल्याचे बँकेने स्पष्ट केले.अग्नीरोधक यंत्रे उपलब्ध नाहीजिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांमधील अग्नीशमन यंत्रणा रामभरोसे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २९ एप्रिलच्या अंकात प्रकाशित केले होते. त्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतही अग्नीरोधकासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र या इशाºयाकडे बँकेचे पदाधिकारी, प्रशासक व व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले. हा इशारा गांभीर्याने न घेतल्याने अखेर बँकेला आगीच्या घटनेला सामोरे जावे लागले. त्यात झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण?, ही वसुली कुणाकडून करायची असा प्रश्न विचारला जात आहे.बँकेला लागलेल्या आगीत आर्थिक नुकसान झाले आहे. मात्र महत्वाचे रेकॉर्ड सुरक्षित आहे. ही आग शॉर्टसर्किटनेच लागली आहे. या आगीचा बँकेच्या नियमित कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही. सर्व व्यवहार सुरळीत आहे. ग्राहक-सभासदांनी भीती बाळगण्याचे कारण नाही.- अमन गावंडे, अध्यक्ष,जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

टॅग्स :bankबँकfireआग